पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे.
2/6
तर पर्यटन स्थळी असलेले धबधबे ही प्रवाहित होऊन व्हायला लागले आहेत.
3/6
जव्हारमधील दाभोसा आणि काळमांडवी या धबधब्यामध्ये बुडून गेल्या काही दिवसात पर्यटकांचे मृत्यू झाले होते.
4/6
त्यामुळे या धबधब्यांवर जाण्यासाठी कलम 144 नुसार निर्बंध लादण्यात आले आहेत.
5/6
या पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी नाही मात्र पर्यटक सुरक्षित स्थळी राहून धबधब्यांचा आनंद घेऊ शकतात
6/6
पर्यटकांना धबधब्याच्या खाली उतरण्यावर आणि धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरल्यावर बंदी असल्याचं जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांनी सांगितलं.