एक्स्प्लोर

Pakistan on Manmohan Singh : पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?

पाकिस्तानच्या फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचे माजी अध्यक्ष शब्बर झैदी यांनी अलीकडेच डॉ. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांचे कौतुक केले होते.

Manmohan Singh : भारताचे माजी पंतप्रधान, जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ अन् भारताच्या अर्थक्रांतीचे शिल्पकार डॉ.मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीत निधन झाले. मनमोहन सिंग यांनी एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. फाळणीपूर्वी सध्या पाकिस्तानात असलेल्या गाहमध्ये जन्मलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनाने पाकिस्तानींना सुद्धा दु:ख झाले आहे. पाकिस्तानला झेलमच्या सुपुत्राची नेहमी आठवण राहील, असे ते म्हणतात.

इथल्या लोकांसाठी ते नेहमीच प्रेरणास्त्रोत राहतील

पाकिस्तानचे माजी मंत्री आणि पीटीआय नेते फवाद चौधरी म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन ही खरोखरच अत्यंत दुःखद बातमी आहे. ते म्हणाले की, भारत आज जे आर्थिक स्थैर्य अनुभवत आहे ते डॉ. मनमोहन सिंग यांच्या दूरदर्शी धोरणांचे परिणाम आहे. ते म्हणाले की डॉ. सिंग यांचा जन्म पाकिस्तानच्या झेलम भागातील गाह गावात झाला होता जो आता पाकिस्तानी पंजाबमधील चकवाल भागात येतो. डॉ. सिंग हे झेलमचे सुपुत्र होते आणि इथल्या लोकांसाठी ते नेहमीच प्रेरणास्त्रोत राहतील. पाकिस्तानी विश्लेषक कमर चीमा म्हणाले की, डॉ.मनमोहन सिंग यांचे भारतासाठी सर्वात मोठे योगदान म्हणजे अमेरिकेसोबतचा अणुकरार. यामुळे भारताचे आण्विक वेगळेपण संपुष्टात आले आणि त्याला अणुतंत्रज्ञानात प्रवेश मिळाला. अणुचाचण्यांनंतर लादलेले निर्बंधही संपले. तेव्हापासून भारत-अमेरिकेतील संबंध कायम नवीन उंचीवर गेले आहेत. भारत NPT चा सदस्य नाही आणि तरीही अमेरिकेने नवी दिल्लीशी नागरी अणु करारावर स्वाक्षरी केली. याचे संपूर्ण श्रेय मनमोहन सिंग यांना जाते.

मनमोहन यांनी भारताला दिली आघाडी, पाकिस्तान अजूनही मागे  

कमर चीमा म्हणाले की, पाकिस्तानने याला विरोध केला पण आजपर्यंत त्यावर कोणतीही सुनावणी झाली नाही. आजही पाकिस्तानकडे या अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा वापर नाही. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अमेरिकेचे भारतासोबतचे परराष्ट्र संबंध अतिशय घट्ट झाले. आज भारत जबाबदार अणुशक्ती आहे असे म्हटले जाते. यामुळे भारत पाश्चिमात्य देश आणि जपानसोबत संरक्षण तंत्रज्ञान सहज शेअर करत आहे. कमर चीमा म्हणाले की, मनमोहन यांची पाकिस्तानबाबत कठोर भूमिका होती आणि पंतप्रधान असताना ते कधीही आले नाहीत. पाकिस्तानी विश्लेषकाने सांगितले की, जेव्हा भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले तेव्हा त्यांनी पुन्हा चर्चा सुरू केली होती. पाकिस्तानी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी डॉ. सिंग यांच्याशी संबंधित घटना शेअर केली आहे. यात कुरेशी म्हणत आहेत की, 90 च्या दशकात मी डॉ. सिंग यांच्या घरी भारतात गेलो होतो, तेव्हा त्यांच्या पत्नीने चहा बनवला होता आणि मनमोहन सिंग यांनी स्वत: चहा आणला होता. पाकिस्तानी तज्ज्ञही डॉ. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांचे प्रशंसक होते.

'पाकिस्तानकडे मनमोहन सिंग नाहीत'

पाकिस्तानच्या फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचे माजी अध्यक्ष शब्बर झैदी यांनी अलीकडेच डॉ. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांचे कौतुक केले होते. ते म्हणाले होते की, पाकिस्तानचा विध्वंस कोणत्याही सैनिकाने किंवा राजकारण्याने केला नाही तर त्या आर्थिक तज्ज्ञांनी केला आहे, ज्यांनी आपल्या नोकऱ्या वाचवण्यासाठी, फायद्यासाठी हुकूमशहांच्या अल्पकालीन धोरणांचा अवलंब केला. ते गंभीर नव्हते. मनमोहन सिंग आमच्याकडे नव्हते. डॉ.मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी झाला.

झेलमचे सुपूत्र भागातील लोकांसाठी प्रेरणास्थान

इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे नेते फवाद चौधरी यांनी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहिली. फवाद चौधरी यांनी ट्विटरवर लिहिले की, 'डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. आज भारत जे आर्थिक स्थैर्य अनुभवत आहे ते मुख्यत्वे त्यांच्या दूरदर्शी धोरणांमुळे आहे, 'त्यांचा जन्म झेलमच्या गाह गावात झाला, जो आता पंजाब (पाकिस्तान) मध्ये येतो. झेलमचे पुत्र डॉ. सिंग हे या भागातील लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bachchu Kadu : '३० जून २०२६ च्या आत कर्जमुक्ती होणारच', बच्चू Kadu यांची ग्वाही; आंदोलन तूर्तास स्थगित
Ind Beat Aus Womens World Cup : भारतीय महिला संघाची ऑस्ट्रेलिया हरवत विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक
Abu Azmi : वंदे मातरम् वरून पुन्हा वाद, अबू आझमींच्या विधानाने राजकारण तापलं Special Report
Powai Hostage Crisis: पवईत थरार, स्टुडिओत १७ मुलांना ओलीस; आरोपीचा एन्काऊंटर Special Report
MVA Morcha Meeting : मोर्चासाठी एकी, बैठकीत बेकी? विरोधकांचं प्लॅनिंग Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
Embed widget