एक्स्प्लोर

IND vs PAK: काय म्हणता? भारत-पाक विश्वचषकात पुन्हा भिडणार! पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटरचा दावा 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अतिशय रोमांचक सामना खेळला गेला जो शेवटच्या चेंडूवर भारतानं जिंकला. या सामन्याची चर्चा जगभरात झाली अन् अजूनही होतेय.

India vs Pakistan: टीम इंडियानं T20 विश्वचषक स्पर्धेत आपली सुरुवात जोरदार केली आहे. टीम इंडियानं पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात अतिशय रोमांचक सामना खेळला गेला जो शेवटच्या चेंडूवर भारतानं जिंकला. या सामन्याची चर्चा जगभरात झाली अन् अजूनही होतेय. या विजयानंतर भारतीय संघ आणि चाहते खूप उत्साहात होते. त्यामुळे तिथे पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानचे चाहते आणि अनेक माजी क्रिकेटपटू निराश झालेले दिसले. अशात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने दावा केला आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2022 टी-20 विश्वचषकात पुन्हा एकदा सामना होणार आहे.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर दावा केला आहे की, भारताने एक सामना जिंकला आहे, तर पाकिस्तान हरला आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा भिडणार आहेत. शोएब म्हणाला की, जेव्हा भारत आणि पाकिस्तान खेळतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने विश्वचषक सुरू होतो. इतिहासातील हा सर्वात खास सामना होता. मेलबर्नमध्ये विकेट खूपच खराब होती, असंही शोएब म्हणाला. पाकिस्तानने 160 धावा केल्या होत्या. पाकिस्तानची खालची मधली फळी चांगली खेळू शकली नाही. संघाला अधिक धावा करता आल्या असत्या. पाकिस्तानने या सामन्यातील पराभव स्वीकारून पुढील सामन्याचे नियोजन करावे, असा सल्लाही त्यानं दिला. 
 
पाकचा माजी खेळाडू वसीम अक्रमनं म्हटलं आहे की, मैदानावरील पंचांनी नो-बॉल देण्यापूर्वी तिसऱ्या पंचाची मदत घ्यायला हवी होती. तो म्हणाला, 'बॉल खाली येताना दिसत होता. फलंदाज नो-बॉलची मागणी करेल पण तुमच्याकडे तंत्रज्ञान असेल तर तुम्ही ते वापरायला हवे होते, असंही वसीमनं म्हटलं आहे. 

तर वकार युनूसनं म्हटलं आहे की, 'स्क्वेअर लेग अंपायरने आधी मुख्य पंचांशी चर्चा करायला हवी होती. त्यानंतर तो थर्ड अंपायरकडे जाऊ शकला. थर्ड अंपायर बसले आहेत. हा निर्णय त्यांच्यावर सोडायला हवा होता. 

T20 विश्वचषकात टीम इंडियानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना रोमांचक पद्धतीनं 4 गडी राखून जिंकला होता. या विजयात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा सर्वात मोठा हात होता. कोहलीने 53 चेंडूत 82 धावांची खेळी केली. धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने 19व्या षटकात वेगवान गोलंदाज हारिस रौफच्या चेंडूवर दोन षटकार ठोकले. 

ही बातमी देखील वाचा- हार्दिक पांड्या म्हणतो, 'रौफला ते दोन सिक्सर फक्त विराटच मारु शकतो, मी तर सुन्नच झालेलो'

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार

व्हिडीओ

Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Embed widget