एक्स्प्लोर

IND vs AFG: टीम इंडियाचा अफगाणिस्तानविरोधात धावांसह विक्रमांचाही पाऊस, सामन्यात काय-काय विक्रम झाले वाचा....

IND vs AFG:  टी 20 विश्वचषकाच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला. भारताने निर्धारित 20 षटकात 210 धावांचा पाऊस पाडला. या सामन्यामध्ये धावांच्या पावसासह विक्रमांचा देखील पाऊस पडला.

IND vs AFG:  टी 20 विश्वचषकाच्या सामन्यात भारताने पहिल्या दोन पराभवानंतर काल अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला.  या सामन्यात भारताने निर्धारित 20 षटकात 210 धावांचा पाऊस पाडला. या सामन्यामध्ये धावांच्या पावसासह विक्रमांचा देखील पाऊस पडला. 211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 144 धावाच करू शकला. भारताचे रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांनी  जबरदस्त सुरुवात केली. राहुलने 48 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 69 धावा केल्या. तसेच रोहितने 47 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 74 धावा केल्या. या दोघांनी 140 धावांची सलामी भागीदारीही रचली.

सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी शतकी भागीदारीदरम्यान दोघांनी एका विक्रमाला गवसणी घातली. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी 140 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीदरम्यान या दोघांनी वैयक्तीक अर्धशतकं केली. टी20 विश्वचषक स्पर्धेत एकाच सामन्यात दोन्ही भारतीय सलामीवीरांनी अर्धशतक ठोकण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी 2007 सालच्या  विश्वचषक स्पर्धेत इंग्लडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. त्यावेळी डर्बनला झालेल्या या सामन्यात सेहवागने 68 धावांची आणि गंभीरने 58 धावांची भागीदारी केली होती. 
 
विश्वचषकात भारतासाठी सर्वात मोठी भागीदारी करणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा आणि केएल राहुल पहिल्या स्थानावर पोहोचले. या यादीत दुसऱ्या स्थानावर विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर आहेत. त्यांनी 2007 साली इंग्लंडविरुद्ध 136 धावांची भागीदारी केली होती. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने वेस्ट इंडीजविरुद्ध 106 धावांची भागीदारी केली होती.

 सलामीवीर रोहित शर्माला उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.  रोहितला त्याच्या शानदार 74 धावांच्या खेळीमुळं सामनावीर पुरस्कार मिळाला. टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्कार मिळण्याची त्याची ही अकरावी वेळ आहे. रोहित या सामन्यात मिळालेल्या या पुरस्कारानंतर आंतरराष्टीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेल्या पहिल्या पाच खेळाडूंमध्येही सहभागी झाला आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीनं सर्वाधिक 13 वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. तर भारताच्या विराट कोहलीनं 12 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.  
  
रोहित शर्माने  टी 20 विश्वचषक स्पर्धेत  सात वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची कामगिरी केली आहे. या यादीत आता तो महेला जयवर्धनेसह तिसऱ्या स्थानी आहे.  विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 10 वेळा अशी कामगिरी केली आहे. ख्रिस गेलने नऊ वेळा 50 धावांचा आकडा गाठला आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Embed widget