एक्स्प्लोर

Shubman Gill IND vs WI : ...तर पाचव्या दिवशी ते अवघड ठरले असते, शुभमन गिलने सांगितलं विजयामागील मोठं कारण, आता ऑस्ट्रेलिया जिंकण्याची तयारी

भारताने वेस्ट इंडिजवर दुसऱ्या कसोटीत 7 गडी राखून विजय (Team India beat West Indies 2nd Delhi Test) मिळवत मालिकेत 2-0 अशी जिंकली.

India vs West Indies, 2nd Test : भारताने वेस्ट इंडिजवर दुसऱ्या कसोटीत 7 गडी राखून विजय (Team India beat West Indies 2nd Delhi Test) मिळवत मालिकेत 2-0 अशी जिंकली. ही शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखालील टीम इंडियाची पहिली मालिका विजय ठरली. त्यामुळे गिल आनंदी आणि भावूक दिसला, आणि तसं होणं साहजिकच होतं. कारण भारतात पहिल्याच मालिकेत कर्णधार म्हणून मिळालेला हा ऐतिहासिक विजय त्याच्यासाठी नक्कीच अविस्मरणीय आहे. आता शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्यावर जाणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसतील. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

सामना संपल्यावर शुभमन गिल काय म्हणाला?

शुभमन गिल म्हणाला, “भारताचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी एक मोठी सन्मानाची बाब आहे. या संघातील प्रत्येक खेळाडूला समजून घेणे, त्यांना साथ देणे आणि संघाचे नेतृत्व करणे हे खरोखर अभिमानास्पद आहे. आता मला त्याची सवय झाली आहे. मी नेहमी परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो आणि काही वेळा धाडसी निर्णय घ्यावे लागतात. असा निर्णय त्या खेळाडूवर अवलंबून असतो जो संघासाठी महत्त्वाच्या धावा करू शकतो किंवा निर्णायक विकेट्स मिळवू शकतो.”

दिल्लीत शुभमन गिलचा मास्टरस्ट्रोक

शुभमन गिल म्हणाला की, “आम्ही जवळपास 300 धावांनी आघाडीवर होतो. आम्हाला वाटले की जरी आम्ही आमची आघाडी वाढवून 500 धावा केल्या असत्या, तरी पाचव्या दिवशी 6-7 विकेट्स घेणे आमच्यासाठी अवघड ठरले असते. नितीश कुमार रेड्डीला या सामन्यात गोलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही, त्यामुळे आम्हाला त्याला संधी द्यायची होती. आम्ही फक्त खेळाडूंना परदेशात खेळवण्यावर विश्वास ठेवत नाही, कारण त्यामुळे त्यांच्यावर अनावश्यक दबाव येतो. आमचा उद्देश असे खेळाडू तयार करण्याचा आहे जे भविष्यात परदेशात जाऊन सामने जिंकण्यात आमची ताकद वाढवू शकतील, कारण ते आमच्यासाठी खरे आव्हान आहे.”

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने यशस्वी जैसवाल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर 518 धावांचा डोंगर उभारला आणि पहिली डाव घोषित केला. प्रत्युत्तर वेस्ट इंडिजचा पहिला डाव केवळ 248 धावांवर आटोपला.

मालिकेत वेस्ट इंडिजची फलंदाजी आतापर्यंत निराशाजनक राहिल्याने भारताने त्यांना फॉलोऑन दिला. मात्र, फॉलोऑन मिळाल्यानंतर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी पुनरागमन करत 390 धावा करत भारतावर आघाडी मिळवली. शेवटी वेस्ट इंडिजने भारतासमोर 121 धावांचे लक्ष्य ठेवले, जे टीम इंडियाने सहज गाठत दुसऱ्या कसोटीत 7 गडी राखून विजय मिळवला.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget