एक्स्प्लोर
Maharashtra Vidhan Sabha: देवेंद्र फडणवीस पुढे, एकनाथ शिंदे-अजित पवार मागे; जयंत पाटीलही सोबत गेले; सभागृहात नेमकं काय घडलं?
Maharashtra Vidhan Sabha: राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानाने एकमताने विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली.

Maharashtra_Vidhan_Sabha
1/9

विधानसभेच्या अध्यक्षपदी (Maharashtra Vidhan Sabha Speaker) पुन्हा एकदा राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची निवड झाली आहे. (photo credit-Maharashtra vidhan sabha)
2/9

महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज एकमताने विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. (photo credit-Maharashtra vidhan sabha)
3/9

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणुन राहूल नार्वेकर यांची निवड करावी, यासाठी प्रस्ताव मांडला. यानंतर अनिल पाटील यांनी अनुमोदन दिलं. (photo credit-Maharashtra vidhan sabha)
4/9

राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानाने एकमताने विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. (photo credit-Maharashtra vidhan sabha)
5/9

राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर परंपरेनूसार राहुल नार्वेकर यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घेऊन गेले. (photo credit-Maharashtra vidhan sabha)
6/9

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते नाना पटोले हे राहुल नार्वेकरांना अध्यक्षपदाच्या दालनापर्यंत घेऊन गेले. यानंतर हात मिळवणी करत राहुल नार्वेकरांचे अभिनंदन देखील केले. (photo credit-Maharashtra vidhan sabha)
7/9

राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले आहे. (photo credit-Maharashtra vidhan sabha)
8/9

राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. (photo credit-Maharashtra vidhan sabha)
9/9

काही अपवाद वगळता अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्याची परंपरा आहे, त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला विरोधी पक्षाच्या सदस्यांचे आणि गटनेत्यांचे आभार मानतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. (photo credit-Maharashtra vidhan sabha)
Published at : 09 Dec 2024 01:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
जळगाव
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion