एक्स्प्लोर

Tulsidas Balaram : दिग्गज भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; एशियन गेम्ससह ऑलिम्पिकमध्ये सहभाग

Tulsidas Balaram Passes Away : तुलसीदास बलराम यांनी 1962 साली आशियाई खेळांमध्ये भारताचं नाव सुवर्ण पदकावर कोरलं. त्यांनी 1956 आणि 1960 साली ऑलिम्पिक खेळांमध्येही भाग घेतला होता.

Indian footballer Tulsidas Balaram Passes Away : दिग्गज भारतीय फुटबॉलपटू (Legendary Indian Footballer) तुलसीदास बलराम (Tulsidas Balaram) यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बलराम यांनी ऑलिम्पिक (Olympic) आणि आशियाई खेळांमध्ये (Asian Games) भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तुलसीदास बलराम यांच्या निधनाने क्रिडा जगतावर शोककळा पसरली आहे. तुलसीदास बलराम यांचं मल्टीपल ऑर्गन फेलिअर (Multiple Organ Failure) झाल्याने निधन झालं आहे. त्यांच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. तुलसीदास बलराम यांना डिसेंबर महिन्यामध्ये पोट आणि लघवी संबंधित समस्येमुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं.

तुलसीदास बलराम यांच्या निधनाने क्रिडा जगतावर शोककळा 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 डिसेंबर रोजी प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना युरिनरी इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर येत आहे. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यानंतर त्यांनी गुरुवारी 16 फेब्रुवारी रोजी दुपारी अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सूचनेनुसार क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अरुप बिस्वास सतत संपर्कात होते आणि त्यांना सर्वतोपरी मदत करत होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बलराम यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

50 आणि 60 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट भारतीय फुटबॉलपटू

दिग्गज भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम 50 आणि 60 च्या दशकातील भारतातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक होते. बलराम यांनी मेलबर्न येथे 1956 ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केलं. यावेळी भारत चौथ्या स्थानावर होता. फुटबॉलमधील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी होती.

आशियाई खेळांमध्ये भारताला पदक

तुलसीदास बलराम यांनी 1962 साली आशियाई खेळांमध्ये भारताचं नाव सुवर्ण पदकावर कोरलं. त्यांनी 1956 आणि 1960 साली ऑलिम्पिक खेळांमध्येही भाग घेतला होता. बलराम यांनी 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्येही भाग घेतला होता. यावेळी त्यांनी हंगेरीविरुद्ध भारताचा पहिला गोल केला होता. तसेच पेरूविरुद्धच्या अंतिम गट सामन्यात त्यांनी पुन्हा गोल केला. 1960 च्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने केलेल्या तीन गोलपैकी दोन गोल बलराम यांच्या नावावर होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget