एक्स्प्लोर

IPLआधी कसोटीमध्ये कोणत्या खेळाडूने काढली खिशातून चिठ्ठी? ज्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात झाला सर्वात मोठा राडा, ICC थेट केली कारवाई

आयपीएलमध्ये अभिषेक शर्माने गेल्या वर्षी शतक ठोकल्यानंतर मैदानातच खिशातून चिठ्ठी काढली आणि त्याची जगभर चर्चा झाली.

आयपीएलमध्ये अभिषेक शर्माने गेल्या वर्षी शतक ठोकल्यानंतर मैदानातच खिशातून चिठ्ठी काढली आणि त्याची जगभर चर्चा झाली. यंदाच्या हंगामात उर्विल पटेल, रघु आणि आकाश सिंग यांनीही खिशातून चिठ्ठी काढली आणि चाहत्यांचे लक्ष वेधले. पण क्रिकेटमध्ये खिशात रणनीती किंवा आकडेवारीची चिठ्ठी ठेवण्याची परंपरा नवी नाही. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदा अशीही घटना घडली होती, जेव्हा चिठ्ठीचा वापर रणनीतीसाठी नाही, तर एका महान दिग्गजाला थेट उत्तर देण्यासाठी करण्यात आला होता.

ही घटना 2012 मध्ये घडली होती. दिनेश रामदिन या वेस्ट इंडिजच्या माजी यष्टीरक्षक-फलंदाजाने इंग्लंडविरुद्ध एजबेस्टन कसोटीत असे चिठ्ठी कांड केले होते, ज्याने संपूर्ण क्रिकेटविश्व हादरले होते. मैदानावर खेळाडूंमध्ये स्लेजिंग आणि शाब्दिक चकमकी सामान्य असतात, पण स्वतःच्या देशातील महान दिग्गजालाच प्रत्युत्तर देणे, ही गोष्ट इतिहासात नोंदली गेली.

टीकेला दिले अनोखे उत्तर

त्या मालिकेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये रामदिन सतत खराब फॉर्ममध्ये होता. त्यावेळी वेस्ट इंडिजचे महान फलंदाज व्हिव्ह रिचर्ड्स यांनी त्याच्या विकेटकीपिंग आणि फलंदाजीवर कठोर टीका केली होती. “रामदिनचा खेळ खूप घसरला आहे,” असे व्हिव्ह रिचर्ड्स यांनी म्हटले होते. ही टीका रामदिनच्या मनाला लागली आणि त्याने उत्तर देण्यासाठी एक आक्रमक आणि वेगळाच मार्ग निवडला. एजबेस्टन येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी रामदिनने अप्रतिम फलंदाजी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याने 107 धावांची खेळी केली आणि शतक पूर्ण होताच सगळ्यांना धक्का बसला.

रामदिनने खिशातून आधीच लिहून ठेवलेली एक पांढरी चिठ्ठी बाहेर काढली आणि ती कॅमेऱ्यांसमोर दाखवली. त्या चिठ्ठीवर मोठ्या अक्षरांत लिहिले होते की, हो व्हिव्ह, आता बोला ना. हे थेट व्हिव्ह रिचर्ड्स यांना दिलेली एक खुले आव्हान होते. विशेष म्हणजे त्या वेळी व्हिव्ह रिचर्ड्स बीबीसी रेडिओसाठी कॉमेंट्री बॉक्समध्येच उपस्थित होते.

ICC ची कारवाई; दंडही बसला

रामदिनने बॅटने स्वतःला सिद्ध केले होते, पण एका महान माजी कर्णधाराची अशा पद्धतीने खिल्ली उडवणे हे क्रिकेटच्या भावना आणि शिस्तीविरुद्ध मानले गेले. त्यामुळे आयसीसीने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. मॅच रेफरी रोशन महानामा यांनी रामदिनच्या कृतीला लेव्हल-1  गुन्हा ठरवत त्याच्यावर कारवाई केली. शिक्षा म्हणून त्याच्या मॅच फीपैकी 20 टक्के रक्कम कापण्यात आली.

नंतर आली चूक लक्षात

काही काळानंतर दिनेश रामदीन याला स्वतःच्या या भावनिक आणि आक्रमक वागण्याचा पश्चात्ताप झाला. त्याने माध्यमांसमोर मान्य केले की तो त्या वेळी खूप भावनिक झाला होता आणि क्रिकेटमधील इतक्या मोठ्या दिग्गजाविरुद्ध अशी वागणूक देणे चुकीचे होते. वर्षांनंतर एका मुलाखतीत रामदिन म्हणाला की, “वय आणि अनुभव वाढल्यानंतर मला समजले की ती कृती चुकीची होती.” आता त्याचे आणि व्हिव्ह रिचर्ड्स यांचे संबंध पूर्णपणे सामान्य आणि चांगले आहेत.

हे ही वाचा -

CSK vs SRH Live Update IPL 2026 : चेन्नई-हैदराबाद लढतीकडे संपूर्ण IPLचं लक्ष, MS धोनीबाबत मोठी अपडेट, प्लेऑफची शर्यत कोण जिंकणार?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
Sanju Samson : संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, अभिषेक- वैभव सलामीची जोडी होऊ शकत नाही, मोहम्मद कैफ संतापला 
संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, टीम इंडियाच्या प्लॅनिंगवर मोहम्मद कैफ संतापला
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget