एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack : भारताने हल्ला केला किंवा सिंधू नदीचं पाणी अडवलं, तर अण्वस्त्रांनी उत्तर देऊ; पाकिस्तानकडून पोकळ धमक्या देणं सुरूच 

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. आता पाकिस्तानकडून भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी देण्यात आली आहे.

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आता  रशियामधील पाकिस्तानी राजदूत मोहम्मद खालिद जमाली याने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला किंवा सिंधू नदीचे पाणी अडवले, तर पाकिस्तान केवळ पारंपरिक पद्धतीने नव्हे तर अण्वस्त्रांनी देईल प्रत्युत्तर देईल, असे म्हणत भारताला पोकळ धमकी दिली आहे. 

पाकिस्तानच्या राजदूताचे हे विधान जागतिक पातळीवर चिंता निर्माण करणारे ठरले आहे. कारण दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न आहेत. पाक राजदूतांनी हे देखील सांगितले आहे की, भारताचे सैन्य दस्तावेज लीक झाले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानवर हल्ल्याची योजना आहे. यामुळे हे स्पष्ट होते की, पाकिस्तानला हल्ल्याची शक्यता आहे आणि तो कोणत्याही क्षणी प्रतिक्रिया देण्यासाठी तयार आहे.

सिंधू पाणी करार तणावाचे केंद्र 

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द केला आहे. यामुळे पाकिस्तानी राज्यकर्ते खूपच अस्वस्थ आहेत. 1960 मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये स्वाक्षरी झालेला सिंधू पाणी करार आता तणावाचे केंद्र बनला आहे. जर भारताने सखल भागात पाणी थांबवले किंवा त्याचा प्रवाह वळवला तर ते युद्ध मानले जाईल, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. पाकिस्तानकडून वारंवार दहशतवादाला पाठिंबा मिळत असल्याने, भारताने या कराराचा आढावा घेण्याचे संकेत दिले आहेत. पाणी आता केवळ एक संसाधन राहिलेले नाही तर ते एक धोरणात्मक शस्त्र बनले आहे.

ताण कमी करणे का महत्त्वाचे?

पाकिस्तानी राजदूत मोहम्मद खालिद जमाली याने मुलाखतीत हे देखील मान्य केले आहे की, दोन्ही देश अणुशक्ती आहेत  आणि अशा परिस्थितीत वाढत्या तणावामुळे संपूर्ण दक्षिण आशिया धोक्यात येऊ शकतो, असे म्हटले. तर त्यांनी काश्मीर हल्ल्याची निष्पक्ष आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली आहे. यात रशिया आणि चीनची भूमिका असू शकते, असे म्हटले. मात्र, भारताने पाकिस्तानची ही मागणी फेटाळून लावली आहे.

पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली

दरम्यान, 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने केवळ भारतालाच धक्का बसला नाही तर प्रादेशिक स्थिरतेलाही मोठा धक्का बसला. या हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला, ज्यामुळे देशभरात संताप आणि दुःखाची लाट पसरली. हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा भारत आधीच सीमावर्ती भागात तणावाचा सामना करत होता. भारत सरकारने तातडीने कारवाई केली आणि पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाई करण्यासाठी भारतीय सैन्याच्या तीनही दलांना मोकळीक दिली आहे. यासोबतच त्यांनी दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना इशारा दिला की, भारत आता बचावात्मक धोरण नव्हे तर आक्रमक धोरण स्वीकारेल.

आणखी वाचा 

India-Pakistan Tension : पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का! भारताशिवाय आता 'या' देशांनीही 'आतंकिस्तान'च्या आकाशातून घेतली माघार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अमेरिका- इराण शांतता करारावर सस्पेन्स कायम, डोनाल्ड ट्रम्प यांचा होर्मुझवरील दावा इराणनं खोटा ठरवला, युद्ध थांबणार की भडकणार?
अमेरिका- इराण शांतता करारावर अजूनही सस्पेन्स, होर्मुझवरील ट्रम्प यांचा दावा इराणनं खोटा ठरवला, पुढं काय घडणार? 
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election 2026: 11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
Mumbai Rains: मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
Embed widget