एक्स्प्लोर
भारत आणि चीनमध्ये साखर निर्यातीचा कर | 712 | एबीपी माझा
भारताकडून 20 लाख टन कच्ची साखर खरेदी करण्याचा निर्णय चीन सरकारनं घेतलाय. वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांत याबाबत करार करण्यात आलाय. या करारामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पंधरा लाख टन कच्ची साखर जानेवारी महिन्यात चीनला निर्यात होणार असल्याची माहिती आहे. कच्च्या साखरेच्या निर्यातीमुळे पांढऱ्या साखरेचे उत्पादन कमी होईल आणि बाजारात साखरेचे दर स्थिर राहतील. त्यामुळे ऊस उत्पादकांना एफआरपी देणं साखर कारखान्यांना शक्य होणारेय. साखर उद्योगाकडून या कराराचं जोरदार स्वागत केलं जातंय. साखरेचे दर स्थिर राहावेत यासाठी केंद्र सरकारला एकूण पन्नास लाख टन साखर निर्यात करायची आहे. यापैकी वीस लाख टन साखरेची खरेदी एकटा चीन करतोय.
ट्रेडिंग न्यूज
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?
Ashok Kharat Nashik : सुशिक्षित महिला भोंदू बाबांच्या जाळ्यात का अडकतात? पिडीत महिलेचा थरारक खुलासा!
Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
आणखी पाहा

















