एक्स्प्लोर

IND vs ENG Test: बुमराहला विश्रांती, आकाश दीपचं नशीब पालटणार? रांची कसोटीत पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता

IND vs ENG Test: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, त्याला चौथ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली आहे.

Team India vs England 4th Test Match: रांची : टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यात  सामन्यांची कसोटी मालिका (Test Series) खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना (4th Test Match) 23 फेब्रुवारी रोजी रांची येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियानं सध्या मालिकेत 2-1 नं आघाडी घेतली आहे. तसेच, बीसीसीआयच्या (BCCI) वतीनं इंग्लंड विरोधातील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी संघात महत्त्वाचे बदल केले आहेत.

टीम इंडियाचा हुकुमी एक्का जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) चौथ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी मुकेश कुमारला (Mukesh Kumar) संधी दिली आहे. तर, केएल राहुल (KL Rahul) चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर आहे, त्यामुळे आता प्रश्न पडतो की, बुमराहच्या जागी कोण खेळणार? 

आकाश दीप घेऊ शकतो बुमराहची जागा 

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात कोण खेळणार? हा प्रश्न सध्या बीसीसीआयसमोर आहे. पण कदाचित बीसीसीआयला या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे आणि ते उत्तर म्हणजे, आकाश दीप. मूळचा बिहारचा असलेला वेगवान गोलंदाज आकाश दीप चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराहची जागा घेऊ शकतो. अलीकडेच त्यानं इंग्लंड लायन्सविरुद्ध आपल्या गोलंदाजीनं सर्वांची मनं जिंकली. आकाशनं इंग्लंड लायन्सविरुद्धच्या 2 सामन्यांत 13 विकेट्स घेतल्या होत्या. चौथ्या कसोटीत आकाश दीप टीम इंडियासाठी पदार्पण करू शकतो, अशी माहिती समोर येत आहे. 

इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत युवा खेळाडूंचं पदार्पण 

याआधी रजत पाटीदारनं दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण केलं, तर सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांनीही तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण केलं. आता आकाश दीपही चौथ्या कसोटीत पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.

आकाश दीपची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कारकीर्द

27 वर्षीय आकाश दीपनं त्याच्या प्रथम श्रेणी करिअरमध्ये आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 104 विकेट्स आहेत. त्याची सरासरी 23.58 आहे. एवढंच नाही तर आकाश दीप आयपीएलही खेळला आहे. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे.

बुमराह-राहुल OUT, मुकेश IN

बीसीसीआयनं एका निवेदनात म्हटलं आहे की, "जसप्रीत बुमराहला इंग्लंडविरुद्ध रांची येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी संघातून विश्रांती देण्यात आली आहे. मालिकेचा कालावधी आणि अलीकडच्या काळात त्यानं खेळलेलं क्रिकेट लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, केएल राहुल चौथ्या कसोटीतूनही बाहेर आहे. धरमशाला येथे होणाऱ्या अंतिम कसोटी सामन्यात त्याचा सहभाग फिटनेसवर अवलंबून आहे. राजकोटमधील तिसऱ्या कसोटीसाठी संघातून बाहेर असलेला मुकेश कुमार रांचीमध्ये संघात दाखल झाला आहे."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

और ये लगा सिक्स...! 'हा' खेळतो की मस्करी करतो? एका ओव्हरमध्ये सलग 6 सिक्स; BCCI कडून VIDEO शेअर

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-1 : KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
Devdutt Padikkal Century : संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
KL Rahul Retires Hurt : केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget