![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IND vs PAK: काय म्हणता? भारत-पाक विश्वचषकात पुन्हा भिडणार! पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटरचा दावा
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अतिशय रोमांचक सामना खेळला गेला जो शेवटच्या चेंडूवर भारतानं जिंकला. या सामन्याची चर्चा जगभरात झाली अन् अजूनही होतेय.
![IND vs PAK: काय म्हणता? भारत-पाक विश्वचषकात पुन्हा भिडणार! पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटरचा दावा Pakistan will play against Indian in This T20 world Cup again said Shoaib akhtar IND vs PAK IND vs PAK: काय म्हणता? भारत-पाक विश्वचषकात पुन्हा भिडणार! पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटरचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/28/deeb37af9a6069ae0c7e5730e9c28bda1661671629987224_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs Pakistan: टीम इंडियानं T20 विश्वचषक स्पर्धेत आपली सुरुवात जोरदार केली आहे. टीम इंडियानं पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात अतिशय रोमांचक सामना खेळला गेला जो शेवटच्या चेंडूवर भारतानं जिंकला. या सामन्याची चर्चा जगभरात झाली अन् अजूनही होतेय. या विजयानंतर भारतीय संघ आणि चाहते खूप उत्साहात होते. त्यामुळे तिथे पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानचे चाहते आणि अनेक माजी क्रिकेटपटू निराश झालेले दिसले. अशात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने दावा केला आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2022 टी-20 विश्वचषकात पुन्हा एकदा सामना होणार आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर दावा केला आहे की, भारताने एक सामना जिंकला आहे, तर पाकिस्तान हरला आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा भिडणार आहेत. शोएब म्हणाला की, जेव्हा भारत आणि पाकिस्तान खेळतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने विश्वचषक सुरू होतो. इतिहासातील हा सर्वात खास सामना होता. मेलबर्नमध्ये विकेट खूपच खराब होती, असंही शोएब म्हणाला. पाकिस्तानने 160 धावा केल्या होत्या. पाकिस्तानची खालची मधली फळी चांगली खेळू शकली नाही. संघाला अधिक धावा करता आल्या असत्या. पाकिस्तानने या सामन्यातील पराभव स्वीकारून पुढील सामन्याचे नियोजन करावे, असा सल्लाही त्यानं दिला.
पाकचा माजी खेळाडू वसीम अक्रमनं म्हटलं आहे की, मैदानावरील पंचांनी नो-बॉल देण्यापूर्वी तिसऱ्या पंचाची मदत घ्यायला हवी होती. तो म्हणाला, 'बॉल खाली येताना दिसत होता. फलंदाज नो-बॉलची मागणी करेल पण तुमच्याकडे तंत्रज्ञान असेल तर तुम्ही ते वापरायला हवे होते, असंही वसीमनं म्हटलं आहे.
तर वकार युनूसनं म्हटलं आहे की, 'स्क्वेअर लेग अंपायरने आधी मुख्य पंचांशी चर्चा करायला हवी होती. त्यानंतर तो थर्ड अंपायरकडे जाऊ शकला. थर्ड अंपायर बसले आहेत. हा निर्णय त्यांच्यावर सोडायला हवा होता.
T20 विश्वचषकात टीम इंडियानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना रोमांचक पद्धतीनं 4 गडी राखून जिंकला होता. या विजयात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा सर्वात मोठा हात होता. कोहलीने 53 चेंडूत 82 धावांची खेळी केली. धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने 19व्या षटकात वेगवान गोलंदाज हारिस रौफच्या चेंडूवर दोन षटकार ठोकले.
ही बातमी देखील वाचा- हार्दिक पांड्या म्हणतो, 'रौफला ते दोन सिक्सर फक्त विराटच मारु शकतो, मी तर सुन्नच झालेलो'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)