एक्स्प्लोर
Sadabhau Khot : राज्य सरकारने एकदाचं ठरवावं शेतकऱ्यांनी जगाव की मरावं? सदाभाऊ खोत यांचे आरटीओ कार्यालयात आंदोलन
राहुरीच्या शेतकऱ्याला सांगलीकडे येताना हळदीची पोती असलेली गाडी ओव्हरलोड आहे आणि गाडीचा इन्शुरन्स संपलाय म्हणून आरटीओ अधिकाऱ्यांनी 30 हजार इतका दंड केला होता. ही बाब समजताच सदाभाऊ खोत संतापले.

Sadabhau Khot
1/10

सौद्यासाठी हळद घेऊन राहुरीहून सांगलीकडे येणारी गाडी आरटीओ अधिकाऱ्यांनी अडवत 30 हजाराचा दंड केला होता.
2/10

ही घटना समजजात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी थेट आरटीओ कार्यालयात हल्लाबोल आंदोलन करत अधिरकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
3/10

एकीकडे अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत असताना दुसरीकडे शेतमाल बाजार समितीत विक्रीस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या गाड्या अशा पध्दतीने अडवून शेतकऱ्यांना लुटले जात असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.
4/10

शिवाजी यादव वने असे अडवणूक केलेल्या राहुरीच्या शेतकऱ्यांचे नाव आहे.
5/10

. इस्लामपूरजवळ पेठ नाका येथे वने यांची हळद असलेली गाडी अधिकाऱ्यांनी अडवत 30 हजारांचा दंड करत गाडी सांगलीजवळील सावळी येथील आरटीओ कार्यालयात आणून लावली होती.
6/10

या कार्यालयावरच हल्लाबोल करत सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांची अडवणूक करत अधिकारी शेतकऱ्यांनाच लुटत असल्याचा आरोप केला.
7/10

यानंतर सावळी येथील आरटीओ कार्यालयामध्ये सदाभाऊ खोत यांनी हल्लाबोल आंदोलन करत आरटीओ कार्यालयात हळदीची पोती ओतून सौदेबाजी आंदोलन केले.
8/10

हळदीची पोती असलेली गाडी ओव्हरलोड आहे आणि गाडीचा इन्शुरन्स संपलाय म्हणून आरटीओ अधिकाऱ्यांनी 30 हजार इतका दंड केला होता.
9/10

. ही बाब राहुरीचे शेतकरी शिवाजी यादव वने यांनी सदाभाऊ खोत यांच्या कानावर घातली.
10/10

राज्य सरकारने एकदाचं ठरवावं शेतकऱ्यांनी जगाव की मरावं? जनतेला लुटणाऱ्या सरकारच्या लाडवलेल्या जावयांना सरकार आवरणार की नाही? अधिकाऱ्यांचा माजुरपणा सरकारने थांबवावा असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी सरकारला दिला.
Published at : 12 Apr 2023 05:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion