एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack : भारताने हल्ला केला किंवा सिंधू नदीचं पाणी अडवलं, तर अण्वस्त्रांनी उत्तर देऊ; पाकिस्तानकडून पोकळ धमक्या देणं सुरूच 

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. आता पाकिस्तानकडून भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी देण्यात आली आहे.

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आता  रशियामधील पाकिस्तानी राजदूत मोहम्मद खालिद जमाली याने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला किंवा सिंधू नदीचे पाणी अडवले, तर पाकिस्तान केवळ पारंपरिक पद्धतीने नव्हे तर अण्वस्त्रांनी देईल प्रत्युत्तर देईल, असे म्हणत भारताला पोकळ धमकी दिली आहे. 

पाकिस्तानच्या राजदूताचे हे विधान जागतिक पातळीवर चिंता निर्माण करणारे ठरले आहे. कारण दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न आहेत. पाक राजदूतांनी हे देखील सांगितले आहे की, भारताचे सैन्य दस्तावेज लीक झाले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानवर हल्ल्याची योजना आहे. यामुळे हे स्पष्ट होते की, पाकिस्तानला हल्ल्याची शक्यता आहे आणि तो कोणत्याही क्षणी प्रतिक्रिया देण्यासाठी तयार आहे.

सिंधू पाणी करार तणावाचे केंद्र 

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द केला आहे. यामुळे पाकिस्तानी राज्यकर्ते खूपच अस्वस्थ आहेत. 1960 मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये स्वाक्षरी झालेला सिंधू पाणी करार आता तणावाचे केंद्र बनला आहे. जर भारताने सखल भागात पाणी थांबवले किंवा त्याचा प्रवाह वळवला तर ते युद्ध मानले जाईल, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. पाकिस्तानकडून वारंवार दहशतवादाला पाठिंबा मिळत असल्याने, भारताने या कराराचा आढावा घेण्याचे संकेत दिले आहेत. पाणी आता केवळ एक संसाधन राहिलेले नाही तर ते एक धोरणात्मक शस्त्र बनले आहे.

ताण कमी करणे का महत्त्वाचे?

पाकिस्तानी राजदूत मोहम्मद खालिद जमाली याने मुलाखतीत हे देखील मान्य केले आहे की, दोन्ही देश अणुशक्ती आहेत  आणि अशा परिस्थितीत वाढत्या तणावामुळे संपूर्ण दक्षिण आशिया धोक्यात येऊ शकतो, असे म्हटले. तर त्यांनी काश्मीर हल्ल्याची निष्पक्ष आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली आहे. यात रशिया आणि चीनची भूमिका असू शकते, असे म्हटले. मात्र, भारताने पाकिस्तानची ही मागणी फेटाळून लावली आहे.

पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली

दरम्यान, 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने केवळ भारतालाच धक्का बसला नाही तर प्रादेशिक स्थिरतेलाही मोठा धक्का बसला. या हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला, ज्यामुळे देशभरात संताप आणि दुःखाची लाट पसरली. हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा भारत आधीच सीमावर्ती भागात तणावाचा सामना करत होता. भारत सरकारने तातडीने कारवाई केली आणि पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाई करण्यासाठी भारतीय सैन्याच्या तीनही दलांना मोकळीक दिली आहे. यासोबतच त्यांनी दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना इशारा दिला की, भारत आता बचावात्मक धोरण नव्हे तर आक्रमक धोरण स्वीकारेल.

आणखी वाचा 

India-Pakistan Tension : पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का! भारताशिवाय आता 'या' देशांनीही 'आतंकिस्तान'च्या आकाशातून घेतली माघार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
Live Blog Updates: राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता
Live Blog Updates: राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता
Video: गाझा साफ केल्यानंतर आता इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी आरोपींना फक्त दिवसांत 90 दिवसात फासावर लटकवणार; अपील सुद्धा नाही, खासदार मंत्र्यांचा भर संसदेत शॅम्पेन उडवत नंगानाच
Video: गाझा साफ केल्यानंतर आता इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी आरोपींना फक्त दिवसांत 90 दिवसात फासावर लटकवणार; अपील सुद्धा नाही, खासदार मंत्र्यांचा भर संसदेत शॅम्पेन उडवत नंगानाच
Russian military transport plane crashes: रशियन लष्करी वाहतूक विमान संपर्क तुटल्यानंतर खडकावर कोसळलं; 29 जणांचा जागीच अंत
रशियन लष्करी वाहतूक विमान संपर्क तुटल्यानंतर खडकावर कोसळलं; 29 जणांचा जागीच अंत

व्हिडीओ

Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक
Ajit Pawar NCP Alliance : विलनीकरणाला माझा कधीच विरोध नव्हता, तटकरेंचं मोठं वक्तव्य
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Accident News: भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
Jalna Road Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 7 जणांचा मृत्यू
जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 7 जणांचा मृत्यू
Sharad Ponkshe and Babasaheb Ambedkar: 'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
Narhari Zirwal : माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
Embed widget