एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Women's T20 World Cup | भारतीय संघाची पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाशी होणार अंतिम मुकाबला
भारतीय संघाने महिला टी 20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम रचला. या आधी 2018 च्या टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता.
![Women's T20 World Cup | भारतीय संघाची पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाशी होणार अंतिम मुकाबला Women's T20WorldCup first time in their history, India have qualified for final Women's T20 World Cup | भारतीय संघाची पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाशी होणार अंतिम मुकाबला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/05224648/team-india-q.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सिडनी : भारतीय महिलांनी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारत आणि इंग्लंड संघांमधला विश्वचषकाचा उपांत्य सामना पावसामुळं एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. त्यानंतर साखळीतल्या सर्वोत्तम कामगिरीच्या निकषावर भारतीय संघाला फायनलचं तिकीट देण्यात आलं. भारतानं अ गटातल्या चारपैकी चारही सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. पण इंग्लंडला ब गटातल्या चारपैकी तीनच सामन्यांत विजय मिळवता आला होता. इंग्लंडनं एका सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार स्वीकारली होती. तिकडे ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेवर शानदार विजय मिळवत फायनल गाठली आहे. ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेवर पाच धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. आता भारताचा सामना 8 मार्च रोजी मेलबर्नला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
IND vs SL, ICC Women's T20 WC | टीम इंडियाचा सलग चौथा विजय, श्रीलंकेचा सात विकेट्सने धुव्वा
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय महिलांनी आजवर कधीही फायनलमध्ये धडक मारलेली नव्हती. फायनलच्या या उंबरठ्यावर भारतासमोर लागोपाठ दुसऱ्यांदा इंग्लंडचं आव्हान होतं. 2018 सालच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात इंग्लंडनं भारताचं आव्हान उपांत्य फेरीतंच संपुष्टात आणलं होतं. पण त्याआधीही ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताला इंग्लंडला कधीच हरवता आलेलं नव्हतं. इंग्लंडचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातला भारताविरुद्धचा रेकॉर्ड हा 5-0 असा आहे. यंदाच्या स्पर्धेत साखळी फेरीत भारतीय संघ अजिंक्य होता, पण इंग्लंडने 2009, 2012, 2014, 2016 आणि2018च्या विश्वचषकात भारताला हरवले होते.
आजच्या सेमीफायनलच्या सामन्यावर पावसाचं सावट सकाळपासूनच होतं. या परिसरात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. अपेक्षेप्रमाणे. पावसामुळे सामना रद्द झाला. गुणांच्या तुलनेनुसार भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान मिळाले. साखळी फेरीत भारताने 4 सामने जिंकत 8 गुण मिळवले होते. तर इंग्लंडने 3 सामने जिंकून 6 गुण मिळवले होते. त्यामुळे स्पर्धेच्या नियमांच्या आधारावर भारतीय संघाला अंतिम फेरीत धडक मारली.
Women's T20 World Cup | भारतीय संघाची विजयी हॅट्रीक; सेमीफायनमध्ये एन्ट्री
सबंधित बातम्या :
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion