एक्स्प्लोर

Sanju Samson in Ranji Trophy 2025 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून वगळल्यानंतर संजू सॅमसनची तुफानी खेळी! रणजी मॅचमध्ये ठोकले वन डे स्टाइल अर्धशतक

2025-26 रणजी ट्रॉफीच्या एलिट ग्रुप बी मध्ये केरळ आणि महाराष्ट्र हे संघ खेळत आहेत. तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम येथे हा सामना रंगला आहे.

Kerala vs Maharashtra Ranji Trophy 2025 Match : 2025-26 रणजी ट्रॉफीच्या एलिट ग्रुप बी मध्ये केरळ आणि महाराष्ट्र हे संघ खेळत आहेत. तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम येथे हा सामना रंगला आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या डावातील 239 धावांच्या प्रत्युत्तर केरळ फलंदाजी करत आहे. त्यांची सुरुवात खराब होती, त्यांचे टॉप-ऑर्डर फलंदाज अपयश ठरले. दरम्यान, संजू सॅमसनने (Sanju Samson in Ranji Trophy 2025) केवळ आपल्या संघाला स्थिर केले नाही तर एक शानदार खेळीही केली.

भारतीय विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 वर्षे पूर्ण केली असली, तरी या दशकात त्याला त्याच्या योग्यतेइतके संधी मिळाल्या नाहीत. अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघातही त्याला स्थान देण्यात आले नाही. विशेष म्हणजे, सॅमसनने आपल्या शेवटच्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर शतक झळकावत भारताला विजय मिळवून दिला होता. तरीदेखील, ऋषभ पंत अनुपस्थित असताना देखील त्याला दुर्लक्षित करून ध्रुव जुरेल याला पहिल्यांदाच वनडे संघात स्थान देण्यात आले.

दरम्यान, संजू सॅमसनने आता रणजी ट्रॉफी 2025 च्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध अर्धशतक झळकावून आपल्या निवडीबाबत बोलणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्याने दाखवून दिले की ते फक्त टी-20 पुरते मर्यादित खेळाडू नाहीत, तर दीर्घ फॉर्मेटलाही तितकाच जबरदस्त खेळाडू आहे.

संजूने 5 चौकार आणि 1 षटकारासह ठोकल्या इतक्या धावा...

भारतासाठी 16 वनडे सामने खेळूनही संघातून बाहेर ठेवण्यात आलेल्या सॅमसनने रणजीत दमदार खेळी करत 51 चेंडूंवर अर्धशतक ठोकले. जेव्हा केरलचा स्कोअर फक्त 35/3 असा होता, त्यावेळी तो मैदानात आला. त्याने चौथ्या विकेटसाठी सचिन बेबीसोबत 40 धावांची आणि पाचव्या विकेटसाठी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनसोबत 57 धावांची भागीदारी केली. 

सॅमसनने जवळपास 85 च्या स्ट्राईक रेटने 63 चेंडूंच्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकारासह 54 धावा केल्या. त्याच्या वनडे कारकिर्दीतील स्ट्राईक रेट 99.61 आहे. त्याने आतापर्यंत भारतासाठी 16 वनडे सामन्यांत 1 शतक, 3 अर्धशतके मिळवून 510 धावा केल्या आहेत. तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 49 सामन्यांत 3 शतक आणि 3 अर्धशतकांसह 993 धावा झळकावल्या आहेत.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, महाराष्ट्राने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये संघाने 0 धावांवर 3 विकेट आणि 18 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर ऋतुराज गायकवाड (91) आणि जलज सक्सेना (49) यांनी डाव सावरला. अखेरीस विकी ओस्टवाल (38) आणि रामकृष्ण घोष (31) यांच्या खेळीमुळे महाराष्ट्राने पहिल्या डावात 239 धावा उभारल्या. केरळकडून निधीशने पाच बळी घेतले. प्रत्युत्तरादा, केरळची पहिल्या डावात सुरुवात खराब झाली. एका वेळी, 35 धावांवर तीन बळी गमावल्यानंतर त्यांना संघर्ष करावा लागला. संजू सॅमसनच्या खेळीमुळे, त्यांनी उपाहारापर्यंत 6 बाद 152 धावा केल्या, तरीही ते 87 धावांनी पिछाडीवर होते. 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray PC : फक्त याद्यांमध्ये गोंधळ नाही तर अनेक ठिकाणी घोळ, आदित्य ठाकरेंचा आरोप
Ashwini Naitam NCP : गडचिरोलीकर मलाच निवडून देतील,अजित पवार गटाच्या अश्विनी नैताम यांचा विश्वास
Aditya Thackeray on Amit Satam : भाजप हे हिंदू-मुस्लीम वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे, ठाकरेंची टीका
Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
Donald Trump : बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
Embed widget