एक्स्प्लोर
थेंब-थेंब पाणी टाकून पिकं जगवण्यासाठी बळीराजाची धरपड, पाहा फोटो
Marathwada Rain Update : आधीच मान्सून उशिरा आला, त्यात जून महिना कोरडा गेला. आता पुन्हा ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेला आहे. त्यामुळे खरिपाचे पीक (Crop) संकटात सापडले आहे.
Marathwada Rain Update
1/9

मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात आता पीक माना टाकत असल्याने त्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पाहायला मिळते.
2/9

पिकांना जगवण्यासाठी बळीराजा थेंब थेंब पाणी घालतांना पाहायला मिळतोय. असंच काही चित्र औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पाडळी गावात पाहायला मिळत आहे.
3/9

अख्ख शेतकरी कुटुंब हातात बकीटी, तांब घेऊन एक एक झाडाला पाणी टाकून जगवण्याचं प्रयत्न करतोय.
4/9

पण, अशी धडपड किती दिवस करणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे आगामी काळात पाऊस न झाल्यास खरीप हंगाम हातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
5/9

ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेला असल्याने अनेक ठिकाणी 20 दिवसांपेक्षा अधिकचा पावसाचा खंड पडला आहे.
6/9

पिकं आता माना टाकतांना पाहायला मिळत आहे. अशीच काही परिस्थिती औरंगाबाद जिल्ह्यासह विभागात पाहायला मिळत आहे.
7/9

त्यामुळे पिकांना जगवण्यासाठी शेतकरी हाताने झाडांना थेंब-थेंब पाणी टाकत आहे. एकदा पाणी टाकल्यावर झाडाची किमान तीन चार दिवसांसाठी चिंता मिटते.
8/9

पण आता पिण्यासाठी देखील अनेक ठिकाणी पाणी मिळत नसल्याने झाडांना टाकण्यासाठी तरी पाणी कोठून आणणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
9/9

पाऊस होत नसल्याने डोळ्यासमोर पिकं उध्वस्त होत असल्याने त्याला जगवण्यासाठी बळीराजा धरपड करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Published at : 25 Aug 2023 12:49 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























