एक्स्प्लोर

WTC Points Table 2025-27 : बांगलादेश जिंकला, पण टीम इंडियाचं वाटोळं झालं, ऑस्ट्रेलिया हरल्यावर WTC टेबलमध्ये कोण वर, कोण खाली?

WTC Final Qualification : डार्विनच्या मरारा क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाचा तब्बल 9 विकेट्सनी पराभव केला.

WTC Points Table 2025-27 : बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला आणि या एका निकालानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27च्या गुणतालिकेचं समीकरणच बदललं आहे. डार्विनच्या मरारा क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाचा तब्बल 9 विकेट्सनी पराभव केला. या विजयासह बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर आपला पहिलाच कसोटी विजय नोंदवला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रेड-बॉल क्रिकेटमधील हा त्यांचा एकूण दुसरा विजय ठरला.

पहिल्या डावात तब्बल 228 धावांची आघाडी घेतल्यानंतर बांगलादेशी गोलंदाजांनी दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला 284 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे विजयासाठी केवळ 57 धावांचं लक्ष्य मिळालं. बांगलादेशनं हे लक्ष्य अवघ्या 14.2 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात पार करत ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केलं.

WTC गुणतालिकेत बांगलादेशचा मोठा फायदा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या दणदणीत विजयाचा थेट परिणाम WTC 2025-27च्या गुणतालिकेवर झाला आहे. विजयामुळे बांगलादेशच्या खात्यात महत्त्वाचे गुण जमा झाले असून त्यांचा पॉइंट्स पर्सेंटेज अर्थात PCT 58.33 वरून थेट 66.67 टक्क्यांवर पोहोचला आहे.

या जबरदस्त सुधारणाीनंतरही बांगलादेश गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे. मात्र, त्यांनी अव्वल संघांवरील दबाव प्रचंड वाढवला आहे. याआधी पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरात नमवत बांगलादेशनं WTCच्या शर्यतीत आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे.

ऑस्ट्रेलिया अजूनही अव्वल, पण मोठा धक्का

बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाचं पहिलं स्थान कायम आहे. मात्र, या पराभवाचा त्यांच्या पॉइंट्स पर्सेंटेजवर मोठा परिणाम झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा पॉइंट्स पर्सेंटेज 87.50 टक्क्यांवरून घसरून 77.77 टक्क्यांवर आला आहे. WTCच्या या सायकलमध्ये ऑस्ट्रेलियाचा हा 9 सामन्यांमधील दुसरा पराभव आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही पराभवांचा सामना ऑस्ट्रेलियाला मायदेशातच करावा लागला आहे. त्यामुळे बांगलादेशचा विजय केवळ एका कसोटी सामन्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर WTCच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत त्याचे मोठे परिणाम दिसू शकतात.

टीम इंडिया पाचव्या स्थानावर

दरम्यान, भारतीय चाहत्यांसाठी मात्र या निकालानंतर परिस्थिती काहीशी चिंताजनक आहे. टीम इंडिया सध्या 48.15 टक्के पॉइंट्स पर्सेंटेजसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. गॉलमध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिली कसोटी सुरू असताना या सामन्याच्या निकालाकडेही आता WTCच्या दृष्टीनं मोठ्या उत्सुकतेनं पाहिलं जात आहे. भारतानं हा सामना जिंकला, तरी टीम इंडियाच्या रँकिंगमध्ये तात्काळ बदल होणार नाही. मात्र, भारताचा पॉइंट्स पर्सेंटेज 48.15 वरून 53.33 टक्क्यांवर जाईल.

श्रीलंका जिंकल्यास भारताला मोठा धक्का

गॉल कसोटीत श्रीलंकेनं भारताचा पराभव केला, तर समीकरण पूर्णपणे बदलेल. श्रीलंकेचा पॉइंट्स पर्सेंटेज 53.33 टक्क्यांवर पोहोचेल आणि ते भारताला मागे टाकून पाचव्या स्थानावर जातील. त्याचवेळी टीम इंडियाचा पॉइंट्स पर्सेंटेज 43.33 टक्क्यांवर घसरेल आणि भारताची सहाव्या स्थानावर घसरण होईल. त्यामुळे गॉल कसोटी भारतासाठी केवळ मालिका जिंकण्याच्या दृष्टीनं नव्हे, तर WTCच्या गुणतालिकेतील स्थान वाचवण्यासाठीही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

सामना ड्रॉ झाल्यास काय होईल?

भारत-श्रीलंका पहिली कसोटी अनिर्णित राहिली तरी दोन्ही संघांच्या PCTमध्ये बदल होईल. ड्रॉ झाल्यास भारताचा पॉइंट्स पर्सेंटेज 46.66 टक्क्यांवर, तर श्रीलंकेचा पॉइंट्स पर्सेंटेज 40.00 टक्क्यांवर येईल. मात्र या परिस्थितीत गुणतालिकेतील त्यांच्या स्थानांमध्ये बदल होणार नाही. म्हणजेच भारत पाचव्या आणि श्रीलंका त्याखालीच राहील. बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयामुळे WTC 2025-27ची शर्यत आणखी रोमांचक झाली आहे. एका बाजूला ऑस्ट्रेलिया अजूनही अव्वल स्थानावर आहे, तर बांगलादेश सातत्याने आपली स्थिती मजबूत करत आहे. दुसरीकडे भारताला प्रत्येक सामन्यात गुण मिळवण्याची गरज निर्माण झाली आहे.

हे ही वाचा - 

IND vs SL 1st Test : पहिली कसोटी पावसाने घातला घोळ; सामना ड्रॉ झाला तर टीम इंडिया WTC च्या शर्यतीतून OUT?, जाणून घ्या फायनलचं समीकरण

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

WTC Points Table 2025-27 : बांगलादेश जिंकला, पण टीम इंडियाचं वाटोळं झालं, ऑस्ट्रेलिया हरल्यावर WTC टेबलमध्ये कोण वर, कोण खाली?
बांगलादेश जिंकला, पण टीम इंडियाचं वाटोळं झालं, ऑस्ट्रेलिया हरल्यावर WTC टेबलमध्ये कोण वर, कोण खाली?
IND vs SL 1st Test : पहिली कसोटी पावसाने घातला घोळ; सामना ड्रॉ झाला तर टीम इंडिया WTC च्या शर्यतीतून OUT?, जाणून घ्या फायनलचं समीकरण
पहिली कसोटी पावसाने घातला घोळ; सामना ड्रॉ झाला तर टीम इंडिया WTC च्या शर्यतीतून OUT?, जाणून घ्या फायनलचं समीकरण
ODI World Cup 2027 : क्रिकेट वर्ल्डकपसाठी ICCचा मास्टरप्लॅन; महात्मा गांधींना अशी देणार अनोखी श्रद्धांजली? जय शाह मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
क्रिकेट वर्ल्डकपसाठी ICCचा मास्टरप्लॅन; महात्मा गांधींना अशी देणार अनोखी श्रद्धांजली? जय शाह मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
IND vs SL 1st Test DAY-2 Live : गॉलमध्ये आभाळ फाटलं, भारत-श्रीलंका कसोटीला ब्रेक! दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र पावसाने धुतलं, मॅच कधी होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट्स
गॉलमध्ये आभाळ फाटलं, भारत-श्रीलंका कसोटीला ब्रेक! दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र पावसाने धुतलं, मॅच कधी होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट्स
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Embed widget