एक्स्प्लोर

17 वर्षाखालील फुटबॉल विश्वचषकाला आजपासून सुरुवात

भारतातली क्रिकेटची लोकप्रियता भविष्यात फुटबॉलला मिळणार का, या प्रश्नाचं उत्तर कदाचित हा विश्वचषक देणार आहे.

मुंबई : क्रिकेटच्या प्रेमात आकंठ बुडालेला आपला भारत आज फुटबॉलक्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. निमित्त आहे सतरा वर्षांखालील वयोगटाच्या फिफा विश्वचषकाचं. 24 देशांचा सहभाग असलेल्या या विश्वचषकाला आजपासून सुरुवात होत आहे. भारतातली क्रिकेटची लोकप्रियता भविष्यात फुटबॉलला मिळणार का, या प्रश्नाचं उत्तर कदाचित हा विश्वचषक देणार आहे. जगभरातून आलेल्या युवा फुटबॉलवीरांकडून पुढचे तीन आठवडे साऱ्या भारतवासियांचं आता हेच मागणं राहील, की करके दिखला दे गोल... या मागणीचं निमित्त आहे ते भारतात आयोजित अंडर सेव्हन्टीन फिफा विश्वचषकाचं. सतरा वर्षांखालील वयोगटासाठीच्या फिफा विश्वचषकाचा पडदा उघडायला आता काही तासांचाच अवधी उरला आहे. कोलंबिया विरुद्ध घाना या नवी दिल्लीतल्या आणि न्यूझीलंड विरुद्ध टर्की या नवी मुंबईतल्या सामन्यानं अंडर सेव्हन्टीन विश्वचषकाची नांदी गायली जाईल आणि त्यानंतर पुढचे 21 दिवस नवी दिल्ली आणि नवी मुंबईसह गोवा, कोची, कोलकाता आणि गुवाहाटीतही अंडर सेव्हन्टिन फिफा विश्वचषक सामन्यांचा खेळ रंगेल. यजमान भारतासह या विश्वचषकासाठी 24 संघ पात्र ठरले असून, या 24 संघांची 6 गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून साखळी सामन्यांअखेर सर्वोत्तम दोन संघ आणि सहा गटांमधून तिसऱ्या क्रमांकाचे चार सर्वोत्तम संघ असे मिळून 16 संघ बाद पद्धतीच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. अंडर सेव्हन्टीन फिफा विश्वचषकाच्या कालावधीत म्हणजे 6 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत सहा शहरांमध्ये मिळून 52 सामन्यांचं आयोजन करण्यात येईल. कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर 28 ऑक्टोबरला या विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवण्यात येईल. अंडर सेव्हन्टीन फिफा विश्वचषकात भारताचा समावेश अमेरिका, कोलंबिया आणि घानाच्या अ गटात करण्यात आला आहे. भारताच्या तुलनेत अमेरिका, कोलंबिया आणि घाना हे तिन्ही संघ खूपच बलाढ्य आहेत. त्यामुळे ‘अ’ गटातून बाद फेरी गाठणं भारतासाठी अशक्यच आहे. पण यजमान या नात्यानं फुटबॉलच्या फर्स्ट वर्ल्डमध्ये खेळण्याची लाभलेली संधी भारतासाठी मोठी पर्वणी ठरावी. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात भारताची कोणत्याही वयोगटाच्या मुख्य स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. 1950 साली भारताला ब्राझिलमधल्या सीनियर फिफा विश्वचषकात खेळण्याचं आमंत्रण मिळालं होतं. पण भारताला त्या विश्वचषकातून माघार घ्यावी लागली त्याची अनेक कारणं सांगितली जातात. त्यापैकी एक कारण म्हणजे भारतीय खेळाडू त्या काळात अनवाणी खेळत आणि 1950 सालच्या विश्वचषकातही अनवाणी खेळण्याचा आपला हट्ट भारतीय खेळाडूंनी कायम ठेवला. त्यामुळे फिफानं त्यांना विश्वचषकात खेळण्याची परवानगी नाकारली. त्यानंतर तब्बल 57 वर्षांनी अंडर सेव्हन्टिन फिफा विश्वचषक यजमानपदाच्या निमित्तानं भारतीय खेळाडूंना सर्वोच्च दर्जाच्या फुटबॉलचा अनुभव घेता येणार आहे. या विश्वचषकाच्या निमित्तानं देशात फुटबॉलच्या सर्वोत्तम सुविधा उभ्या राहिल्या आहेत. तसंच देशात फुटबॉलची दर्जेदार प्रशिक्षण पद्धतीही निर्माण झाली आहे. भारतीय फुटबॉलमध्ये नवी उमेद जागवण्यासाठी त्या सुविधा, ती प्रशिक्षण पद्धती नक्कीच लाभदायक ठरावी.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG T20 World Cup Semi Final : सलग 5 विजय, इंग्लिश कॅप्टनने ओलांडली सीमा; टीम इंडियाला दिलं खुलं चॅलेंज, म्हणाला...
सलग 5 विजय, इंग्लिश कॅप्टनने ओलांडली सीमा; टीम इंडियाला दिलं खुलं चॅलेंज, म्हणाला...
Pakistan Cricket News : टी-20 वर्ल्डकपनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ; बाबर-शादाबला विरोध करणारा सेलेक्टर निवड समितीतून OUT, नेमकं काय घडलं?
टी-20 वर्ल्डकपनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ; बाबर-शादाबला विरोध करणारा सेलेक्टर निवड समितीतून OUT, नेमकं काय घडलं?
IND vs ENG T20 World Cup Semi Final : वानखेडेची खेळपट्टी पाहताच गौतम गंभीर संतापला; पिच क्यूरेटरसोबत वाद?, इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलआधी काय घडलं?
वानखेडेची खेळपट्टी पाहताच गौतम गंभीर संतापला; पिच क्यूरेटरसोबत वाद?, इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलआधी काय घडलं?
T20 World Cup 2026 Semifinal: कुंबळे, पुजारा, पठाण, कैफ, रैनासह 8 जणांची सेमीफायनसाठी 4 संघ निवडलेले; फक्त 2 दिग्गजांची भविष्यवाणी खरी ठरली!
कुंबळे, पुजारा, पठाण, कैफ, रैनासह 8 जणांची सेमीफायनसाठी 4 संघ निवडलेले; फक्त 2 दिग्गजांची भविष्यवाणी खरी ठरली!

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
Maharashtra Rajya Sabha Election: आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
Sanjay Raut: दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
Embed widget