एक्स्प्लोर

Rohit Sharma : लिटन दासची फटकेबाजी बघून नर्व्हस झाला होता कॅप्टन रोहित, म्हणाला भारताच्या विजयात 'ही' गोष्ट ठरली महत्त्वाची

T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेडमध्ये भारतानं बांगलादेशवर 5 धावांनी विजय मिळवला आहे. भारत सामना जिंकला असला तरी अखेरपर्यंत सामना कोण जिंकेल हे सांगता येत नव्हतं.

IND vs BANG, Match Highlights : भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) सामन्यात भारतानं 5 धावांनी विजय मिळवत पुन्हा एकदा विश्वचषक स्पर्धेत (T20 WC) दमदार पुनरागमन केलं आहे. ग्रुप 2 च्या गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवत भारत सेमीफायनलमध्ये एन्ट्रीसाठी सज्ज झाला आहे. पण हा विजय भारताला सहजासहजी मिळाला नाही, अगदी रंगतदार झालेल्या आजच्या सामन्यात क्रिकेट रसिकच नाही तर खेळाडूही नर्व्हस झाले होते. कर्णधार रोहितनं सामन्यानंतर बोलताना तोही सामन्यात बराच नर्व्हस झाला असल्याचं सांगितलं.

बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर पोस्ट मॅच प्रेजंटेशनमध्ये बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ''सामन्यात मी शांत आणि नर्व्हसही होतो. हा सामना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता, आम्ही आमच्या रणनीतीवर काम करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यात पावसानंतर बांगलादेशच्या 10 विकेट शिल्लक होत्या, त्यामुळे सामना दोन्ही बाजूने जाऊ शकला असता.'' हे बोलतना रोहितनं अर्शदीपचं खास कौतुक केलं. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत रोहितनं अर्शदीपचं तोंडभरुन कौतुक केलं. रोहितनं अर्शदीपसह विराट कोहली आणि केएल राहुलचंही कौतुक केलं.

भारताच्या विजयात 'ही' गोष्ट ठरली महत्त्वाची

भारताच्या विजयात महत्त्वाची गोष्टी टीम इंडियाची फिल्डींग ठरल्याचं रोहित शर्मा म्हणाला. भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाबाबत रोहित शर्मा म्हणाला की, या सामन्यात आमची फिल्डींग उत्कृष्ट होती. आमच्या खेळाडूंनी महत्त्वपूर्ण सामन्यात उत्कृष्ट झेल घेतले, रनआऊट केले. मला संघाच्या क्षेत्ररक्षणावर कधीच शंका नव्हती. आमच्या विजयात उत्तम फिल्डींग महत्त्वाची ठरली.

भारताचा 5 धावांनी विजय

नाणेफेक जिंकून बांगलादेशनं पहिली गोलंदाजी घेतली. मग आधी फलंदाजी करत भारतानं 184 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या बांगलादेशनं सुरुवात चांगली केली. सलामीवीर लिटन दासनं एकहाती सामना बांगलादेशला जिंकवण्याचा संपूर्ण प्रयत्न केला, पण केएलनं केलेनं 8 व्या षटकांत केलेल्या एका थरारक थ्रोनं दासला धावचीत केलं आणि तिथून सामना फिरला. पाऊस थांबल्यावर DLS मेथडनुसार बांगलादेशला 16 षटकात 151 धावा करायच्या होत्या. पण भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळं 16 षटकात बांगलादेश 145 धावाच करु शकला आणि ज्यामुळं भारतानं 5 धावांनी जिंकला. 

देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget