एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
पंड्या आणि राहुलच्या निलंबनानंतर ‘या’ दोन खेळाडूंची संघात निवड
अॅडलेडच्या दुसऱ्या वन डेआधी विजय शंकर ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. तर शुभमन गिल हा न्यूझीलंड दौऱ्याआधी भारतीय संघात सामील होईल. भारतीय संघात निवड होण्याची शुभमन गिलची ही पहिलीच वेळ ठरली आहे. शुभमननं यंदाच्या मोसमात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नऊ सामन्यात एक हजार 89 धावांचा रतीब घातला आहे.
![पंड्या आणि राहुलच्या निलंबनानंतर ‘या’ दोन खेळाडूंची संघात निवड Shubman Gill earns India call up for NZseries Vijay Shankar replaces Hardik Pandya in Australia पंड्या आणि राहुलच्या निलंबनानंतर ‘या’ दोन खेळाडूंची संघात निवड](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/13172211/shubamn-gill.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : महिलांविरोधात आक्षेपार्ह विधानांप्रकरणी निलंबित केलेल्या टीम इंडियाच्या अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि सलामीवीर फलंदाज केएल राहुल यांच्याजागी तामिळनाडूचा विजय शंकर आणि पंजाबचा युवा खेळाडू शुभमन गिलची भारतीय संघात निवड केली आहे.
स्टार वर्ल्डवरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानांप्रकरणी हार्दिक आणि राहुलला बीसीसीआयकडून निलंबित करण्यात आलं होतं. त्यामुळे त्या दोघांच्या जागी गिल आणि विजय शंकरची संघात निवड करण्यात आली आहे.
अॅडलेडच्या दुसऱ्या वन डेआधी विजय शंकर ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. तर शुभमन गिल हा न्यूझीलंड दौऱ्याआधी भारतीय संघात सामील होईल. भारतीय संघात निवड होण्याची शुभमन गिलची ही पहिलीच वेळ ठरली आहे. शुभमननं यंदाच्या मोसमात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नऊ सामन्यात एक हजार 89 धावांचा रतीब घातला आहे.
हार्दिक पंड्या आणि केएल राहुलचं बीसीसीआयकडून निलंबन, काय आहे प्रकरण?
25 वर्षीय हार्दिक पंड्या केएल राहुलसह चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये आला होता. या शोमध्ये त्याने अनेक वादग्रस्त टिप्पणी केल्या होत्या. "एकच मेसेज अनेक मुलींना पाठवण्यात मला काहीच अडचण नाही आणि मी त्यांच्याशी त्यांच्या 'उपलब्ध' असण्याबाबत खुलेआम चर्चा करतो," असं हार्दिकने शोमध्ये सांगितलं.
आपण अनेक महिलांसोबत रिलेशनशिप होतो आणि ही बाब पालकांनाही माहित असल्याची कबुली हार्दिक पंड्याने शोमध्ये दिली. तो म्हणाला की, "जेव्हा मी कौमार्य गमावलं, त्यावेळी आई-वडिलांना 'आज मी करुन आलोय' असं सांगितलं होतं.
यानंतर सोशल मीडियावर हार्दिक पंड्याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. या टिप्पणीनंतर सगळ्यांनीच सोशल मीडियावर त्याची शाळा घेतली. आपली चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने बुधवारी एका ट्वीटच्या माध्यमातून खेद व्यक्त करत माफी मागितली. "कॉफी विद करणध्ये माझ्या टिप्पणीमुळे जे दुखावले किंवा ज्यांना अपमान झाल्याचं वाटलं त्या सगळ्यांची माफी मागतो. मी जरा जास्तच बोललो. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. सन्मान"
संबधित बातम्या
करणची कॉफी भोवली, पंड्या आणि राहुल निलंबित
राहुल-पंड्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर विराटची प्रतिक्रिया
हार्दिक आणि राहुलवर दोन वनडे सामन्यांच्या बंदीची शिफारस
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)