एक्स्प्लोर

Rishabh Pant : रिषभ पंतला टी-20 वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्या स्थानावर संधी द्या, अन्यथा मोठी अडचण, दिग्गज खेळाडूनं कारण सांगितलं...

Rishabh Pant : रिषभ पंतच्या नेतृत्त्वात दिल्ली कॅपिटल्सनं कमबॅक केलं आहे. दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्सला चार धावांनी पराभूत केलं.

नवी दिल्ली : आयपीएलचा (IPL 2024) समारोप झाल्यानंतर 1 जूनपासून टी-20  वर्ल्ड कप (T20 World Cup) सुरु होणार आहे. टी-20  वर्ल्डकपसाठी टीमची घोषणा 1 मेपूर्वी करण्याच्या सूचना आयसीसीनं दिल्या आहेत. त्यानुसार स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 20 संघांना त्यांच्या टीममधील खेळाडूंच्या नावांची घोषणा 1 मेपूर्वी करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर टीम इंडियातून (Team India) कुणाला संधी मिळेल याकडे लक्ष लागलं आहे. रिषभ पंतनं (Rishabh Pant) यंदाच्या आयपीएलमध्ये तीन अर्धशतकं झळकावली आहेत. रिषभ पंतनं काल झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमध्ये 43 बॉलमध्ये 88 धावांची खेळी केली होती. त्यामध्ये त्यानं  8 सिक्स आणि पाच चौकार मारले होते. रिषभच्या 88 धावांच्या जोरावर दिल्लीनं 4 बाद 224 धावांपर्यंत मजल मारली होती. 

रिषभ पंतची आयपीएलमध्ये दमदार कामगिरी  

रिषभ पंतनं यंदाच्या आयपीएलमध्ये तीन अर्धशतकांसह 342 धावा केल्या आहेत. रिषभ पंतनं काल केलेल्या कामगिरीच्या जोरावर टी-20 वर्ल्ड कपच्या टीममधील समावेशासाठी आपली दावेदारी पक्की केली आहे. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू सायमन डूलनं रिषभ पंतबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.रिषभ पंत मधल्या फळीत बॅटिंग करण्यासाठी योग्य नसून त्याला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी संधी दिली पाहिजे. रिषभ पंत अखेरच्या ओव्हरमध्ये फलंदाजीला आला आणि लगेच मोठं मोठे फटके मारु लागला असं होत नाही. रिषभला त्याच्या खेळीचा विस्तार करताना वेळ घ्यावा लागतो. त्यामुळं त्याला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला पाठवलं पाहिजे. रिषभनं ज्या प्रकारे गुजरात विरुद्ध खेळी केली तशाच प्रकारचे तो धावा करु शकतो, असं सायमन डूल म्हणाले. 

सायमन डूल यांनी क्रिकबझशी बोलताना रिषभ पंतला टी-20 वर्ल्डकपमध्ये संधी मिळाल्यास त्यानं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे, असं म्हटलं. रिषभ पंत स्लॉगर म्हणजेच अखेरच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करणारा फलंदाज नसून त्याला जम बसवण्यास थोडा वेळ लागतो. त्यामुळं त्याला तिसऱ्या स्थानावर संधी दिली पाहिजे, असं डूल म्हणाले. पण, विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर तिसऱ्या स्थानावर तो खेळू शकेल, का असा प्रश्न असेल सायमन डूल म्हणाले. 

  
जॉय भट्टाचार्य यांनी रिषभ पंतला चौथ्या स्थानावर फलंदाजीला पाठवलं पाहिजे असं मत मांडलं. यावर सायमन डुल यांनी म्हटलं की तसं केल्यास टीम इंडियाच्या मधल्या फळीची जबाबदारी केवळ डावखुऱ्या फलंदाजांवर राहील. त्यामुळं शिवम दुबे, रिंकू सिंग, रविंद्र जडेजा हे जर पाच, सहा आणि सातव्या स्थानावर खेळले आणि रिषभ पंत चौथ्या स्थानी खेळला तर मधल्या फळीत सर्व डावखुरे फलंदाज होऊ शकतात.  

   
विकेट कीपर कोण असणार?

टीम इंडियात विकेटकीपर कोण असेल याविषयी देखील चर्चा सुरु आहेत. आयपीएलमध्ये संजू सॅमसननं देखील चांगली कामगिरी केलेली आहे. दिनेश कार्तिकची कामगिरी देखील निवड समितीच्या सदस्यांना विचारात घ्यावी लागणार आहे. त्यामुळं निवड समिती रिषभ पंत, संजू सॅमसन आणि दिनेश कार्तिक यांच्यापैकी कुणाला संधी देणार याकडे लक्ष लागलंय.  

संबंधित बातम्या : 

Video: ट्रिस्टन स्टब्सच्या डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या फील्डिंगमुळं दिल्लीला विजयाचा गुलाल, गुजरातचा खेळ बिघडवणारा क्षण

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
Kavya Maran Wedding: हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
Rishabh Pant and Kuldeep Yadav Trade IPL 2027: IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; कोट्यवधी रुपयांचा करार, पंतला 12 कोटींचे नुकसान
IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; पंतला 12 कोटींचे नुकसान
Rishabh Pant: रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? रिपोर्टमध्ये नवा दावा
रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget