एक्स्प्लोर

IND vs ENG 3rd T20 : कॅप्टनचा संयम सुटला! इंग्लंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर श्रेयस अय्यरचा थेट इशारा; म्हणाला, आता खेळाडूंना...

Shreyas Iyer IND vs ENG 3rd T20 : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताला 125 धावांनी दारूण पराभवाचा सामना करावा लागला.

Shreyas Iyer IND vs ENG 3rd T20 : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताला 125 धावांनी दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय टी-20 संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरचा संयम सुटला असून, त्याने खेळाडूंना कडक शब्दांत सुनावले आहे. "आता प्रत्येक खेळाडूला स्वतःची जबाबदारी घ्यावीच लागेल," अशा स्पष्ट शब्दांत अय्यरने आपला संताप व्यक्त केला. ट्रेंटब्रिज येथे झालेल्या या सामन्यातील टीम इंडियाच्या कामगिरीला त्याने अत्यंत खराब असे संबोधले आहे. या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या 11.4 षटकांत 76 धावांवर गारद झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताची ही दुसरी सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली आहे, तर धावांच्या दृष्टीने हा भारताचा आजवरचा सर्वात मोठा आणि मानहानीकारक पराभव आहे.

पराभवानंतर काय म्हणाला कर्णधार श्रेयस अय्यर? (Shreyas Iyer IND vs ENG 3rd T20)

श्रेयस अय्यरने टी-20 संघाचे कर्णधारपद सांभाळल्यापासून भारताला अजून एकही विजय मिळवता आलेला नाही. आधी आयर्लंडने भारताला 2-0 असे पराभूत केले, आणि आता इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांपैकी दोन सामने भारताने गमावले आहेत. तिसऱ्या टी-20 सामन्यातील खराब कामगिरीवर बोलताना श्रेयस म्हणाला की, "हा अत्यंत सुमार दर्जाचा खेळ होता. या कामगिरीचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे यापेक्षा दुसरा कोणताही चांगला शब्द नाही. इतक्या मोठ्या फरकाने पराभूत होणे अजिबात स्वीकारार्ह नाही."

भारताने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु इंग्लंडला 7 बाद 201 धावांपर्यंत पोहोचू दिले. इंग्लंडकडून फिल सॉल्टने 70 धावांची तुफानी खेळी केली, तर खालच्या फळीत सॅम करनने नाबाद 41 धावा ठोकल्या. यावर श्रेयस म्हणाला की, इंग्लंडला 200 धावांपर्यंत पोहोचू द्यायला नको होते, कारण ही खेळपट्टी एवढ्या धावांची नव्हती.

भारतीय फलंदाजांची सुमार कामगिरी

202 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अत्यंत बेजबाबदारपणे विकेट्स गमावल्या. खेळपट्टीवर टिकून राहण्याऐवजी भारतीय फलंदाज चुकीचे आणि हवेत शॉट्स खेळण्याच्या नादात बाद झाले. संपूर्ण संघातून केवळ 4 फलंदाजांनाच दोन अंकी धावसंख्या गाठता आली. वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, स्वतः कर्णधार श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल हे सर्वच खेळाडू मोठे शॉट्स मारण्याच्या नादात बाद झाले. यामुळे भारताने पॉवरप्लेमध्येच आपले 5 महत्त्वाचे फलंदाज गमावले. गेल्या 5 सामन्यांपासून भारतीय फलंदाजीचा क्रम अशाच प्रकारे पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळताना दिसत आहे.

श्रेयस अय्यरचा खेळाडूंना कडक इशारा

संघाच्या सततच्या खराब कामगिरीवर बोट ठेवत श्रेयस अय्यरने खेळाडूंना थेट इशारा दिला आहे. तो म्हणाला की, "आम्ही खूपच खराब क्रिकेट खेळलो आहोत. आता खेळाडूंनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण मैदानावर कशा प्रकारे प्रभाव पाडू शकतो आणि संघाला विजयाच्या मार्गावर कसे आणू शकतो, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.  त्यामुळे निश्चितपणे आता प्रत्येक खेळाडूला स्वतःहून विचार करावा लागेल आणि आपण संघाला मॅच कशी जिंकवून देऊ शकतो, याची वैयक्तिक जबाबदारी घ्यावी लागेल."

हे ही वाचा -

India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
Auqib Nabi Profile : वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी
वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget