एक्स्प्लोर

Pakistan Cricket Team : तर टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सेमीफायनल मुंबईत होणार म्हणजे होणार! कसं आहे समीकरण?

टीम इंडियाची लढत चौथ्या स्थानावरील टीमशी होणार आहे. त्यामुळे चमत्कार झाल्यास पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan Semi Finals scenario) लढत आणि ती सुद्धा सेमीफायनलची होऊ शकते.

Pakistan Cricket Team : वर्ल्डकप सेमीफायनलसाठी (ICC Cricket World Cup 2023) तीन संघ फायनल झाले असले, तरी चौथ्या स्थानाची रेस अजूनही कायम आहे. एक जागा आणि तीन संघ दावेदार अशी स्थिती चौथ्या जागेसाठी झाली आहे. टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यापूर्वीच सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. पहिल्या नंबरवर असलेल्या टीम इंडियाची लढत चौथ्या स्थानावरील टीमशी होणार आहे. त्यामुळे चमत्कार झाल्यास पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan Semi Finals scenario in mumbai) लढत आणि ती सुद्धा सेमीफायनलची होऊ शकते. मात्र, पाकिस्तानला इतर संघाच्या कामगिरीवर विसंबूनर राहावं लागेल. 

उपांत्य फेरीतील तीन संघ ठरले, अंतिम स्थानासाठी शर्यत सुरू 

विश्वचषक 2023 मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. आता फक्त एकच जागा शिल्लक आहे आणि त्यासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात शर्यत आहे. या शर्यतीत जो संघ पुढे येईल त्याला गुणतालिकेत चौथे स्थान मिळेल. अशा स्थितीत चौथ्या पात्रता मिळवणाऱ्या संघाला उपांत्य फेरीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या टीम इंडियाचा सामना करावा लागेल. आता पाकिस्तानने अंतिम 4 मध्ये प्रवेश केला तर उपांत्य फेरीत त्याचा सामना भारताशी होईल.

पाकिस्तान कसा पात्र होऊ शकतो?

पाकिस्तानला शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. सोबत न्यूझीलंडला श्रीलंकेविरुद्ध पराभूत व्हावं लागेल आणि त्यांचा रनरेटही पाकिस्तानच्या खाली असायला हवा. त्याचबरोबर अफगाणिस्तानलाही पराभव स्वीकारावा लागेल आणि रनरेटही खाली असायला हवा, तरच हे समीकरण जुळून येऊ शकतं. 

जर पाकिस्तान पात्र ठरला तर भारत ईडन गार्डन्सवर खेळेल 

वर्ल्ड कप 2023 चा पहिला सेमीफायनल सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाला आपला सेमीफायनल सामना वानखेडेवर खेळायचा आहे. मात्र, पाकिस्तान पात्र ठरल्यास स्थळ आणि वेळापत्रक बदलेल. त्यानंतर नंबर-1 आणि नंबर-4 संघ वानखेडेऐवजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आमनेसामने येतील. तारखेतही बदल होणार आहे. हा सामना 15 नोव्हेंबर ऐवजी 16 नोव्हेंबरला होणार आहे.

गांगुली म्हणतात पाकिस्तानला सेमीफायनला यावा 

टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरभ गांगुली यांनी वर्ल्डकप 2023 च्या सेमीफायनल सामन्यासाठी मोठा दावा केला आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीत खेळताना पाहायचे आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तथापि, त्याच्या इच्छेमागील तर्क असा आहे की जर पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला तर त्याचा सामना फक्त भारताशी होईल आणि गांगुली म्हणतात की उपांत्य फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यापेक्षा चांगले काय असू शकते. गांगुली म्हणाले की, 'पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठून भारताविरुद्ध खेळावे अशी माझी इच्छा आहे. यापेक्षा मोठा उपांत्य सामना असूच शकत नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Who is Manav Suthar : कोण आहे मानव सुथार? अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीत केलं पदार्पण; शुभमन गिलशी खास नातं, एकाच सामन्यात घेतल्या होत्या 11 विकेट्स!
कोण आहे मानव सुथार? अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीत केलं पदार्पण; शुभमन गिलशी खास नातं, एकाच सामन्यात घेतल्या होत्या 11 विकेट्स!
R Praggnanandhaa : बुद्धीबळाच्या जगाचा नवा सुलतान! आर. प्रज्ञानंदने रचला इतिहास; पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनला एकाच स्पर्धेत दोनदा लोळवलं, नॉर्वे चेस जिंकणारा पहिला भारतीय
बुद्धीबळाच्या जगाचा नवा सुलतान! आर. प्रज्ञानंदने रचला इतिहास; पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनला एकाच स्पर्धेत दोनदा लोळवलं, नॉर्वे चेस जिंकणारा पहिला भारतीय
Ind vs Afg Test Day-1 Live Update : भारत-अफगाणिस्तान कसोटीला आजपासून सुरुवात, जाणून घ्या किती वाजता सुरू होणार सामना
Ind vs Afg Test Day-1 Live : भारत-अफगाणिस्तान कसोटीला आजपासून सुरुवात, जाणून घ्या किती वाजता सुरू होणार सामना
FIFA World Cup : 1950 मधील पूर्वजांची एक चूक अन् देशाच्या फुटबॉलचा इतिहास बदलला, ज्यामुळे भारताला पुन्हा कधीच खेळता आला नाही FIFA वर्ल्ड कप! नेमकं काय घडलं होतं?
1950 मधील पूर्वजांची एक चूक अन् देशाच्या फुटबॉलचा इतिहास बदलला, ज्यामुळे भारताला पुन्हा कधीच खेळता आला नाही FIFA वर्ल्ड कप! नेमकं काय घडलं होतं?

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल: रोहित पवार
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा समज होईल: रोहित पवार
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Embed widget