एक्स्प्लोर

कभी-कभी लोग भूल जाते हैं! भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांना फायनलचं आमंत्रणच नव्हतं, काँग्रेसकडून BCCI वर ताशेरे

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वर्ल्डकपवर सर्वात पहिल्यांदा भारतीय क्रिकेट संघाचं नाव कोरणारे कपिल देव यांना फायनलसाठी आमंत्रणच नव्हतं. काँग्रेसचे ट्वीट करत गंभीर आरोप.

ICC World Cup 2023, IND vs AUS : गुजरातच्या (Gujarat) अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) रविवारी (19 नोव्हेंबर 2023) टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील अंतिम सामना खेळला गेला. आतापर्यंतचे सर्व विश्वचषक (World Cup 2023) विजेते कर्णधार वर्ल्डकप 2023 च्या अंतिम सामन्यात सहभागी झाले होते. पण, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वर्ल्डकपवर सर्वात पहिल्यांदा भारतीय क्रिकेट संघाचं नाव कोरणारे कपिल देव (Kapil Dev) मात्र अंतिम सामन्यासाठी उपस्थित नव्हते. यावरुन काँग्रेसनं (Congress) बीसीसीआयवर (BCCI) टीकास्त्र डागलं आहे. तसेच, स्वतः कपिल देव यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट केलं की, कपिल देव यांना बीसीसीआयनं अहमदाबाद येथे होणाऱ्या विश्वचषक फायनलसाठी आमंत्रित केलं नव्हतं, हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. ते म्हणाले की, बेदींप्रमाणेच कपिल देव हे देखील त्यांची दिलखुलास मतं परखडपणे मांडण्यासाठी ओळखले जातात. तसेच, काही महिन्यांपूर्वी त्यांनी आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंचं समर्थन केलं होतं. 

बीसीसीआयनं जारी केलेल्या प्लॅननुसार, आजच्या सामन्यादरम्यान विश्वविजेत्या संघाच्या कर्णधारांना सन्मानित करण्यात येणार होतं. ज्यासाठी कपिल देव यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं.

कधी-कधी लोक विसरुन जातात : कपिल देव 

घडल्या प्रकाराबाबत स्वतः कपिल देव यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. कपिल देव म्हणाले की, मला माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत हा प्रवास करायचा होता. पण मला त्या सोहळ्यासाठी आमंत्रणच दिलं नव्हतं. त्यांनी मला बोलावलं नाही, त्यामुळे मी गेलोच नाही. मला असं वाटत होतं की, अंतिम सामना पाहताना माझ्यासोबत 1983 ची संपूर्ण टीम असावी, परंतु मला असं वाटतंय की, खूप मोठं आयोजन होतं आणि कधीकधी लोक जबाबदाऱ्या सांभाळताना काही गोष्टी विसरुन जातात.

टीम इंडियाचा पराभव, कांगारूंची सरशी 

आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये स्फोटक सुरुवात करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघानं अंतिम फेरीपर्यंत एकही सामना गमावला नाही. टीम इंडियानं स्पर्धेतील सर्व 10 सामने जिंकून अंतिम फेरीत थाटात प्रवेश केलेला. अशा परिस्थितीत टीम इंडियाच विजेतेपद पटकावून इतिहास रचेल, असं दिग्गजांसह चाहत्यांनाही वाटत होतं. पण, 140 कोटी भारतीयांच्या स्वप्नांवर पाणी फिरलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (19 नोव्हेंबर) अंतिम सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा सामना 5 वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात टीम इंडिया विजयी पताका फडकवणार असा विश्वास प्रत्येक भारतीयाला होताच, पण कांगारूंनी  विजयरथावर स्वार झालेल्या टीम इंडियाला रोखलं आणि विश्वचषकावर नाव कोरलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

India vs Australia World Cup Final Analysis: विजयरथावर स्वार झालेली टीम इंडिया, फायनलमध्ये मात्र सपशेल फ्लॉप, कशी? 'ही' 5 सर्वात मोठी कारणं!

