एक्स्प्लोर

विराट-रोहितच्या वापसीने हार्दिक पांड्याची पुरती अडचण; दुखापतीनेही घोळ केला!

IND Vs AFG :  अफगाणिस्तानविरोधातील टी 20 मालिकेत भारताचे सर्वात अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं टीम इंडियात कमबॅक झालेय. या दोघांच्या कमबॅकनंतर चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले.

IND Vs AFG :  अफगाणिस्तानविरोधातील टी 20 मालिकेत भारताचे सर्वात अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं टीम इंडियात कमबॅक झालेय. या दोघांच्या कमबॅकनंतर चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. 14 महिन्यानंतर विराट आणि रोहित यांनी टी 20 मध्ये कमबॅक का केलं? निवड समितीला हा निर्णय का घ्यावा लागला? यासारखे प्रश्न चाहत्यांच्या मनात काहूर माजत असतील. टी 20 विश्वचषकाआधी निवड समितीने अनुभवी रोहित आणि विराट कोहली यांच्यावर पुन्हा एकदा का विश्वास दाखवला? हे समजणं तितकेही अवघड नाही..

मर्यादीत क्रिकेट स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा जगातील सर्वात शानदार फलंदाजांपैकी आहेत. रेकॉर्ड्स पाहिलं तर सध्याचा एकही खेळाडू त्यांच्या आसपासही नाही. रोहित आणि विराट या दोन्ही दिग्गज खेळाडूंचा अलीकडचा फॉर्म पाहता त्यांच्या निवडीकडे दुर्लक्ष करणे निवड समितीला शक्य नव्हते. रोहित शर्माने एकदिवसीय विश्वचषकातील जवळपास प्रत्येक सामन्यात संघाला विस्फोटक सुरुवात करून दिली. रोहितने स्ट्राइक रेटबाबत विचारलेल्या प्रश्नांना त्याच्या विश्वचषकातील कामगिरीसह उत्तरेही दिली. विराट कोहलीनेही जवळपास प्रत्येक सामन्यात शानदार फलंदाजी केली आणि अँकरच्या भूमिकेत अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे विराट कोहलीचा दावाही बळकट आहे.


रोहित-विराट कोहलीचं कमबॅक का झालं ?

हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांची दुखापत रोहित आणि विराट या जोडीच्या पथ्यावर पडली. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची बॅटिंग ऑर्डरमध्ये अनुभव कमी दिसत होता. त्याशिवाय नेतृत्व म्हणून अन्य एकही खेळाडू अद्याप तयार झालेला नाही. 

हार्दिक आणि सूर्याच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जागा भरुन काढण्यात रोहित शर्माशिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. नुकत्याच झालेल्या विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाचं सर्वांनीच कौतुक केले. त्याशिवाय ड्रेसिंग रुममधील वातावरणही सकारात्मक होतं. दुसरीकडे विराट कोहलीकडे परिस्थितीनुसार खेळण्याची क्षमता आहे. विराट कोहली कोणत्याही क्षणाला आपला खेळ बदलू शकतो. मागील टी 20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहली भारताचा बेस्ट फलंदाज होता. या सर्व कारणामुळे रोहित आणि विराट कोहली यांचं टी 20 मध्ये कमबॅक झालेय. 

दरम्यान, हार्दिक पांड्याला टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आलं होतं, तर सूर्यकुमार यादवला उपकर्णधार बनवण्यात आलं होतं. असे मानले जात होते की संघ आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यापेक्षा कमीत कमी टी-20 फॉरमॅटमध्ये पुढे गेला आहे. या दोघांना वगळण्याचे एक कारण म्हणजे दोन्ही विश्वचषकातील खराब कामगिरीसाठी टॉप ऑर्डरला जबाबदार धरण्यात आले. टॉप 3 मध्ये रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांच्या उपस्थितीमुळे संघाला या फॉरमॅटमध्ये अपेक्षित सुरुवात होत नव्हती. रोहित शर्मा टी-20 फॉरमॅटमध्ये फलंदाजी करत नव्हता, तर विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या स्ट्राइक रेटवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi India Debut : रोहित-विराटसोबत वैभव सूर्यवंशी टीम इंडियामध्ये कधी खेळताना दिसणार?; BCCI ने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?
रोहित-विराटसोबत वैभव सूर्यवंशी टीम इंडियामध्ये कधी खेळताना दिसणार?; BCCI ने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?
Virat Kohli-Shubman Gill : शुभमन गिलचा IPL फायनलमधील वादग्रस्त कॅच, विराट कोहलीही रागाने लाले लाल; शेवटी थर्ड अंपायरने केली मध्यस्थी
शुभमन गिलचा IPL फायनलमधील वादग्रस्त कॅच, विराट कोहलीही रागाने लाले लाल; शेवटी थर्ड अंपायरने केली मध्यस्थी
Gujarat Titans Bus Fire News : गुजरात टायटन्सच्या खेळाडूंची मध्यरात्री पळापळ, कोण झाडीत तर कोण रोडवर...; 37 सेकंदाचा धडकी भरवणारा Video समोर
गुजरात टायटन्सच्या खेळाडूंची मध्यरात्री पळापळ, कोण झाडीत तर कोण रोडवर...; 37 सेकंदाचा धडकी भरवणारा Video समोर
Rajat Patidar Profile : वडिलांचा विरोध, गुडघ्याची सर्जरी अन् ऑक्शनमध्ये अपमान...; आता त्याच रजत पाटीदारने लिहिला आयपीएलचा सर्वात मोठा इतिहास
वडिलांचा विरोध, गुडघ्याची सर्जरी अन् ऑक्शनमध्ये अपमान...; आता त्याच रजत पाटीदारने लिहिला आयपीएलचा सर्वात मोठा इतिहास

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
Embed widget