एक्स्प्लोर

KL Rahul Half Century : विराट-सुर्या फ्लॉप; राहुलकडून ऑस्ट्रेलियाची धुलाई, ठरला विजयाचा शिल्पकार 

KL Rahul Half Century : मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलने ऑस्ट्रेलियाची धुलाई करत भारताला विजय मिळवून दिला.

KL Rahul Half Century :  मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात के. एल. राहुलची खेळी भारतासाठी महत्वपूर्ण खेळी ठरली आहे. के. एल. राहुलने टीम इंडियाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढून विजय मिळवून दिला. राहुलने 73 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि रविंद्र जडेजासोबत निर्णायक भागिदारी करून भारताला विजयापर्यंत पोहोचवले. राहुलने 91 चेंडूत नाबाद 75 धावांची खेळी केली. यात त्याने सात चौकार आणि एक षटकार खेचला. गेल्या काही दिवसांपासून कठीण परिस्थितीतून जात असलेल्या राहुलच्या आजच्या खेळीचे जोरदार कौतुक केले जात आहे. 

के.एल. राहुल बऱ्याच दिवसांपासून फॉर्मात नाही. तरी देखील त्याला अनेक वेळा संधी देण्यात आली. त्यामुळे त्याच्यासह निवड समितीवर देखील जोरदार टीका झाली. परंतु, आज भारताचे सलामीचे सर्व फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर केएल राहुलने संपूर्ण मॅच आपल्या खांद्यावर घेत एका बाजूने कडवी झुंज दिली. त्याला कर्णधार हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांनी मोलाची साथ दिली. 

केएल राहुल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्येही अपयशी ठरला. त्यामुळे त्याला उपकर्णधारपदावरून देखील हटवण्यात आले. माजी कर्णधार सौरव गांगुलीने देखील केएल राहुलवर टीका केली होती. "जेव्हा तुम्ही भारतात धावा करू शकत नाही, तेव्हा तुमच्यावर नक्कीच टीका होईल. यापूर्वीही अनेक खेळाडूंना अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. खेळाडूंवर खूप दडपण असते आणि त्यांच्याकडे खूप लक्ष दिले जाते. कारण तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू असल्याचे संघ व्यवस्थापनाला वाटते. तुमच्याबद्दल प्रशिक्षक आणि कर्णधाराचे मतही खूप महत्त्वाचे असते, असे गांगुली यांनी म्हटले होते. सोशल मीडियावरून देखील राहुलवर जोरदार टीका झाली आहे. परंतु, आजच्या महत्वपूर्ण सामन्यात केलेल्या धडाकेबाज खेळीने राहुलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. भारताचे आघाडीचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले. अवघ्या 39 धावांत भारताने आघाडीचे चार फलंदाज गमावले होते. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी डाव सांभाळला. त्यांची जोडी जमली असे वाटत असतानाच हार्दिक पांड्या बाद झाला. त्यानंतर राहुल आणि रविंद्र जाडेजा या जोडीने नाबाद राहत भारताला विजय मिळवून दिला. राहुलने नाबाद 75 तर रविंद्र जाडेजाने नाबाद 45 धावांची खेळी केली. त्याशिवाय हार्दिक पांड्याने 25 धावांचे योगदान दिले. यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. इशान किशन, शुभमन गिल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने भेदक मारा केला. स्टार्कने तीन फलंदाजांना तंबूत धाडले. तर स्टॉयनिस याने दोन विकेट घेतल्या.  

महत्वाच्या बातम्या

सिराज-शामीची कमाल अन् राहुल-जडेजाची धमाल, ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्सने विजय 

 

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Vaibhav Sooryavanshi : अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं, बेबी बॉसचं झिम्बाब्वे विरुद्ध वादळी अर्धशतक 
अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं,झिम्बाब्वेमध्ये बेबी बॉसची वादळी फलंदाजी

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
EPFO : पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
Pune Crime News: पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
RBI : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
Embed widget