एक्स्प्लोर
Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीची मानाची गदा कोणाकडे; कोल्हापूर की मुंबई कोण मारणार बाजी?

Maharashtra Kesari
1/10

महाराष्ट्राच्या मातीतील प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesri) स्पर्धा तब्बल दोन वर्षानंतर पार पडत आहे. कोरोना
2/10

कोरोनाच्या महामारीमुळे ही स्पर्धा मागील दोन वर्षे झाली नव्हती, पण आता साताऱ्यात ही स्पर्धा पार पडत असून आज अंतिम सामना होणार आहे.
3/10

अंतिम सामन्यात विजेत्या पैलवानाला मिळणारी मानाची गदा मैदानात दाखल झाली आहे.
4/10

या कुस्तीत खुल्या म्हणजे ८६ ते १२५ किलो वजनी गटाच्या माती आणि गादी विभागाच्या अंतिम फेरीत विजयी झालेले दोन पैलवान आमनेसामने आहेत.
5/10

विशेष म्हणजे दोघेही कोल्हापूरच्या तालमीत तयार झाले आहेत. पण यातील एक पृथ्वीराज पाटील कोल्हापूरचं तर दुसरा विशाल बनकर मुंबईचं प्रतिनिधित्व करत आहे.
6/10

आजच्या सामन्यात आमनेसामने असणारे पृथ्वीराज आणि विशाल यांच्यात पृथ्वीराजला मॅटवरच्या कुस्त्यांचा तसंच आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अधिक अनुभव आहे.
7/10

पण दुसरीकडे विशाल उर्फ प्रकाश कोल्हापूरच्या गंगावेस तालमीत तयार झाला आहे. त्याचे काका तानाजी बनकर यांनीही 1987 साली महाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता. त्यामुळे आजची लढत चुरशीची होणार यात शंका नाही.
8/10

पृथ्वीराज पाटील हा मूळचा पन्हाळा तालुक्यातल्या देवठाणेचा पैलवान आहे. कोल्हापुरात जालिंदरआबा मुंडे यांच्या शाहू कुस्ती केंद्रात तो लहानाचा मोठा झाला.
9/10

दरम्यान आज पृथ्वीराज जिंकल्यास 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा मान मिळणार आहे.
10/10

विजेत्या पैलवानाला मानाची गदा आणि बक्षीस मिळणार आहे.
Published at : 09 Apr 2022 06:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
