मुख्यपृष्ठPhotosसिनेमात हिरो-हिरोईनने घातलेल्या कपड्यांचं काय होतं?
सिनेमात हिरो-हिरोईनने घातलेल्या कपड्यांचं काय होतं?
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 30 Jul 2016 04:06 PM (IST)
1/7
सिनेकलाकारांच्या फॅन्सची कमी नाही. आपल्या आवडत्या कलाकारांनी वापलेल्या वस्तूंसाठी ते लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करण्यासाठी तयार असतात. सलमानच्या एका चाहत्याने तर 'मुझसे शादी करोगी'मधील एका गाण्यात सलमानने वापरलेला टॉवेल दीड लाखांना खरेदी केला होता.
2/7
मात्र अनेक वेळा असंही होतं की, प्रसिद्ध डिझायनर सिनेमा झाल्यानंतर स्वत:चे कपडे परत घेऊन जातात. मनिष मल्होत्रा आणि अंजू मोदी हे बऱ्याचदा डिझाईन केलेले त्यांचे कपडे परत घेतात.
3/7
अनेक वेळा कपड्यांचा लिलाव होता. यामधून मिळणारी रक्कम दान केली जाते. 'देवदास' सिनेमात माधुरी दीक्षितने परिधान केलेला हिरव्या रंगाच्या लहंग्याची तब्बल 3 कोटी रुपयांना विक्री झाली होती.
4/7
यापैकी अनेक महागडे कपडे एका पेटीत टाकून त्यावर सिनेमाचं नाव लिहून प्रॉडक्शन हाऊसमध्ये ठेवतात.
5/7
लिलावाशिवाय अनेक वेळा कलाकारांना ते कपडे एवढे आवडतात की, ते स्वत:सोबत घेऊन जातात. फिल्ममेकरही आनंदाने ते कपडे देतात. त्यापैकी बरेच कपडे कलाकार घालू शकत नाही, मात्र आठवण म्हणून स्वत:कडे ठेवतात.
6/7
तर कधी असंही होतं की, हे कपडे मिक्स अँड मॅच करुन नव्या कॉम्बिनेशनसह ज्युनिअर आर्टिस्ट्सना घालण्यासाठी दिले जातात.
7/7
सिनेमात अभिनेता-अभिनेत्रींचे कॉस्ट्यूमही विशेष भूमिका निभावतात. व्यक्तिरेखेनुसार फॅशन डिझायनर कपडे बनवतात. सध्या सिनेमात कॉस्ट्यूमचंही चांगलं बजेट असतं. पण कलाकारांनी एकदा हे कपडे वापरल्यानंतर त्याचं काय होतं, हे आम्ही सांगणार आहोत.