एक्स्प्लोर

WTC Final 2025 Scenarios : एका सामन्याने बदलले WTC फायनलचे गणित! ऑस्ट्रेलिया रेसमधून बाहेर... टीम इंडियाचे काय आहे समीकरण?

How can India qualify for WTC Final : भारतीय क्रिकेट संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून या महत्त्वाच्या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. 

WTC Final Scenarios for India After Perth Test Match Win : भारतीय क्रिकेट संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून या महत्त्वाच्या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी भारतीय संघाला या मालिकेत चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. सर्वांच्या अपेक्षेविरुद्ध भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. सर्व खेळाडूंच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे भारताने या सामन्यात दमदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत मोठा विजय मिळवला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाचे काय आहे समीकरण?

या सामन्यातील विजयानंतर भारतीय संघाचे मनोबलही खूप उंचावले आहे, जिथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारताने शानदार पुनरागमन केले आणि पहिल्या डावात 150 धावांत गुंडाळल्यानंतर हा सामना जिंकला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित 4 कसोटी सामन्यांमध्ये 4 सामने जिंकावे लागतील किंवा भारतीय संघाने 3 सामने जिंकले आणि 1 सामना अनिर्णित राहिला तर भारतीय संघ अजूनही फायनलसाठी पात्र ठरेल.

याशिवाय भारताला स्वतःच्या सामन्यांशिवाय श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यांवरही लक्ष ठेवावे लागणार आहे. भारतीय संघ कोणताही सामना हरल्यास अंतिम फेरीतील त्यांचे स्थान इतर संघांच्या कामगिरीवर आणि उर्वरित सामन्यांच्या निकालांवर अवलंबून असेल. या कारणास्तव भारतीय संघ आपला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि या मालिकेत 4-0 किंवा 5-0 ने विजय मिळवेल.

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! 

कांगारू संघ आता डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर घसला आहे. सध्याच्या सायकलमध्ये ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने 8 विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाला 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच 1 सामना अनिर्णित राहिला. पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाचे 90 गुण आणि 57.690 पॉइंट टक्केवारी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अजून 4 कसोटी सामने खेळायचे आहेत. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या रेसमधून ऑस्ट्रेलिया बाहेर?

ऑस्ट्रेलिया अजून बाहेर गेला नाही. त्यांना उर्वरित सात सामन्यांतून किमान चार विजय आवश्यक आहेत. तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंका आहे, ज्यांचे चार सामने बाकी आहेत आणि त्यांना WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यापैकी तीन जिंकणे आवश्यक आहे.

भारताने पर्थ कसोटी सामना 295 धावांनी जिंकला

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांना केवळ 150 धावा करता आल्या होत्या. यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला 104 धावांवर ऑलआउट केले. दुसऱ्या डावात भारताने 487 धावा करत मोठी आघाडी घेतली आणि त्यांना 238 धावांवर रोखल्यानंतर 295 धावांनी सामना जिंकला.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget