एक्स्प्लोर

रोहित शर्मा-विराट कोहलीने बीसीसीआयची अट मान्य केली?; बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी देशांतर्गत स्पर्धा खेळणार

Virat Kohli And Rohit Sharma Likely to Play 2024 Duleep Trophy: रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

Virat Kohli And Rohit Sharma Likely to Play 2024 Duleep Trophy: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनूसार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही दिग्गज फलंदाज 2024 च्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहेत. विराट कोहली आणि रोहित सर्मा बराच काळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळलेले नाहीत. अशा स्थितीत टीम इंडियाचे हे दोन दिग्गज खेळाडू देशांतर्गत स्पर्धेत खेळणे आश्चर्यकारक आहे.

भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय)ने दुलीप ट्रॉफीच्या फॉरमॅटमध्ये मोठे बदल केले आहेत. आता ही स्पर्धा झोनल फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार नाही. यामध्ये फक्त चार संघ असतील. या संघांची अद्याप घोषणा झालेली नाही. दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया-ए, इंडिया-बी, इंडिया-सी आणि इंडिया-डी असे चार संघ खेळतील.

5 सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार-

दुलीप करंडक स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र, रोहित शर्मा आणि विराट कोहली पुढील फेरीपासून ही स्पर्धा खेळू शकतात. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू दुलीप ट्रॉफीत भाग घेणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. दुसऱ्या फेरीचे सामने 12 सप्टेंबरपासून होणार आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. 

इशान किशनही दुलीप ट्रॉफीत खेळण्याची शक्यता-

एका वृत्तानूसार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनही दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे. इशान किशन जवळपास दीड वर्षांपासून टीम इंडियाचा भाग नाही. यानंतर बीसीसीआयने इशान किशनला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले होते. पण आजारपणामुळे तो खेळला नाही, मात्र काही दिवसांनी आयपीएलसाठी सराव करताना दिसला. काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयने कसोटी संघातील खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना यात सूट मिळाल्याची बातमी आली होती. मात्र आता बांगलादेश मालिकेपूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील देशांतर्गत क्रिकेट खेळणार असल्याचं समोर येत आहे.

बांगलादेशविरुद्ध कशी असेल मालिका?

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत खेळवला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूर येथे होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना धर्मशाला येथे होणार आहे. हा सामना 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर दुसरा टी-20 सामना 9 ऑक्टोबरला दिल्लीत खेळवला जाईल. तिसरा आणि शेवटचा सामना 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये होणार आहे.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BAN vs PAK 2nd Test : पाकिस्तानच्या खेळाडूसोबत LIVE मॅचमध्ये मोठा अपघात! चेंडू अडवायला गेला अन् डोक्यावर पडला; स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर
पाकिस्तानच्या खेळाडूसोबत LIVE मॅचमध्ये मोठा अपघात! चेंडू अडवायला गेला अन् डोक्यावर पडला; स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर
Hardik Pandya : मुंबई बाहेर होताच अन् IPL संपायच्या आधीच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार हार्दिक पांड्या? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल, सत्य काय?
मुंबई बाहेर होताच अन् IPL संपायच्या आधीच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार हार्दिक पांड्या? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल, सत्य काय?
CSK Playoffs Scenarios : MS धोनी नाही, मुख्य बॉलरही बाहेर, सर्व काही विरोधात गेले तरी मराठमोळा ऋतुराज नडला; CSK अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकते? वाचा समीकरण
MS धोनी नाही, मुख्य बॉलरही बाहेर, सर्व काही विरोधात गेले तरी मराठमोळा ऋतुराज नडला; CSK अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकते? वाचा समीकरण
IPL 2026 Points Table: आयपीएल पॉईंट टेबलमध्ये भयंकर ट्विस्ट, लखनऊकडून पराभव स्वीकारत चेन्नई सहाव्या क्रमांकावर घसरली; तर... 15 मे नंतर कसं बदललं समीकरण
आयपीएल पॉईंट टेबलमध्ये भयंकर ट्विस्ट, लखनऊकडून पराभव स्वीकारत चेन्नई सहाव्या क्रमांकावर घसरली; तर... 15 मे नंतर कसं बदललं समीकरण

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Ahilyanagar Leopard News: समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
NEET Scam: NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
पश्चिम बंगालमध्ये हैदोस सुरूच; आता लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून पोलीस स्टेशन फोडलं; केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
पश्चिम बंगालमध्ये हैदोस सुरूच; आता लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून पोलीस स्टेशन फोडलं; केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
Embed widget