![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
T20 World Cup: जाणून घ्या.. सुपर-12 सामन्यात टीम इंडिया पाकिस्तान व्यतिरिक्त कोणत्या संघाशी भिडणार
T20 World Cup 2021: सुपर -12 मध्ये भारताला एकूण पाच सामने खेळायचे आहेत. जाणून घ्या भारत कोणत्या संघाशी टक्कर देईल.
![T20 World Cup: जाणून घ्या.. सुपर-12 सामन्यात टीम इंडिया पाकिस्तान व्यतिरिक्त कोणत्या संघाशी भिडणार T20 World Cup 2021 India will play five match in Super 12 first match with pakistan team T20 World Cup: जाणून घ्या.. सुपर-12 सामन्यात टीम इंडिया पाकिस्तान व्यतिरिक्त कोणत्या संघाशी भिडणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/20/4e116d777b5e6b3587af48ab907df951_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
T20 World Cup 2021: T20 विश्वचषक सुरु झाला आहे. मात्र, भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजल्यापासून खेळला जाईल. भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा सुपर-12 मधील हा पहिला सामना आहे. उपांत्य फेरी गाठण्यापूर्वी भारताला सुपर -12 मध्ये पाच सामने खेळावे लागतील. सुपर-12 मधील टीम इंडियाचे सर्व सामने पुढीलप्रमाणे आहेत.
24 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान
31 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड
03 नोव्हेंबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान
05 नोव्हेंबर - भारत विरुद्ध स्कॉटलंड
08 नोव्हेंबर - भारत विरुद्ध नामिबिया
सुपर-12 सामन्यासाठी सर्व संघांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी नामिबियाने आयर्लंडला पराभूत करून सुपर -12 मध्ये स्थान मिळवले. T20 विश्वचषकासाठी सुपर-12 सामने आजपासून म्हणजेच शनिवारपासून सुरू होत आहेत. सुपर -12 सामन्यांचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होईल. त्याचवेळी, संध्याकाळी इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे संघ आमनेसामने असतील.
टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचे खेळाडू
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, isषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन : बाबर आझम ( कर्णधार), असिफ अली, मोहम्मद रिझवान, फखर जमान, हैदर अली, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हरीस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.
भारताच्या पाकिस्तानसोबतच्या पहिल्या सामन्याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, पाकिस्तानही एक चांगला संघ आहे, पण भारत नेहमीच मेंटल सामना जिंकतो, जो खूप निर्णायक असतो. पण 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. त्यानुसार भारताला चांगला खेळ करावा लागणार असून हा सामना खूपच रोमांचक होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)