एक्स्प्लोर

GT vs MI Eliminator IPL 2025 : मुंबई की गुजरात? एलिमिनेटर सामना रद्द झाला तर क्वालिफायर-2 मध्ये कोण खेळणार? जाणून घ्या समीकरण

आयपीएल 2025 चा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असताना क्वालिफायर, एलिमिनेटर सामन्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Gujarat Titans vs Mumbai Indians Eliminator IPL 2025 : आयपीएल 2025 चा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असताना क्वालिफायर, एलिमिनेटर सामन्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु जर हवामानामुळे किंवा अन्य कारणांमुळे एलिमिनेटर सामना रद्द झाला, तर एक मोठा प्रश्न निर्माण होतो, क्वालिफायर-2 मध्ये कोण खेळणार?

इंडियन प्रीमियर लीग 2025 चा पहिला क्वालिफायर सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमच्या मैदानावर उतरतील. या सामन्यात जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत पोहोचेल आणि पराभूत संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी मिळेल. पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत संघाचा सामना एलिमिनेटरच्या विजेत्या संघाशी होईल.

पहिला क्वालिफायर सामना पॉइंट टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघादरम्यान खेळला जातो. त्याच वेळी, एलिमिनेटर सामना पॉइंट टेबलच्या तिसऱ्या आणि चौथ्या संघादरम्यान खेळला जातो. एलिमिनेटर सामना हा एक प्रकारचा नॉकआउट सामना असतो. म्हणजेच, येथे पराभूत संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडतो. 

एलिमिनेटरमध्ये जिंकणारा संघ क्वालिफायर-1 मध्ये पराभूत संघाशी खेळतो, ज्याला क्वालिफायर-2 म्हणतात. अशा परिस्थितीत, जर पावसामुळे एलिमिनेटर सामना रद्द झाला तर कोणत्या संघाला क्वालिफायर-2 खेळण्याची संधी मिळेल? ते जाणून घेऊया...

मुंबई आणि गुजरात यांच्यात एलिमिनेटर सामना

आयपीएल 2025 चा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना नवीन चंदीगड येथील मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर खेळतील. ऑपरेशन सिंदूरनंतर आयपीएलच्या वेळापत्रकात आणि स्थळात बदल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, नॉकआउट सामन्यांमध्येही पावसाचा धोका आहे. अशा परिस्थितीत, आता जर पावसामुळे एलिमिनेटर सामना रद्द झाला तर क्वालिफायर-2 मध्ये कोणाला संधी मिळेल.

सहसा मोठ्या स्पर्धांमध्ये पावसाला लक्षात घेऊन राखीव दिवस ठेवला जातो, परंतु यावेळी आयपीएल 2025 साठी एलिमिनेटर आणि क्वालिफायरसाठी असा कोणताही नियम नाही. अशा परिस्थितीत, जर पावसामुळे एलिमिनेटर सामना रद्द झाला तर गुजरात टायटन्सला क्वालिफायर-2 खेळण्याची संधी मिळेल. खरं तर, गुजरात संघ 18 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर होता. त्याच वेळी, मुंबई इंडियन्स संघाचे 16 गुण आहेत. हेच कारण आहे की लीग टप्प्यात मुंबईपेक्षा जास्त गुण असल्याने, गुजरातला क्वालिफायर-2 खेळण्याची संधी मिळेल आणि मुंबई अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

हे ही वाचा -

IND A Vs ENG A Live Streaming : मिशन इंग्लंडसाठी टीम इंडिया सज्ज! यशस्वी जैस्वाल, करुण नायर उद्या उतरणार मैदानात, सामना कुठे Live पाहू शकता? जाणून घ्या

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Amol Mitkari On Ajit Pawar 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अजित पवारांना अमोल मिटकरांचं भावनिक पत्र
Sunil Tatkare PC : विलिनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यावर पक्षांतर्गत चर्चा करु, तटकरेंची भूमिका
NCP Merger : विलिनीकरणाचा फायदा, तोटा कुणाला? राष्ट्रवादींची गणितं कधी सुटणार?
Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
AUS vs ZIM : टी 20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन ट्रेविस हेडनं पराभवाचं खापर कशावर फोडलं? 
ऑस्ट्रेलियावर टी 20 वर्ल्ड कपबाहेर जाण्याचं संकट, झिम्बॉब्वेविरुद्ध पराभव, ट्रेविस हेड म्हणाला, 2023 ला असंच घडलेलं....
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
Share Market Crash : शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 7.40  लाख कोटी बुडाले, मार्केटमध्ये अचानक भूकंप कशामुळं? 
शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 7.40  लाख कोटी बुडाले, मार्केटमध्ये अचानक भूकंप कशामुळं? 
Embed widget