एक्स्प्लोर

IPL Final : आयपीएल फायनलसाठी पोलार्ड तयार, सामन्याआधी केलं महत्वाचं भाष्य, म्हणाला...

IPL Final 2020 इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीजनच्या अंतिम सामन्यात आज दोन बलाढ्य संघ दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स समोरासमोर येत आहेत. या सामन्यापूर्वी मुंबईचा धडाकेबाज ऑलराऊंडर कायरन पोलार्डने महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

IPL 2020 दुबई: इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीजनच्या अंतिम सामन्यात आज दोन बलाढ्य संघ दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स समोरासमोर येत आहेत. या सामन्यापूर्वी मुंबईचा धडाकेबाज ऑलराऊंडर कायरन पोलार्डने महत्वाचं वक्तव्य केलं आहे. सामन्याआधी पोलार्ड म्हणाला की, या खेळाचं नाव दबाव आहे. अंतिम सामन्यात प्रत्येकजण दबावात असतो. तुम्हाला विजयी व्हायचं असतं आणि सोबत कोणती चूकही करायची नसते. पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला एका इतर सामन्याप्रमाणेच हा सामना खेळावा लागतो. मैदानात जा आणि तिथे आनंदाने खेळा, असं पोलार्ड म्हणाले. याबाबत मुंबई इंडियन्सने ट्विटरला पोलार्डचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

पोलार्ड म्हणाला की, सामन्यात कोणतेही प्रेक्षक नसतील, पण खेळाचा आनंद घेतला जाऊ शकतो. हा आयपीएलचा अंतिम सामना आहे. वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यानंतर सर्वाधिक मोठा सामना आहे, असं पोलार्डने म्हटलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये 15 सामन्यांमध्ये 190 च्या सरासरीने 259 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा जखमी झाल्यानंतर त्याच्या अनुपस्थितीत पोलार्डने संघाचं नेतृत्व देखील केलं होतं. पोलार्डने आयपीएलचा अंतिम सामना इतर सामन्यांप्रमाणेच खेळला पाहिजे सांगताना वर्ल्ड कपच्या सामन्याशी तुलना केली आहे. वर्ल्ड कपनंतर आयपीएलच्या अंतिम सामन्याचं सर्वाधित महत्व आहे असं पोलार्डने म्हटलं आहे.

दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या आजच्या अंतिम सामन्यात आयपीएलचा चषक कोणाच्या पारड्यात पडणार हे स्पष्ट होईल. मुंबई आयपीएलच्या आपल्या पाचव्या विजयाचा पताका फडकवण्याच्या तयारीत आहे तर दिल्ली कॅपिटल्स आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे.

IPL 2020 Final : मुंबई पाचव्यांदा फडकवणार विजयाची पताका की दिल्ली मारणार पहिल्यांदाच बाजी? आज होणार निर्णय

दिल्लीच्या संघाने पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. दिल्लीचा संघ आयपीएलच्या आठ संघांपैकी एकमेव संघ होता जो आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचू शकला नव्हता. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्लीच्या संघाने ही प्रतिक्षा संपवली आहे. आता अनुभवी आणि बलाढ्य असणाऱ्या मुंबईच्या संघासमोर दिल्ली काय चमत्कार करेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या हंगामात दोन्ही संघ तीन वेळा एकमेकांसमोर उभ्या ठाकले होते. या तिनही वेळी मुंबईने दिल्लीला पराभवाचा धक्का दिला होता. लीगमधील दोनही सामन्यात मुंबईने विजय प्राप्त केला होता. प्ले ऑफमध्ये क्वॉलिफायरच्या सामन्यातही दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला होता.

दिल्ली कॅपिटल्स चांगल्या फॉर्ममध्ये दिल्ली ने त्यांच्या दुसऱ्या क्व़ॉलिफायरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करुन अंतिम सामन्यातील आपले स्थान पक्के केले होते. या संघाचे वैशिष्ट्य म्हणजे गोलंदाज आणि फलंदाजीमध्ये असलेले संतुलन. गेल्या सामन्यात दिल्लीने त्यांच्या फंलदाजीच्या क्रमाकांत बदल केले होते. ओपनिंगला शिखर धवनच्या साथीत मार्कस स्टोएनिसला पाठवले होते आणि हा प्रयोग यशस्वी झाला होता.मुंबईच्या विरोधात दिल्लीची ही सलामीची जोडी कमाल दाखवते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अजिंक्य रहाणे देखील ओपनिंग करु शकतो. स्टोएनिस ओपनिंगला आला तर खालच्या क्रमांकावर शिरमन हॅटमायरवर फिनिशिंगची जबाबदारी असेल. हैदराबादच्या सामन्यात त्याने ही जबाबदारी चांगल्या पध्दतीने पार पाडली होती. ऋषभ पंत देखील संघात आहे ज्याची फलंदाजी या हंगामात काही कमाल करु शकली नाही. गोलंदाजीमध्ये रबाडा आणि एनरिक नॉर्खियावर मुख्य जबाबदारी असेल. सुरुवातीच्या वेळी मुंबईच्या काही विकेट काढून मुंबईवर दबाब टाकण्याची जबाबदारी या दोघांवर असेल.

रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा मुंबईची फलंदाजी मजबुत आहे. त्यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या गोलंदाजीचा सामना करु शकतात. कर्णधार रोहित शर्मा आणि डी कॉक यांची सलामीची जोडी भक्कम आहे. रोहितने दुखापतीनंतर पुनरागमन केल्यानंतर मोठी खेळी केली नाही. डि कॉक मात्र सातत्याने धावा करण्यात यशस्वी ठरला आहे. मधल्या फळीत फलंदाजीला येणारे सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन हे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. त्यांच्यानंतर हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड और क्रुणाल पांड्या हे देखील फलंदाजीत कमाल दाखवत आहेत. मुंबईच्या गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट दोन जागतिक स्तरावरचे नावाजलेले गोलंदाज आहेत. आतापर्यंत या दोघांनीच संघाच्या गोलंदाजीची कमान सांभाळली आहे. तिसऱ्या गोलंदाजाच्या रुपात जेम्स पॅटिरसन आणि नॉथन कुल्टर नाईल यांच्यापैकी एकाला खेळण्याची संधी मिळेल.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2020 : मुंबईसाठी डोकेदुखी ठरू शकतो दिल्लीचा 'हा' हुकूमाचा एक्का!

Women's t20 challenge 2020 | ट्रेलब्लेझर्स संघाला पहिलेवहिले विजेतेपद, सुपरनोव्हाजवर 16 धावांनी विजय

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Vaibhav Sooryavanshi : अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं, बेबी बॉसचं झिम्बाब्वे विरुद्ध वादळी अर्धशतक 
अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं,झिम्बाब्वेमध्ये बेबी बॉसची वादळी फलंदाजी

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
Embed widget