Eknath Shinde Full Speech : ना टार्गेट बदललं ना स्टाईल... पावसाळी अधिवेशनातील शेवटचं भाषण ABP Majha
Eknath Shinde Full Speech : ना टार्गेट बदललं ना स्टाईल... पावसाळी अधिवेशनातील शेवटचं भाषण ABP Majha
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली. ते म्हणाले की, आमच्या सरकारने चांगलं काम केल्यानं विरोधक धास्तावले आहेत, गोंधळलेले आहेत. विरोधकांचा आत्मविश्वास डगमगलेला आहे.
राज्यातील उद्योगांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दाओसमध्ये जाऊन किती करार झाले हे मला माहीत नाही, ते सर्व गुलदस्त्यात आहे. मात्र श्वेतपत्रिका काढण्याच धाडस आमच्या उद्योग मंत्र्यांनी केलं, राज्यात 1 लाख 18 हजार कोटीची परदेशी गुतंवणूक आली
अहंकारामुळं राज्याचं नुकसान होत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, आमचं सरकार हे परफॉर्मन्स करणारं सरकार आहे, 24 तास काम करणारं सरकार आहे. तुमचं सरकार हे शासन आपल्या घरी होतं. तर आमचं सरकार हे शासन आपल्या दारी सरकार आहे. फेसबुकवरुन घरात बसून लाईव्ह करणारे सरकार नाही.





















