Shahid Afridi: 'भारताला चार गुजराती चालवत आहेत, दोन विकत आहेत, दोन विकत घेताहेत', शाहीद आफ्रिदीची स्फोटक टीका, काय-काय बोलला?
Shahid Afridi explosive criticism: भारतावर कायम गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेहमीप्रमाणे तो भारताविरुद्ध गरळ ओकत आहे.

Shahid Afridi Explosive Criticism: माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू सुरुवातीला आनंदी होते की त्यांच्या देशाने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला. त्यांना वाटले की यामुळे बीसीसीआय किंवा आयसीसीवर दबाव येईल, परंतु त्याऐवजी, पीसीबीवर दबाव वाढला आणि शेवटी, त्यांना भारताविरुद्ध खेळण्यास सहमती द्यावी लागली. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याभोवतीचा वाद गेल्या काही काळापासून सुरूच आहे. पाकिस्तानने 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती, परंतु आता खेळण्यास सहमती दर्शवत आपल्या निर्णयावर यू-टर्न घेतला आहे. दरम्यान, भारतावर कायम गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेहमीप्रमाणे तो भारताविरुद्ध गरळ ओकत आहे.
भारत फक्त चार गुजराती चालवत आहेत
आफ्रिदीचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो म्हणतो की भारत फक्त चार गुजराती चालवत आहे. शाहिद आफ्रिदी भारताविरुद्ध गरळ ओकताना पाकिस्तानी टीव्ही चॅनेल 'समा'वरील एका कार्यक्रमादरम्यान म्हणाला, "भारताला चार गुजराती चालवत आहेत. दोघे विकत आहेत आणि दोघे विकत घेत आहेत.तळाशी काम करणाऱ्या लोकांना या चौघांना खूश करायचे असेल, तर गोष्टी अशा प्रकारे चालत नाहीत."
Pakistani reporter asked to Shahid Afridi🎙; Why we lose every single time against India, It's now become a dream to win against India...
— Gillfied⁷ (@Gill_Iss) February 10, 2026
Shahid Afridi🎙; "Hum p@ida hi harne ke lie hue hai"...Phle hum haarte the ab humare ladke haar rhe h😭😂🔥
pic.twitter.com/T6qsVhB4sp
15 फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्तान सामना
दरम्यान, टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान एकाच गटात (अ) आहेत. दोघांमधील सामना 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. पाकिस्तानने सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर, सूर्यकुमार यादवने स्पष्टपणे सांगितले की विरोधी संघ आला किंवा नाही तरी टीम इंडिया सामना खेळेल. भारत सुरुवातीपासूनच ठाम राहिला, परंतु अखेर पाकिस्तानला झुकावे लागले. दुसरीकडे, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू सुरुवातीला आनंदी होते की त्यांच्या देशाने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला. त्यांना वाटले की यामुळे बीसीसीआय किंवा आयसीसीवर दबाव येईल, परंतु त्याऐवजी, पीसीबीवर दबाव वाढला आणि शेवटी, त्यांना भारताविरुद्ध खेळण्यास सहमती द्यावी लागली.
इतर महत्वाच्या बातम्या
























