एक्स्प्लोर

आशिया चषकाच्या फायनलआधी भारतीय संघाला सुनंदन लेलेंचा मोलाचा सल्ला

Asia Cup Final : आशिया चषका 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होणार आहे.

India vs Sri Lanka In Asia Cup Final : आशिया चषका 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर लढत होणार आहे. ३० ऑगस्टपासून सुरु असणाऱ्या स्पर्धेचा विजेता रविवारी मिळणार आहे. अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे, फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. सुपर ४ फेरीत श्रीलंकेला हरवत भारताने फायनलमध्ये प्रवेश केला होता. फायनलचे तिकिट मिळवणारा भारत पहिला संघ ठरला होता. पाकिस्तानचा पराभव करत श्रीलंका संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता रविवारी आशिया चषकाचा किंग कोण? यावरुन पडदा उठणार आहे. पण भारत आणि श्रीलंका आशिया चषकाच्या फायनलमध्ये आठव्यांदा आमनेसामने आलेत. याआधी या दोन संघामध्ये सातवेळा स्पर्धा रंगली होती.  रविवारी होणाऱ्या स्पर्धेआधी सुनंदन लेले यांनी भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिलाय.

आशिया चषक म्हटले की भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना, त्यासाठीच संयोजक झटत असतात असे डोक्यात येते. भारत आणि पाकिस्तान फायनलला यावेत असे वेळापत्रकही ठरवलेले असते. पण असे होत मात्र नाही. मागील अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन संघामध्ये फायनलची लढत झालेली नाही. रविवारी भारत आणि गतविजेत्या श्रीलंका या दोन संघामध्ये होणार आहे.  

गतविजेत्या श्रीलंका संघाने पाकिस्तानचा पराभव करत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. कागदावर भारतीय संघ श्रीलंकेपेक्षा अधिक मजबूत दिसत आहे. कारण, भारतीय संघात अनुभवाचा भरणा आहे. टीम इंडियात एकापेक्षा एक दिग्गज आहेत. त्याशिवाय गुणवंत खेळाडूही आहेत. पण अनुभव आणि गुणवत्ता योग्य वेळी कामाला येणार का? अशी शंका मनात सतावते. कारण, बांगलादेशविरोधात भारतीय संघाला पराभवचा सामना करावा लागला होता. बांगलादेशविरोधात काही कारण नसताना भारताचा पराभव झाला. पण रविवारी भारताला पुन्हा तीच चूक महागात ठरु शकतो. कारण हा आशिया चषकाचा अंतिम सामना आहे. 

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाला मल्टीनॅशनल स्पर्धेत विजय मिळवता आला नाही.  आयसीसी असो अथवा आशिया चषकात भारताला जेतेपद मिळवता आला नाही. आशिया चषकाच्या जेतेपदावर टीम इंडियाला नाव कोरावेच लागेल. त्यासाठी भारतीय संघाला काही गोष्टी कराव्या लागतील. संथ खेळपट्टीवर एकेरी दुहेरी धावसंख्या काढण्याचे तंत्र शोधावे लागेल. श्रीलंका संघातील फिरकी गोलंदाज तुम्हाला मोठे फटके मारु देणार नाही, त्यामुळे एकेरी दुहेरी धावसंख्यावर भर द्यावा लागेल. आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंका संघाविरोधात भारतीय संघ कमकुवत चेंडूवर एकेरी दुहेरी धावसंख्या काढावी लागेल.

महिश तिक्ष्णाच्या अनुपस्थितीचा फटका श्रीलंकेला बसणार आहे. पण मागील काही सामन्यात कामचलाऊ फिरकी गोलंदाजांनी दर्जेदार गोलंदाजी केली. रविवारीच्या सामन्यात भारतीय संघाला सकारात्मक क्रिकेट खेळावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

29 धावांत 8 विकेट्स... पण तरी जिंकली ट्रॉफी! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात करिश्माई फायनल सामना; जिथे गोलंदाजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं
29 धावांत 8 विकेट्स... पण तरी जिंकली ट्रॉफी! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात करिश्माई फायनल सामना; जिथे गोलंदाजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं
Hardik Pandya IPL Trade 2027 : 10 कोटींची कॅश अन् खेळाडूंची अदलाबदल? हार्दिक पांड्याच्या ट्रेडवर मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा धमाका, नेमकं चाललयं तरी काय?
10 कोटींची कॅश अन् खेळाडूंची अदलाबदल? हार्दिक पांड्याच्या ट्रेडवर मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा धमाका, नेमकं चाललयं तरी काय?
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
South Zone Squad for Duleep Trophy : मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर त्रिशतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad
मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर त्रिशतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Embed widget