एक्स्प्लोर

Ind vs Wi 2nd Test : कुलदीप यादवच्या फिरकीत वेस्ट इंडिज नेस्तनाबूत; फॉलोऑनसुद्धा वाचवू शकले नाहीत, टीम इंडियाकडून कोणी किती विकेट्स पटकावल्या?

India vs West Indies 2nd Test : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडीजचा पहिला डाव तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात केवळ 248 धावांवर संपुष्टात आला.

India vs West Indies 2nd Test : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडीजचा पहिला डाव तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात केवळ 248 धावांवर संपुष्टात आला. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 बाद 518 धावा केल्या होत्या, त्यामुळे टीम इंडियाला 270 धावांची भक्कम आघाडी मिळाली. वेस्टइंडीजला फॉलोऑन सुद्धा वाचवता आला नाही आणि त्यांना पुन्हा फलंदाजीला उतरावे लागले. या संपूर्ण डावात कुलदीप यादवचा कहर पाहायला मिळाला, त्याने एकहाती पाच विकेट्स घेतल्या.

अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा डाव आणि 140 धावांनी पराभव केला होता. आता दिल्लीतही वेस्ट इंडिजचा असाच एक मोठा पराभव होऊ शकतो. या सामन्याबद्दल बोलताना, टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून यशस्वी जैस्वालने 175 आणि कर्णधार शुभमन गिलने 129 धावा केल्या. याशिवाय साई सुदर्शनने 87, ध्रुव जुरेलने 44 आणि नितीश कुमार रेड्डी यांनी 43 धावा केल्या. केएल राहुलनेही 38 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून जोमेल वॉरिकनने तीन आणि कर्णधार रोस्टन चेसने एक बळी घेतला. भारतीय फलंदाजांसमोर वेस्ट इंडिजचे गोलंदाज असहाय्य दिसत होते.

कुलदीप यादवच्या फिरकीत वेस्ट इंडिज नेस्तनाबूत

तिसऱ्या दिवशी वेस्टइंडीजने 4 बाद 140 अशा स्थितीतून पुढे खेळायला सुरुवात केली, पण कुलदीप यादवच्या फिरकीत ते फिसले. त्याने प्रमुख फलंदाज शाई होपला बोल्ड करत भारताला पहिला झटका दिला (36 धावा). त्यानंतर टेविन इमलाचला एल्बीडब्ल्यू आणि मग जस्टिन ग्रीव्सलाही बाद करत एकामागोमाग तीन बळी घेतले. मोहम्मद सिराजने जोमेल वॉरिकनला बोल्ड करत वेस्टइंडीजचा आठवा गडी बाद केला, तेव्हा त्यांचा स्कोर 175 होता. मात्र, खारी पियरे आणि अँडरसन फिलिप यांनी नवव्या विकेटसाठी चांगली झुंज दिली आणि 42 धावांची भागीदारी रचली. लंचनंतर मात्र जसप्रीत बुमराहने पियरेला (23 धावा) बोल्ड करत ती जोडी फोडली.

टीम इंडियाकडून कोणी किती विकेट्स पटकावल्या? 

शेवटची विकेट मिळवण्यासाठी भारताला थोडा संघर्ष करावा लागला. फिलिप आणि जायडन सील्स यांनी 27 धावा जोडल्या. शेवटी कुलदीप यादवने सील्सला बाद करून वेस्टइंडीजचा डाव गुंडाळला आणि वेस्ट इंडिजला फॉलोऑन करण्यास भाग पाडले आहे. भारतीय संघानेही फॉलोऑन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजकडून अ‍ॅलिक अथानासेने 41 धावा केल्या, तर शाई होप आणि तेजनारायण चंद्रपॉल यांनी अनुक्रमे 36 आणि 34 धावा केल्या. तर कुलदीपने 82 धावांत 5 विकेट घेत आपला कसोटी कारकिर्दीतील पाचव्यांदा ‘फाईव्ह-फॉर’ पूर्ण केला. रवींद्र जडेजाने तीन, तर सिराज आणि बुमराह यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
Embed widget