एक्स्प्लोर

IPL 2022, No Ball Controversy : मैदानातील राड्यानंतरही वादग्रस्त निर्णय थर्ड अंपायरकडे का नाही गेला?

IPL 2022, No Ball Controversy : दिल्ली कॅपिट्लस आणि राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यात झालेल्या सामन्याच्या अखेरच्या षटकात राडा झाला होता.

IPL 2022, No Ball Controversy : दिल्ली कॅपिट्लस आणि राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यात झालेल्या सामन्याच्या अखेरच्या षटकात राडा झाला होता. पंचाच्या निर्णायावर नाराज झाल्यानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने फलंदाजांना माघारी बोलवलं होतं. इतकेच नाही तर सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांनी सामन्यादरम्यान मैदानावर जात पंचांशी हुज्जत घातली. यंदाच्या हंगमातील हा पहिला वाद मानला जात आहे. यावर क्रीडा तज्ज्ञांनीही आपपाल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

 नेमकं काय झालं होतं?
अखेरच्या षटकात दिल्लीच्या संघाला विजयासाठी 6 चेंडूत 36 धावा करायच्या होत्या. दरम्यान, मैदतान उपस्थित असलेल्या दिल्लीचा तडाखेबाज फलंदाजरोव्हमन पॉवेलनं पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार मारून दिल्लीच्या आशा उंचावल्या. महत्वाचं म्हणजे, ओबेड मॅकॉयनं टाकलेला तिसरा चेंडू फूल टॉस होता. हा चेंडू कंबरेच्या वरती असल्याचे दिसत होतं. त्यामुळे या चेंडूला दिल्लीच्या संघानं नो-बॉल देण्याची मागणी केली. मात्र, मैदानावरील पंचांनी नो-बॉल दिला नाही. पंचांच्या निर्णयावर कर्णधार ऋषभ पंतनं नाराजी व्यक्त केली. तसेच दिल्लीच्या फलंदाजाला मैदानाबाहेर येण्याचा इशारा केला. त्याचवेळी शार्दुल ठाकूरही आपल्या कर्णधाराला पाठिंबा देत पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना दिसला. तसेच कर्णधाराच्या सांगण्यावरून प्रवीण आमरे यांनी  मैदानात जाऊन अंपायरशी वाद घातला.

नो बॉलचा नियम काय? 
मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) च्या नियम 41.7.1 नुसार, एखादा फुल टॉस चेंडू फलंदाजाच्या कंबरेपेक्षा जास्त उंचीने असेल तर तो अवैध्य असतो. पंच त्या चेंडूला नो बॉल देऊ शकतात. अशात रोवमन पॉवेलला टाकलेला चेंडू अनेकांना नो बॉल असल्याचं वाटतेय. माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यांनी ट्विट करत हा नो बॉल असल्याचं मत नोंदवलं आहे.  

डगआऊटमध्ये बसलेल्या दिल्लीच्या खेळाडूंना तिसरा खेळाडू कंबरेच्या वरती असल्याचं दिसले. त्यानंतर राडा झाला. या वादग्रस्त निर्णायासाठी तिसऱ्या पंचाची मदत का घेतली नाही? तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली जाऊ शकत नाही का? असा प्रश्न दिल्लीच्या खेळाडूंनीही उपस्थित केला....  

पंच आपल्या निर्णायावर ठाम -
वादग्रस्त तिसऱ्या चेंडूला पंचांनी नो बॉल दिले नाही. दिल्लीला विजयासाठी तीन चेंडूत 18 धावांची गरज होती. जर पंचांनी तो चेंडू नो बॉल दिला असता तर फ्री हिटसोबत दिल्लीला चार चेंडूत 17 धावा राहिल्या असत्या. त्यामुळे कदाचीत सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. पण पंच आपल्या निर्णायावर ठाम राहिले. त्यानंतर सामना सुरु झाल्यानंतर दिल्लीचा 15 धावांनी पराभव झाला. 
 
थर्ड अंपायरची मदत का नाही?
दिल्लीच्या सामन्यात वाद झाल्यानंतर तिसऱ्या पंचांची मदत का नाही घेतली? असा प्रश्न उपस्थित झाला. पण आयपीएलच्या नियमांनुसार, ऑन फील्‍ड अंपायर खेळाडूला बाद दिल्यानंतरच तिसऱ्या पंचाची मदत घेऊ शकतो. त्याशिवाय इतर निर्णासाठी ऑन फिल्ड अंपायरला तिसऱ्या पंचाकडे इतर निर्णायासाठी दाद मागता येत नाही. आयपीएल प्‍लेइंग कंडीशन्सनुसार, मैदानावरील पंच फक्त बाद झाल्यानंतर आणि फ्रंट फुट नो बॉलच्या निर्णायासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेऊ शकतो.  आयपीएलच्या नियमानुसार, जर एखाद्या चेंडूवर विकेट पडली असेल तरच  थर्ड अंपायर नो बॉल तपासतो. आयपीएलच्या नियमांनुसार  नितिन मेनन आणि निखिल पटवर्धन यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
MVA News : काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआत नाराजीनाट्य, उद्धव ठाकरे, शरद पवारांची नाराजी
Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
Embed widget