एक्स्प्लोर
CM Thackeray #Lockdown 30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : 30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नाही, काळजीपूर्वक काही गोष्टी सुरु करत आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाची संख्या वाढत आहे. भाजी मंडईसह काही ठिकाणी होणारी गर्दी चिंतेचा विषय आहे. तुम्ही गर्दी कराल तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल. काही जिल्ह्यांमधून लॉकडाऊन वाढवण्याची मागणी आली आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. लॉकडाऊन हा शब्द वापरत नसलो तरी काही बंधनं मात्र आपल्याला स्वत:वर घालावी लागतील, आपल्याला शिस्तीची जास्त गरज आहे. मुलांची, ज्येष्ठांची काळजी घेताना तरुण बाहेर पडत आहेत. त्यांना लक्षणे दिसत नसली तरी त्यांच्यामुळे अन्य लोकांना बाधा होऊ शकते. काळजी घेणे अपरिहार्य आहे, असं ते म्हणाले.
राजकारण
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
आणखी पाहा


















