एक्स्प्लोर
ढगाळ वातावरणाचा गुलाबावर परिणाम, शेतकरी चिंतेत
Rose farming
1/10

हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा गुलाब पिकावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
2/10

ढगाळ वातावरणामुळं गुलाबांच्या फुलावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
3/10

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसत आहे. कधी थंडी तर कधी अवकाळी पाऊस कोसळताना दिसत आहे.
4/10

बदलत्या वातावरणामुळं बळीराजा (Farmers) चांगलाच धास्तावला आहे. सध्या असलेल्या ढगाळ वातावरणामुळं गुलाब फुलाचं घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण गुलाबावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे.
5/10

रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं पुढील बहरात गुलाबाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटणार आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
6/10

मागील आठ दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणानं या गुलाब फुल शेतीला मोठा फटका बसत आहे.
7/10

दमट वातावरणामुळे अचानक गुलाबाच्या फुलांचे उत्पादन वाढले आहे तर दुसीरकडं बाजारात फुलांची आवक वाढल्यानं फुलांचे भाव घसरले आहेत.
8/10

ढगाळ वातावरणामुळं तयार असलेल्या गुलाबाच्या कळ्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. गुलाबावर करपा रोगाचा, किड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळं गुलाबाच्या पुढील बहरात उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटणार आहेत.
9/10

राज्यात सातत्यानं बदल होत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) काही ठिकाणी तर अवकाळी पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे.
10/10

पुढच्या तीन दिवसांनतर म्हणजे सोमवारपासून (19 डिसेंबरपासून) महाराष्ट्रासह गुजरातमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
Published at : 16 Dec 2022 12:09 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























