एक्स्प्लोर

T20 World Cup 2022: सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतरही टीम इंडियाला 'इतक्या' रुपयांचं बक्षीस!

T20 World Cup 2022 Prize Money: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे.

T20 World Cup 2022 Prize Money: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. पाकिस्ताननं उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला. तर, इंग्लंडनं भारताविरुद्ध 10 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेतील विजेता संघाला 1.6 मिलियन म्हणजेच जवळपास 13 कोटी रुपये मिळतील. तर, रनरअप संघाला सुमारे 0.8 मिलियन रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. 

याशिवाय, सेमीफायनलमध्ये पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडलेल्या दोन संघांना प्रत्येकी $400,000 आणि अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या आणि सुपर 12 टप्प्यात बाहेर पडलेल्या इतर आठ संघांना प्रत्येकी $70,000 मिळतील. म्हणजेच, सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध पराभूत झालेल्या भारतीय संघाला 0.4 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास 3.26 कोटी रुपये मिळणार आहेत. 

टी-20 विश्वचषकातील बक्षीसांची संपूर्ण यादी:

संघ बक्षीस भारतीय चलनानुसार
विजेता 1.6 मिलियन डॉलर जवळपास 13 कोटी
उप- विजेता 0.8 मिलियन डॉलर जवळपास 6.5 कोटी
सेमीफायनलमध्ये पराभूत झालेला संघ 0.4 मिलियन डॉलर जवळपास 3.26 कोटी
सुपर-12 मध्ये प्रत्येक सामना जिंकणारा संघ 40 हजार डॉलर जवळपास 33.62 लाख
सुपर-12 मधून बाहेर पडणारा प्रत्येक संघ 70 हजार डॉलर जवळपास 57.09 लाख
पहिल्या फेरीत प्रत्येक सामना जिंकणारा संघ 40 हजार डॉलर जवळपास 33.62 लाख
पहिल्या फेरीतून बाहेर पडलेला संघ 40 हजार डॉलर जवळपास 33.62 लाख

 

फायनलमध्ये पाऊस पडला किंवा सामना टाय झाला तर...
आयसीसीच्या निवेदनानुसार, 'इव्हेंट टेक्निकल कमिटीने निर्णय घेतला आहे की, सामना पूर्ण करण्यासाठी आणि निकाल मिळविण्यासाठी अंतिम सामन्याच्या अतिरिक्त दिवसाच्या वेळेत दोन ते चार तासांपर्यंत वाढ केली जाऊ शकतो. टी-20 विश्वचषकातील अंतिम सामना पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या दरम्यान,आवश्यक षटकं देखील कापली जातील, परंतु निर्धारित दिवशी किमान षटके टाकली गेली नाहीत, तर सामना राखीव दिवशी खेळला जाईल." दरम्यान, साखळी सामन्यांमध्ये सामन्यांचा निकाल लावण्यासाठी पाच षटकांचा खेळ होणं गरजेचं होतं. त्यानंतर नॉकआऊट सामन्यात किमान 10 षटकांच्या खेळानंतरच सामन्याचा निकाल लावला जाईल, असा नियम होता. अंतिम सामन्यात दोन्ही संघामध्ये 10 षटके खेळली पाहिजेत. पण पावसामुळं दोन्ही दिवस खेळ झाला नाही तर, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ट्रॉफी विभागून दिली जाईल, असा आयसीसीचा नियम आहे. 

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

DC Vs CSK: सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा

व्हिडीओ

Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha
RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report
West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DC Vs CSK: सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
Embed widget