एक्स्प्लोर

BCCI: रोहित, विराटसह राहुल द्रविड यांची विचारपूस होणार; इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआय नाराज

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील सेमीफायनलचा सामना गमावून भारतीय संघानं (Team India) कोट्यवधी चाहत्यांना नाराज केलं.

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील सेमीफायनलचा सामना गमावून भारतीय संघानं (Team India) कोट्यवधी चाहत्यांना नाराज केलं. अॅडिलेड येथे खेळेल्या गेलेल्या या सामन्यात भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेय बीसीसीआयनं नाराजी व्यक्त केलीय. इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय लवकरच आढावा बैठक घेणार आहे. या बैठकीला प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली सामोरे जाणार आहेत.या बैठकीत बोर्डाचे सचिव जय शहा संघाच्या खराब कामगिरीचा आढावा घेणार आहेत.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलंय की, “आम्ही एक बैठक घेणार आहोत. सेमीफायनलच्या पराभवातून आम्ही अद्याप सावरलेलो नाही. संघात बदल हवा आहे. या पुनरावलोकनात संघाचं ऐकून घेणं महत्वाचं आहे.संघाचं म्हणणे ऐकल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. यासाठी संघाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून माहिती घेऊन भविष्यातील टी-20 संघ तयार केला जाईल.

संघ निवडीमुळं बीसीसीआय नाराज
या स्पर्धेनंतर बीसीसीआय निवड समितीवर नाराज असल्याचं दिसून आलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय निवड समितीवर नाराज असल्याचे सांगण्यात आलंय. या बैठकीत निवड समितीच्या कामगिरीचाही आढावा घेतला जाणार आहे. सध्या चेतन शर्मा हे वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष असून त्यांना या पदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे. मात्र, चेतन शर्मा या बैठकीला उपस्थित राहणार की नाही? याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. 

खराब कामगिरी रोखण्यासाठी आवश्यक निर्णय
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही कोणा एका खेळाडूचा विचार करत नाही, आम्ही संपूर्ण संघाचा विचार करत आहोत. खेळाडू स्वतः निर्णय घेऊ शकतात. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यासह इतर नॉक आऊट सामन्यातील खराब कामगिरी रोखण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील.

पुन्हा भारताचं दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं
इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचं दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलंय. टी-20 सेमीफानयलच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरआणि अॅलेक्स हेल्सनं वादळी खेळी भारतासाठी फायनलचे दरवाजे बंद केले. जोस बटलर (नाबाद 80 धावा) आणि अॅलेक्स हेल्सनं (नाबाद 86 धावा) वादळी अर्धशतकीय खेळी करत भारताला 10 विकेट्सनं पराभूत केलं. भारतानं अखेरचं 2014 मध्ये टी-20 विश्वचषकातील अंतिम सामना खेळला, जिथे त्यांना श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget