Neelam Gorhe Vs Thackeray Group : संमेलनात बोलताना मर्यादा पाळल्या पाहिजेत, फडणवीसांनी टोचले कान
Neelam Gorhe Vs Thackeray Group : संमेलनात बोलताना मर्यादा पाळल्या पाहिजेत, फडणवीसांनी टोचले कान
दिल्लीत ९८वे आखिल भारतीय साहित्य संमेलन सुरु आहे... मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय...ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप नीलम गोऱ्हे यांनी केलाय... त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडालीये...शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम वारंवार ठाकरेंना खोके दिल्याचा आरोप करतात, अशातच गोऱ्हेंनी देखील अशाच प्रकारचा गंभीर आरोप केलाय...दरम्यान त्यांच्या या आरोपांवर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी देखील हल्लाबोल केलाय...



















