Written By : abp majha web team | Updated at : 05 May 2022 01:52 PM (IST)
photo:kartikaaryan/ig
1/7
Dostana: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) लवकरच 'भूल भुलैया 2' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. (photo:kartikaaryan/ig)
2/7
दरम्यान, एका मुलाखतीदरम्यान कार्तिकने धर्मा प्रॉडक्शनचा मालक करण जोहरसोबतच्या (Karan Johar) मतभेदावर मौन सोडले. गेल्या वर्षी कार्तिकच्या 'अनप्रोफेशनल' वागणुकीच्या अफवा अनेक रिपोर्ट्समधून समोर आल्या होत्या आणि त्यामुळे तो यापुढे 'दोस्ताना 2'चा (Dostana 2)भाग असणार नाही, असे म्हटले गेले होते. धर्मा प्रॉडक्शनच्या 'दोस्ताना 2' ची घोषणा 2019 मध्ये झाली होती. या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर आणि लक्ष्य यांना घेण्यात आले होते. (photo:kartikaaryan/ig)
3/7
कोरोना महामारीमुळे इतर प्रकल्पांप्रमाणेच या चित्रपटाचे शूटिंगही थांबवावे लागले होते. चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू होणार असतानाच, कार्तिक आर्यन आणि चित्रपट निर्मात्यामधील मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्या. (photo:kartikaaryan/ig)
4/7
एका मुलाखतीदरम्यान कार्तिकला जेव्हा विचारण्यात आले की, इंडस्ट्रीतील लोकांशी असलेल्या मतभेदांमुळे, तसेच तो फिल्मी पार्श्वभूमीचा नसल्यामुळे त्याला यातून बाहेर काढले असेल का? (photo:kartikaaryan/ig)
5/7
यावर उत्तर देताना अभिनेता म्हणाला, 'मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो. माझे आगामी चित्रपट पाहाल त्यातून कळेलच, आतातरी मला यावर एवढेच सांगायचे आहे.’ पुढे तो म्हणाला, 'काय होते कधी कधी लोक 'बात का बातंगड' करतात. अर्थात काहीच घडलं नसलं, तरी उगाच अफवा पसरवतात. यापेक्षा जास्त काही नाही. कोणालाच त्यासाठी वेळ मिळत नाही. प्रत्येकाला फक्त काम करायचे असते, चांगले काम करायचे असते. याशिवाय बाकी सर्व फक्त अफवा आहेत.' (photo:kartikaaryan/ig)
6/7
गेल्या वर्षी कार्तिकच्या 'अनप्रोफेशनल' वागण्याबद्दल अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी धर्मा प्रॉडक्शनला निवेदन जारी करून स्पष्टीकरण द्यावे लागले होते. धर्मा प्रॉडक्शनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, 'व्यावसायिक परिस्थितीमुळे आम्ही या विषयावर पुढे न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही कॉलिन डी'कुन्हा दिग्दर्शित 'दोस्ताना 2' च्या कलाकारांची पुन्हा कास्टिंग करणार आहोत. कृपया अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करा.’ (photo:kartikaaryan/ig)
7/7
कार्तिक याआधीही अनेकदा स्वतःबद्दल उघडपणे बोलला आहे. तो एकदा म्हणाला की, त्याच्या व्यावसायिक जीवनाभोवती चालू असलेल्या वादाचा परिणाम त्याच्या कुटुंबावरही होतो. कुटुंबापेक्षा अधिक काही महत्त्वाचे नाही, परंतु कुटुंबावर परिणाम होत असल्याने कधीकधी मला काळजी वाटते. (photo:kartikaaryan/ig)