एक्स्प्लोर

भारत नव्हे, आकडे बोलतात, पाकिस्तानमधले टीव्ही पुन्हा फुटणार!

मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये महामुकाबला होणार आहे. या सामन्यांपूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह आहे. प्रत्येक जण आपलाच संघ जिंकणार, असा दावा करत आहे. मात्र गेल्या काही दिवसांतील आकडेच सांगतात, की पाकिस्तानमधले टीव्ही यावर्षी पुन्हा एकदा फुटणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान या लढतीत जुने काही विक्रम पाकिस्तानच्या बाजूने असले तरी सध्याचं चित्र वेगळं आहे. सध्याची विराट ब्रिगेड पाकिस्तानच्या टीमवर कशी तुटून पडते, त्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या वन डेमध्ये आला होता. त्यामुळे ताजे आकडे भारतासाठी समाधानाची बाब आहे. भारताकडून चॅम्पियन्स ट्रॉफीत दारुण पराभव भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील लढतीचं ताजं उदाहरण म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ब गटातील सामन्यात भारताने पाकिस्तानला दारुण पराभवाची धूळ चारली होती. या सामन्यात अगोदर भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजी धुलाई केली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. चॅम्पियन्स ट्रॉफीतील हे ताजं उदाहरण यासाठी महत्वाचं आहे, कारण तेच खेळाडू पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यापूर्वीचे विक्रम काहीही सांगत असले, तरी आता परिस्थिती वेगळी असेल. त्यामुळे गेल्या सामन्यातील पराभवाचा दबावही पाकिस्तानवर असेल. भारताचे विक्रम चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयसीसी विश्वचषकातील आकडे पाहिले तर भारतच वरचढ असल्याचं दिसून येतं. या दोन्ही टूर्नामेंटमध्ये गेल्या 4 सामन्यांमध्ये भारतानेच विजय मिळवला आहे. फायनलमध्ये पाकिस्तानचा भारताला धोका फायनल सामन्यांच्या बाबतीत पाकिस्तानची आकडेवारी चांगली आहे. भारताने आतापर्यंत वन डे फायनलमध्ये 3 विजय मिळवले आहेत, तर पाकिस्तानच्या नावावर 7 विजय आहेत. मात्र भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे गेल्या पाच सामन्यांपैकी भारताने 4 सामन्यांमध्ये विजयाची नोंद केली आहे. तर चॅम्पियन्स ट्रॉफीत उभय संघांच्या नावावर समसमान विजय आहेत. टॉप फलंदाजांमध्ये पाकिस्तानचा एकही खेळाडू नाही यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 फलंदाजांमध्ये भारताचे तीन फलंदाज आहेत. तर पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाचा समावेश या यादीत नाही. पहिल्या स्थानावर शिखर धवन, दुसऱ्या स्थानावर रोहित शर्मा, तर पाचव्या स्थानावर विराट कोहली आहे. पाकिस्तानचं त्यांच्याच माजी खेळाडूंकडून खच्चीकरण  पाकिस्तानने भारताविरुद्ध जिंकण्यासाठी कंबर कसली असली तरी त्यांच्याच देशाचे माजी क्रिकेटर पाकिस्तानचं खच्चीकरण करणं थांबवत नाहीयेत. पाकिस्तानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचल्याबद्दल पाकिस्तानचेच माजी कर्णधार आमीर सोहेल यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. एका टीव्ही चॅनलच्या चर्चेदरम्यान ते अप्रत्यक्षरित्या म्हणाले की, पाकिस्तानी संघ मॅच फिक्स करुन फायनलमध्ये पोहोचला आहे. आमीर सोहेल यांनी एका टीव्ही चॅनलच्या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, “पाकिस्तानचा संघ आणि कर्णधार सरफराज अहमदला अशाप्रकारे आनंद साजरा करायला नको. हा संघ दुसऱ्या कारणांमुळे सामना जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला आहे, आपल्या खेळामुळे नाही.” आता या दुसऱ्या कारणांमध्ये त्यांचा इशारा मॅच फिक्सिंगकडे आहे. “ही सरफराजची कमाल नाही, तर पाकिस्तानच्या संघाला हा सामना दुसऱ्या कोणतरी जिंकून दिला आहे. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की मैदानाच्या बाहेर काय घडतं,” असं आमीर सोहेल म्हणाले. दुसरीकडे साखळी सामन्यात भारताकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाकिस्तानचे माजी खेळाडू चांगलेच भडकले होते. भारताकडून पराभव झाला असला तरी एवढ्या अंतराने कधीही झाला नव्हता, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : मॅच तिथंच संपली होती, भारताच्या पराभवाचं कारण काय? आकाश चोप्राचं रोखठोक विश्लेषण, दोन खेळाडूंचं  नाव घेतलं...
मॅच तिथंच संपली होती, भारताच्या पराभवाचं कारण काय? आकाश चोप्राचं रोखठोक विश्लेषण, दोन खेळाडूंचं  नाव घेतलं...
Prithvi Shaw-Akriti Agarwal Row : मार्चमध्ये अंगठी घातली, जुलैमध्ये सगळंच संपवलं; पृथ्वी शॉने होणाऱ्या बायकोला फसवलं? आकृती अग्रवालच्या इन्स्टा पोस्टमुळे खळबळ, नेमकं काय म्हणाली?
मार्चमध्ये अंगठी घातली, जुलैमध्ये सगळंच संपवलं; पृथ्वी शॉने होणाऱ्या बायकोला फसवलं? आकृती अग्रवालच्या इन्स्टा पोस्टमुळे खळबळ, नेमकं काय म्हणाली?
ENG vs IND 3rd T20 : भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या सामन्याची वेळ बदलली! आता 7 वाजता नाही, तर 3 तास उशिरा सुरू होणार मॅच, जाणून घ्या A टू Z
भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या सामन्याची वेळ बदलली! आता 7 वाजता नाही, तर 3 तास उशिरा सुरू होणार मॅच, जाणून घ्या A टू Z
Sri Lanka A vs India A 2nd Test : एकाने धावा केल्या, दुसऱ्याने 10 विकेट्स घेतल्या; सुदर्शन-गुरनूर ब्रारने श्रीलंकेच्या संपूर्ण टीमला गुडघ्यावर आणले, टीम इंडियाचा एकतर्फी विजय
एकाने धावा केल्या, दुसऱ्याने 10 विकेट्स घेतल्या; सुदर्शन-गुरनूर ब्रारने श्रीलंकेच्या संपूर्ण टीमला गुडघ्यावर आणले, टीम इंडियाचा एकतर्फी विजय

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Nitesh Rane: 'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
Embed widget