एक्स्प्लोर

विराट-रोहितच्या वापसीने हार्दिक पांड्याची पुरती अडचण; दुखापतीनेही घोळ केला!

IND Vs AFG :  अफगाणिस्तानविरोधातील टी 20 मालिकेत भारताचे सर्वात अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं टीम इंडियात कमबॅक झालेय. या दोघांच्या कमबॅकनंतर चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले.

IND Vs AFG :  अफगाणिस्तानविरोधातील टी 20 मालिकेत भारताचे सर्वात अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं टीम इंडियात कमबॅक झालेय. या दोघांच्या कमबॅकनंतर चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. 14 महिन्यानंतर विराट आणि रोहित यांनी टी 20 मध्ये कमबॅक का केलं? निवड समितीला हा निर्णय का घ्यावा लागला? यासारखे प्रश्न चाहत्यांच्या मनात काहूर माजत असतील. टी 20 विश्वचषकाआधी निवड समितीने अनुभवी रोहित आणि विराट कोहली यांच्यावर पुन्हा एकदा का विश्वास दाखवला? हे समजणं तितकेही अवघड नाही..

मर्यादीत क्रिकेट स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा जगातील सर्वात शानदार फलंदाजांपैकी आहेत. रेकॉर्ड्स पाहिलं तर सध्याचा एकही खेळाडू त्यांच्या आसपासही नाही. रोहित आणि विराट या दोन्ही दिग्गज खेळाडूंचा अलीकडचा फॉर्म पाहता त्यांच्या निवडीकडे दुर्लक्ष करणे निवड समितीला शक्य नव्हते. रोहित शर्माने एकदिवसीय विश्वचषकातील जवळपास प्रत्येक सामन्यात संघाला विस्फोटक सुरुवात करून दिली. रोहितने स्ट्राइक रेटबाबत विचारलेल्या प्रश्नांना त्याच्या विश्वचषकातील कामगिरीसह उत्तरेही दिली. विराट कोहलीनेही जवळपास प्रत्येक सामन्यात शानदार फलंदाजी केली आणि अँकरच्या भूमिकेत अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे विराट कोहलीचा दावाही बळकट आहे.


रोहित-विराट कोहलीचं कमबॅक का झालं ?

हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांची दुखापत रोहित आणि विराट या जोडीच्या पथ्यावर पडली. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची बॅटिंग ऑर्डरमध्ये अनुभव कमी दिसत होता. त्याशिवाय नेतृत्व म्हणून अन्य एकही खेळाडू अद्याप तयार झालेला नाही. 

हार्दिक आणि सूर्याच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जागा भरुन काढण्यात रोहित शर्माशिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. नुकत्याच झालेल्या विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाचं सर्वांनीच कौतुक केले. त्याशिवाय ड्रेसिंग रुममधील वातावरणही सकारात्मक होतं. दुसरीकडे विराट कोहलीकडे परिस्थितीनुसार खेळण्याची क्षमता आहे. विराट कोहली कोणत्याही क्षणाला आपला खेळ बदलू शकतो. मागील टी 20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहली भारताचा बेस्ट फलंदाज होता. या सर्व कारणामुळे रोहित आणि विराट कोहली यांचं टी 20 मध्ये कमबॅक झालेय. 

दरम्यान, हार्दिक पांड्याला टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आलं होतं, तर सूर्यकुमार यादवला उपकर्णधार बनवण्यात आलं होतं. असे मानले जात होते की संघ आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यापेक्षा कमीत कमी टी-20 फॉरमॅटमध्ये पुढे गेला आहे. या दोघांना वगळण्याचे एक कारण म्हणजे दोन्ही विश्वचषकातील खराब कामगिरीसाठी टॉप ऑर्डरला जबाबदार धरण्यात आले. टॉप 3 मध्ये रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांच्या उपस्थितीमुळे संघाला या फॉरमॅटमध्ये अपेक्षित सुरुवात होत नव्हती. रोहित शर्मा टी-20 फॉरमॅटमध्ये फलंदाजी करत नव्हता, तर विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या स्ट्राइक रेटवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget