एक्स्प्लोर
Advertisement
IND vs SA : मालिकेत बरोबरी साधण्यासाठी टीम इंडिया सज्ज; 'या' 5 खेळाडूंवर असेल सर्व मदार
Team India : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज चौथा टी20 सामना खेळवला जाणार असून हा जिंकणं भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
India vs South Africa, T20 : आज राजकोटच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टी20 मालिकेतील चौथा सामना खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले असल्याने त्यांनी मालिकेत आधी 2-0 ची आघाडी घेतली. पण त्यानंतर तिसरा सामना भारताने जिंकत मालिकेत पुनरागमन केलं आहे. पण आजचा सामना जिंकला तरच भारताचं मालिकेतील आव्हान जिंवत राहिल. जर दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला तर ते मालिकेही जिंकतील. त्यामुळे आजचा सामना जिंकणं भारताला अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तर भारतीय संघाचा विचार करता नेमकं कोणत्या 5 खेळाडूंवर सर्वांचं लक्ष असेल ते पाहूया...
- ईशान किशन : भारताकडून तिनही टी20 सामन्यात दमदार कामगिरी कऱणाऱ्या ईशानने दोन अर्धशतकंही लगावली आहेत. भारताकडून सर्वाधिक धावा त्यानेच केल्या असल्याने आजही त्याच्यावर सर्वांची नजर असेल. एक चांगली सुरुवात त्याच्याकडून अपेक्षित असेल.
- ऋतुराज गायकवाड : भारताचा आणखी एक युवा खेळाडू ज्याच्याकडे अनेकांचे लक्ष असेल तो म्हणजे सलामीवीर ऋतुराज गायकवाड. पहिले दोन सामने खास कामगिरी न केलेल्या ऋतुने तिसऱ्या सामन्यात मात्र अर्धशतक लगावत भारताच्या विजयात मोलाची भागिदारी दिली. त्यामुळे आजही ईशानसोबत तो एक चांगली सुरुवात करुन देईल अशी अपेक्षा आहे.
- हार्दिक पांड्या : आयपीएल 2022 स्पर्धेत हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) त्याच्या नेतृत्त्वाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. हार्दिकच्या नेतृत्तवाखालीच गुजरात टायटन्सने आयपीएलचा चषक जिंकला असून त्यानंतर लगेचच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) सामन्यांसाठी हार्दिकची टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली आहे. आथा तीन सामन्यातही त्याने चांगली कामगरी केल्याने आजही त्याच्यावर अनेकांच्या नजरा असतील.
- युजवेंद्र चहल : आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केलेल्या चहलने या मालिकेतही नावाला साजेशी कामगिरी केली आहे. तिसऱ्या सामन्यात त्याने सामनावीराचा पुरस्कारही मिळवला असल्याने आजही त्याच्यावर गोलंदाजीची मदार असणार आहे.
- भुवनेश्वर कुमार : सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत असलेल्या भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज म्हणजे भुवनेश्वर कुमार. त्यामुळे आज त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा होईल अशी शक्यता सर्वचजण वर्तवत आहेत.
हे देखील वाचा-
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
Blog
राजकारण
Advertisement