एक्स्प्लोर

Russia-Ukraine War : पृथ्वीवर हाहाःकार, क्षणार्धातच कोट्यवधी मृत्यू; अणू युद्ध झाल्यास काय होईल? तज्ज्ञांची धडकी भरवणारी माहिती

Russia Ukraine War Nuclear Weapon : रशिया युक्रेनच्या युद्धात आता अणूयुद्ध सुरू होण्याचा धोका असल्याची चर्चा सुरू आहे.

Russia Ukraine War Nuclear Weapon : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला सहा दिवस पूर्ण झाले आहेत. रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून जोरदार प्रतिकार करण्यात येत आहे. रशियाच्या विरोधात अमेरिका आणि इतर देशांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. या युद्धादरम्यान अणू युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. अणू युद्ध झाल्यास काय होईल, याचा तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. 

दुसऱ्या महायुद्धात पहिल्यांदा अणूबॉम्बचा वापर करण्यात आला. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर हे अणूबॉम्ब टाकले होते. या हल्ल्यात काही क्षणातच लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. ही दोन्ही शहरं बेचिराख झाली. त्यानंतर अणूबॉम्बचा वापर कोणत्याही देशाने केला नाही. 

>> अणू युद्ध झाल्यास काय होईल?

स्विर्त्झलँडमधील International Campaign to Abolish Nuclear Weapons (ICAN) या संस्थेने अणू युद्ध झाल्यास त्याचे काय परिणाम होतील याबाबत अंदाज वर्तवला आहे. या संस्थेला 2017 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कारदेखील मिळाला होता. ICAN नुसार, एका अणूबॉम्बच्या स्फोटाने  लाखो लोकांचा मृत्यू होईल.  तर, 10 किंवा शेकडो अणूबॉम्बचा वापर केल्यास कोट्यवधी नागरिकांचा मृत्यू होईलच शिवाय पृथ्वीच्या वातावरणावर मोठा परिणाम होईल. 

>> ICAN ने काय म्हटले ?

- ICAN च्या मते, एक अणुबॉम्ब संपूर्ण शहर नष्ट करेल. सध्याच्या काळात अनेक अण्वस्त्रे वापरली गेली तर त्यात कोट्यवधी लोकांचा मृत्यू होईल. अमेरिका आणि रशियामध्ये मोठे अणूयुद्ध सुरू झाल्यास मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 10 कोटींहून अधिक असू शकेल. 

- अधिक लोकसंख्येची अधिक घनता असलेल्या मुंबईसारख्या शहरात, ज्या ठिकाणी प्रत्येक एक किलोमीटरच्या परिघात 1 लाखांहून अधिक लोक राहतात, तिथे हिरोशिमासारखा अणुबॉम्ब टाकल्यास एका आठवड्यात 8.70 लाखांहून अधिक मृत्यू होतील. अमेरिका आणि रशिया यांच्यातील अणुयुद्धात 500 अणुबॉम्ब वापरल्यास अर्ध्या तासात 10 कोटी नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो.

- सध्या जगात असलेल्या अण्वस्त्रांपैकी एक टक्क्यांहून कमी अण्वस्त्रांचा वापर केला तर जवळपास दोन अब्ज नागरिकांना उपासमारीचा सामना करावा लागणार. त्याशिवाय आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर ताण येईल. त्याच्या परिणाम आरोग्य व्यवस्था उद्धवस्त होईल. त्यामुळे जखमींवर उपचार करण्यास अडचणी निर्माण होतील. 

>> पृथ्वीच्या वातावरणावर परिणाम

- हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या बॉम्बच्या आकाराएवढे 100 बॉम्बचा वापर झाला तरी पृथ्वीच्या वातावरणावर मोठा परिणाम होईल. पृथ्वीवरील हवामानात मोठा बदल होईल. त्याचा परिणाम शेतीवरही होऊ शकतो. 

- सध्या संपूर्ण जग ग्लोबल वार्मिंगच्या संकटाशी झुंजत आहे. अणूयुद्ध झाल्यास पृथ्वीचे तापमान अधिक वाढेल.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP On Mahapalika Election |  मनपात भाजपची स्वबळाची वाट, शिंदेंचा युतीसाठी आग्रह? Special ReportNew India Bank Scam | न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक कुणामुळे डुबली? Special ReportShanishingnapur Shanidev | एक मार्चपासून शनिदेवाला केवळ ब्रँडेड तेलानंच अभिषेक Special ReportSpecial Report Suresh Dhas:Dhananjay Munde यांच्या भेटीमुळे विश्वासार्हतेला तडा, विरोधकांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
जितेंद्र आव्हाडांनी दिला 'छावा' चित्रपटाचा रिव्ह्यूव; सिनेमातील 'या' सीनचा अभ्यास मराठी माणसांनी करावा
जितेंद्र आव्हाडांनी दिला 'छावा' चित्रपटाचा रिव्ह्यूव; सिनेमातील 'या' सीनचा अभ्यास मराठी माणसांनी करावा
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती
महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.