एक्स्प्लोर

BCCI: रोहित, विराटसह राहुल द्रविड यांची विचारपूस होणार; इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआय नाराज

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील सेमीफायनलचा सामना गमावून भारतीय संघानं (Team India) कोट्यवधी चाहत्यांना नाराज केलं.

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील सेमीफायनलचा सामना गमावून भारतीय संघानं (Team India) कोट्यवधी चाहत्यांना नाराज केलं. अॅडिलेड येथे खेळेल्या गेलेल्या या सामन्यात भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेय बीसीसीआयनं नाराजी व्यक्त केलीय. इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय लवकरच आढावा बैठक घेणार आहे. या बैठकीला प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली सामोरे जाणार आहेत.या बैठकीत बोर्डाचे सचिव जय शहा संघाच्या खराब कामगिरीचा आढावा घेणार आहेत.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलंय की, “आम्ही एक बैठक घेणार आहोत. सेमीफायनलच्या पराभवातून आम्ही अद्याप सावरलेलो नाही. संघात बदल हवा आहे. या पुनरावलोकनात संघाचं ऐकून घेणं महत्वाचं आहे.संघाचं म्हणणे ऐकल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. यासाठी संघाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून माहिती घेऊन भविष्यातील टी-20 संघ तयार केला जाईल.

संघ निवडीमुळं बीसीसीआय नाराज
या स्पर्धेनंतर बीसीसीआय निवड समितीवर नाराज असल्याचं दिसून आलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय निवड समितीवर नाराज असल्याचे सांगण्यात आलंय. या बैठकीत निवड समितीच्या कामगिरीचाही आढावा घेतला जाणार आहे. सध्या चेतन शर्मा हे वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष असून त्यांना या पदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे. मात्र, चेतन शर्मा या बैठकीला उपस्थित राहणार की नाही? याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. 

खराब कामगिरी रोखण्यासाठी आवश्यक निर्णय
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही कोणा एका खेळाडूचा विचार करत नाही, आम्ही संपूर्ण संघाचा विचार करत आहोत. खेळाडू स्वतः निर्णय घेऊ शकतात. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यासह इतर नॉक आऊट सामन्यातील खराब कामगिरी रोखण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील.

पुन्हा भारताचं दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं
इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचं दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलंय. टी-20 सेमीफानयलच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरआणि अॅलेक्स हेल्सनं वादळी खेळी भारतासाठी फायनलचे दरवाजे बंद केले. जोस बटलर (नाबाद 80 धावा) आणि अॅलेक्स हेल्सनं (नाबाद 86 धावा) वादळी अर्धशतकीय खेळी करत भारताला 10 विकेट्सनं पराभूत केलं. भारतानं अखेरचं 2014 मध्ये टी-20 विश्वचषकातील अंतिम सामना खेळला, जिथे त्यांना श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. 

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
IND vs SA : आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत रोहित- यशस्वी सलामीला येणार? कॅप्टन केएल राहुल 'या' स्थानावर फलंदाजीला येणार, संभाव्य प्लेईंग XI
केएल राहुलचं ठरलं, पहिल्या वनडेत या स्थानावर फलंदाजी करणार, रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार? 
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळली कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळली कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
MVA News : काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआत नाराजीनाट्य, उद्धव ठाकरे, शरद पवारांची नाराजी
Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
IND vs SA : आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत रोहित- यशस्वी सलामीला येणार? कॅप्टन केएल राहुल 'या' स्थानावर फलंदाजीला येणार, संभाव्य प्लेईंग XI
केएल राहुलचं ठरलं, पहिल्या वनडेत या स्थानावर फलंदाजी करणार, रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार? 
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळली कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळली कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
Gold Rate : सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Kolhapur News:  नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
कोल्हापूर : नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
भाजपचा एखादा नगरसेवक निवडून आला तर खूप झालं; जळगावात भाजप अन् शिवसेनेत जुंपली, नेते आमने-सामने
भाजपचा एखादा नगरसेवक निवडून आला तर खूप झालं; जळगावात भाजप अन् शिवसेनेत जुंपली, नेते आमने-सामने
Embed widget