Photo : कोकणसह नंदूरबार जिल्ह्यात भात कापणीला सुरुवात
Written By : abp majha web team | Updated at : 04 Nov 2022 01:07 PM (IST)
Rice harvest
1/8
भात पिकाचे नुकसान झाल्यामुळं, सरकारनं भात उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
2/8
परतीच्या पावसाचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं या पावसामुळं वाया गेली आहेत. भात पिकालाही या पावसाचा फटका बसलाय.
3/8
काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीनं भाताची मळणी केली जात आहे. तर काही ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं भाताची मळणी केली जात आहे.
4/8
यावर्षी परतीच्या पावसाचा भात पिकाला फटका बसल्यामुलं उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
5/8
परतीच्या पावसानं कोकणात देखील भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं उत्पादनात घट येणार आहे.
6/8
कोकणात मोठ्या प्रमाणावर भाताची लागवड केली जाते. त्या ठिकाणी भात लागवडीसाठी पोषक वातावरण आहे.
7/8
कोकणात सध्या भात काढणीच्या कामांना वेग आला आहे. तसेच नंदूरबार जिल्ह्यात देखील भात कापणीला सुरुवात झाली आहे.
8/8
यावर्षी परतीचा पाऊस (Rain) आणि अतिवृष्टीमुळे नंदूराबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं उत्पादनात घट येणार आहे.