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg 2nd ODI LIVE Update : गिलनंतर इशानचाही धमाका; अफगाणिस्तान टीमचे धाबे दणाणले! मैदानावर नेमकं काय घडतंय?, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Ind vs Afg 2nd ODI LIVE Update : गिलनंतर इशानचाही धमाका; अफगाणिस्तान टीमचे धाबे दणाणले! मैदानावर नेमकं काय घडतंय?, जाणून घ्या LIVE अपडेट्स
IND VS AFG 2nd ODI : ज्यावेळी वाटत होतं आज रोहित इतिहास रचणार, त्याच क्षणी घात झाला! राशिदच्या त्या गुगलीने हिटमॅनला कसं फसवंलं? पाहा Video
ज्यावेळी वाटत होतं आज रोहित इतिहास रचणार, त्याच क्षणी घात झाला! राशिदच्या त्या गुगलीने हिटमॅनला कसं फसवंलं? पाहा Video
Vaibhav Sooryavanshi IND A vs AFG A : पहिले थर्ड अंपायर धावला, मग फिल्डरने जीवदान दिलं; पण वैभव सूर्यवंशीने शेवटी माती खाल्ली?, नेमकं काय घडलं?
पहिले थर्ड अंपायर धावला, मग फिल्डरने जीवदान दिलं; पण वैभव सूर्यवंशीने शेवटी माती खाल्ली?, नेमकं काय घडलं?
Who is Prince Yadav Ind vs Afg 2nd ODI : वय लपवलं म्हणून लागला कलंक, पण कोहलीची विकेट घेतली अन् नशीबच बदललं... फ्लॉप टीमचा 'हा' हिरो कसा बनला भारताचा डेब्यू स्टार?
वय लपवलं म्हणून लागला कलंक, पण कोहलीची विकेट घेतली अन् नशीबच बदललं... फ्लॉप टीमचा 'हा' हिरो कसा बनला भारताचा डेब्यू स्टार?

व्हिडीओ

Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वयाच्या 26व्या वर्षी आमदार अन् दोन वर्षांपूर्वी विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा खासदार; आता शिंदेंच्या गळाला लागताच पुण्यातून दुसऱ्या मार्गाने कलटी मारली, फुटीर ओमराजेंचीच सर्वाधिक चर्चा का होत आहे?
वयाच्या 26व्या वर्षी आमदार अन् दोन वर्षांपूर्वी विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा खासदार; आता शिंदेंच्या गळाला लागताच पुण्यातून दुसऱ्या मार्गाने कलटी मारली, फुटीर ओमराजेंचीच सर्वाधिक चर्चा का होत आहे?
Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या ब्रिजवर भीषण अपघात; कारवर चढली फॉर्च्यूनर, 4 गाड्या एकमेकांना धडकल्या
मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या ब्रिजवर भीषण अपघात; कारवर चढली फॉर्च्यूनर, 4 गाड्या एकमेकांना धडकल्या
Anjali Damania: 'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
Kolhapur News: 'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
Operation Tiger UBT Shivsena: एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, आता ठाकरेंची आमदारांबाबत धाकधूक वाढली, 20 आमदार कोण?
एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, आता ठाकरेंची आमदारांबाबत धाकधूक वाढली, 20 आमदार कोण?
Omraje Nimbalkar: पुण्यातून ओमराजेंच्या 'मातोश्री' म्हणाल्या; रात्री घरीच होते, सकाळी जीमला जातो म्हणून घराबाहेर गेले
पुण्यातून ओमराजेंच्या 'मातोश्री' म्हणाल्या; रात्री घरीच होते, सकाळी जीमला जातो म्हणून घराबाहेर गेले
खासदार फुटीनंतर गुवाहटीवरुन परतलेल्या ठाकरेंच्या निष्ठावंत आमदारांची प्रतिक्रिया, कैलास पाटील अन् नितीन देशमुख म्हणाले...
खासदार फुटीनंतर गुवाहटीवरुन परतलेल्या ठाकरेंच्या निष्ठावंत आमदारांची प्रतिक्रिया, कैलास पाटील अन् नितीन देशमुख म्हणाले...
Ravi Rana on Opearation Tiger UBT: सहा खासदार फुटताच रवी राणांनी उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले,
सहा खासदार फुटताच रवी राणांनी उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, "आणखी दोघे माझ्या संपर्कात"
Embed widget