एक्स्प्लोर

IND vs AUS : अहमदाबाद कसोटीत विराटचं अनोखं 'त्रिशतक', अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय

IND vs AUS : विराट कोहली (Virat Kohli) याने अहमदाबाद टेस्टमध्ये (Ahmedabad Test) एक अनोख्या प्रकारचं त्रिशतक पूर्ण केलं असून अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय आहे.

IND vs AUS 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील चौथ्या कसोटीत (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाने 480 धावांची मोठी धावसंख्या उभारली असून सध्या ऑस्ट्रेलिया सामन्यात ड्रायव्हिंग सीटवर दिसत आहेत. भारताची फलंदाजी सुरु झाली असून भार 36 धावांवर आहे. दरम्यान या सामन्यात भारताची गोलंदाजी सुरु असताना टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात फलंदाजी न करता देखील एक खास त्रिशतक ठोकलं आहे.

विराटने पूर्ण केले 300 झेल

विराट कोहलीने (Virat KohlI) नॅथन लियॉनचा झेल घेताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 300 झेल पूर्ण केले आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीतील एकदिवसीय-कसोटी आणि टी-20 सह 494 वा सामना खेळला आहे. ज्यामध्ये त्याने आतापर्यंत 299 झेल घेतले होते. पण आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 झेल पूर्ण झाले आहेत. 300 झेल पूर्ण होताच विराट कोहलीने कॅचचं त्रिशतक पूर्ण केले आहे. अश्विनच्या चेंडूवर त्याने स्लिप्समध्ये नॅथन लायनचा अप्रतिम झेल घेतला. अहमदाबाद कसोटीत त्याने ही कामगिरी केली. 300 झेल घेणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे, त्याच्या आधी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ही कामगिरी केली होती. द्रविडने 334 झेल घेतले आहेत. सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत विराट कोहली सातव्या स्थानावर आहे.

सर्वाधिक झेल पकडणारे खेळाडू

  • महिला जयवर्धने – 440
  • रिकी पाँटिंग – 364
  • रॉस टेलर – 351
  • जॅक कॅलिस – 338
  • राहुल द्रविड – 334
  • स्टीफन फ्लेमिंग – 306
  • विराट कोहली – 300
  • ग्रॅमी स्मिथ – 292
  • मायकेल वॉ - 289
  • ब्रायन लारा – 284

ख्वाजा, ग्रीनचं शतक तर अश्विननं घेतल्या 6 विकेट्स

उस्मान ख्वाजा आणि कॅमरुन ग्रीन यांच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात 480 धावांचा डोंगर उभारला. भारताकडून आर अश्विन याने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने बिनबाद 36 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 16 तर शुभमन गिल 17 धावांवर खेळत आहेत. भारत अद्याप 444 धावांनी पिछाडीवर आहे. 

अश्विनचाही खास रेकॉर्ड

अश्विननं एका डावात 6 विकेट्स घेत आणखी एक 5 Wickets Haul हाऊल अर्थात एका डावात पाच विकेट घेण्याचा खास रेकॉर्ड केला आहे. अश्विननं 26 व्या वेळेस घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात एका डावात 5 हून अधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला. त्याने अनिल कुंबळेचा घरच्या मैदानावर सर्वाधिक वेळा 5 हून अधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड मोडला. कुंबळेनं ही कामगिरी 25 वेळा केली होती. विशेष म्हणजे अश्विननं 55 वा कसोटी सामना घरच्या मैदानावर खेळताना ही कामगिरी केली असून कुंबळेने ही कामगिरी 63 सामन्यात केली होती. 

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 1st Test : यशस्वी जैस्वाल पडला, राहुल धावला अन् दोघे एकाच टोकाला; पहिल्या सामन्यात विचित्र रन आऊट, नेमकं काय घडलं? पाहा Video
यशस्वी जैस्वाल पडला, राहुल धावला अन् दोघे एकाच टोकाला; पहिल्या सामन्यात विचित्र रन आऊट, नेमकं काय घडलं? पाहा Video
AUS vs BAN 1st Test : आधी फलंदाजीत फजिती, मग गोलंदाजीत धुलाई; आता फिल्डिंगनेही लाज काढली, एकेकाळी जगाला धडकी भरवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला झालंय तरी काय?
आधी फलंदाजीत फजिती, मग गोलंदाजीत धुलाई; आता फिल्डिंगनेही लाज काढली, एकेकाळी जगाला धडकी भरवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला झालंय तरी काय?
LIVE सामन्यात गर्लफ्रेंडला मेसेज केला अन् भलतंच घडलं! BCCIने ठोकला लाखांचा दंड, नेमकं काय घडलं?
LIVE सामन्यात गर्लफ्रेंडला मेसेज केला अन् भलतंच घडलं! BCCIने ठोकला लाखांचा दंड, नेमकं काय घडलं?
Ind vs Sl 1st Test : सरफराजला पुन्हा बाकावर बसवलं! गिलने टॉस जिंकत घेतला धाडसी निर्णय; 3 फिरकीपटूंसह मैदानात, अशी आहे टीम इंडियाची Playing XI
सरफराजला पुन्हा बाकावर बसवलं! गिलने टॉस जिंकत घेतला धाडसी निर्णय; 3 फिरकीपटूंसह मैदानात, अशी आहे टीम इंडियाची Playing XI

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Embed widget