एक्स्प्लोर

Pakistan Cricket Team : तर टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सेमीफायनल मुंबईत होणार म्हणजे होणार! कसं आहे समीकरण?

टीम इंडियाची लढत चौथ्या स्थानावरील टीमशी होणार आहे. त्यामुळे चमत्कार झाल्यास पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan Semi Finals scenario) लढत आणि ती सुद्धा सेमीफायनलची होऊ शकते.

Pakistan Cricket Team : वर्ल्डकप सेमीफायनलसाठी (ICC Cricket World Cup 2023) तीन संघ फायनल झाले असले, तरी चौथ्या स्थानाची रेस अजूनही कायम आहे. एक जागा आणि तीन संघ दावेदार अशी स्थिती चौथ्या जागेसाठी झाली आहे. टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यापूर्वीच सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. पहिल्या नंबरवर असलेल्या टीम इंडियाची लढत चौथ्या स्थानावरील टीमशी होणार आहे. त्यामुळे चमत्कार झाल्यास पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan Semi Finals scenario in mumbai) लढत आणि ती सुद्धा सेमीफायनलची होऊ शकते. मात्र, पाकिस्तानला इतर संघाच्या कामगिरीवर विसंबूनर राहावं लागेल. 

उपांत्य फेरीतील तीन संघ ठरले, अंतिम स्थानासाठी शर्यत सुरू 

विश्वचषक 2023 मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. आता फक्त एकच जागा शिल्लक आहे आणि त्यासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात शर्यत आहे. या शर्यतीत जो संघ पुढे येईल त्याला गुणतालिकेत चौथे स्थान मिळेल. अशा स्थितीत चौथ्या पात्रता मिळवणाऱ्या संघाला उपांत्य फेरीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या टीम इंडियाचा सामना करावा लागेल. आता पाकिस्तानने अंतिम 4 मध्ये प्रवेश केला तर उपांत्य फेरीत त्याचा सामना भारताशी होईल.

पाकिस्तान कसा पात्र होऊ शकतो?

पाकिस्तानला शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. सोबत न्यूझीलंडला श्रीलंकेविरुद्ध पराभूत व्हावं लागेल आणि त्यांचा रनरेटही पाकिस्तानच्या खाली असायला हवा. त्याचबरोबर अफगाणिस्तानलाही पराभव स्वीकारावा लागेल आणि रनरेटही खाली असायला हवा, तरच हे समीकरण जुळून येऊ शकतं. 

जर पाकिस्तान पात्र ठरला तर भारत ईडन गार्डन्सवर खेळेल 

वर्ल्ड कप 2023 चा पहिला सेमीफायनल सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाला आपला सेमीफायनल सामना वानखेडेवर खेळायचा आहे. मात्र, पाकिस्तान पात्र ठरल्यास स्थळ आणि वेळापत्रक बदलेल. त्यानंतर नंबर-1 आणि नंबर-4 संघ वानखेडेऐवजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आमनेसामने येतील. तारखेतही बदल होणार आहे. हा सामना 15 नोव्हेंबर ऐवजी 16 नोव्हेंबरला होणार आहे.

गांगुली म्हणतात पाकिस्तानला सेमीफायनला यावा 

टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरभ गांगुली यांनी वर्ल्डकप 2023 च्या सेमीफायनल सामन्यासाठी मोठा दावा केला आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीत खेळताना पाहायचे आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तथापि, त्याच्या इच्छेमागील तर्क असा आहे की जर पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला तर त्याचा सामना फक्त भारताशी होईल आणि गांगुली म्हणतात की उपांत्य फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यापेक्षा चांगले काय असू शकते. गांगुली म्हणाले की, 'पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठून भारताविरुद्ध खेळावे अशी माझी इच्छा आहे. यापेक्षा मोठा उपांत्य सामना असूच शकत नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Embed widget