एक्स्प्लोर

Ind vs Pak :विश्वचषकातील 'त्या' जिव्हारी लागलेल्या पराभवाचा व्याजासकट वचपा काढण्याचा टीम इंडियाला 'मौका'

India vs Pakistan Live : बाबर आझमच्या फौजेनं तो ऐतिहासिक विजय मिळवला, त्याच मैदानात आज भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येत आहेत.  

India vs Pakistan Live : भारत आणि पाकिस्तान  (India vs Pakistan) हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामना आज रंगणार आहे. आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. आता युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात आज रोहित शर्माच्या टीम इंडियाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. बाबर आझमच्या पाकिस्तानी फौजेनं टीम इंडियाचं विश्वचषकातलं निर्विवाद वर्चस्व मोडून काढलं, त्याला जेमतेम दहा महिने उलटलेयत. योगायोगाची गोष्ट म्हणजे बाबर आझमच्या फौजेनं तो ऐतिहासिक विजय मिळवला, त्याच मैदानात आज भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येत आहेत.  

ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या रणांगणात पाकिस्तानकडून टीम इंडियाच्या झालेल्या या पराभवाला दहा महिने उलटलेयत. पण दुबईतल्या त्या पराभवानं करोडो भारतीय क्रिकेटरसिकांच्या हृदयावर झालेली जखम अजूनही ओली आहे.

विराट कोहली आणि त्याच्या टीम इंडियाच्या त्या मानहानीचा वचपा काढण्याचा मौका रोहित शर्मा आणि त्याच्या टीम इंडियाला मिळणार आहे. यावेळी रणांगण ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकाचं असलं, तरी योगायोगाची बाब म्हणजे बाबर आझमच्या फौजेनं विराटसेनेचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवला त्याच दुबईच्या मैदानात पाकिस्तानवर बाजी उलटवण्याचा मौका रोहित शर्माच्या टीम इंडियाला मिळणार आहे. 
 
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या रणांगणात विराट कोहलीच्या टीम इंडियाचा कर्दनकाळ ठरला होता तो डावखुरा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी. त्यानं रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादवला अवघ्या 31 धावांत माघारी धाडून विराटसेनेच्या पराभवाचं भविष्य आधीच लिहिलं. मग मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमच्या अभेद्य सलामीनं भारतीय मनावरच्या जखमेवर पराभवाचं मीठ चोळलं.

पाकिस्तानचा तो विजय टीम इंडियाची ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमधली आजवरची सर्वात मोठी नामुष्की ठरली. कारण या विजयानं ट्वेन्टी ट्वेन्टीच्या इतिहासात प्रतिस्पर्ध्यांवर दहा विकेट्सनी मात करणारा पहिला संघ ठरण्याचा मान पाकिस्तानला मिळवून दिला. इतकंच काय, पण आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात भारताची पाकिस्तानवरची निर्विवाद वर्चस्वाची परंपराही बाबर आझमच्या फौजेनं मोडून काढली. तोवर तब्बल 29 वर्ष टीम इंडिया पाकिस्तानसमोर अपराजित होती. या 29 वर्षांत भारतानं पाकिस्तानवर वन डे विश्वचषकात सात आणि ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पाच विजयांची नोंद केली होती. 

टीम इंडियाची विश्वचषकातली मक्तेदारी मोडून काढणारा पाकिस्तानचा तो विजय भारतीय क्रिकेटरसिकांच्या जिव्हारी लागलाय. त्या जखमेवर ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात फुंकर घालण्याची जबाबदारी आता रोहित ब्रिगेडची आहे.

टीम इंडियाच्या सुदैवानं ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटचा इतिहास रोहित ब्रिगेडच्या बाजूनं आहे. उभय संघांमध्ये आजवर झालेल्या नऊ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये भारतानं सहा, तर पाकिस्ताननं केवळ दोनच सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. भारत आणि पाकिस्तान संघांमधला पहिला ट्वेन्टी ट्वेन्टी सामना टाय झाला होता.

भारत आणि पाकिस्तान संघांमधली ही कागदावरची आकडेवारी प्रत्यक्ष रणांगणावर अर्थहीन ठरणार असली तरी शाहिन आफ्रिदीची अनुपस्थिती पाकिस्तानच्या दृष्टीनं आशिया चषकात चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान संघांची ताकद लक्षात घेता उभय संघ साखळी सामन्यापाठोपाठ सुपर लीग आणि कदाचित फायनलमध्येही आमनेसामने येण्याची शक्यता आहे. 

शाहिन आफ्रिदीच्या अनुपस्थितीत पाकिस्तानचं तेजतर्रार आक्रमण तीन-तीन लढायांमध्ये भारतीय फलंदाजांना रोखण्याचा नेटानं प्रयत्न करेल. भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानच्या त्या आक्रमणाचा समर्थपणे मुकाबला केला तर ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातल्या त्या पराभवाचा व्याजासकट वचपा काढण्याचा मौका रोहित शर्माच्या टीम इंडियाला ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात मिळणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या

व्हिडीओ

Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report
Indian Oil Tank Return : इराणला तुरी, गाठली मुंबापुरी, कच्चं तेल घेऊन जहाज मुंबईत Special Report
Nitesh Rane Speech : कोकणात 90 % आंब्याचं नुकसान, शेतकऱ्यांना चांगल Package देणार - नितेश राणे
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
Embed widget