एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack : भारताने हल्ला केला किंवा सिंधू नदीचं पाणी अडवलं, तर अण्वस्त्रांनी उत्तर देऊ; पाकिस्तानकडून पोकळ धमक्या देणं सुरूच 

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. आता पाकिस्तानकडून भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी देण्यात आली आहे.

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आता  रशियामधील पाकिस्तानी राजदूत मोहम्मद खालिद जमाली याने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला किंवा सिंधू नदीचे पाणी अडवले, तर पाकिस्तान केवळ पारंपरिक पद्धतीने नव्हे तर अण्वस्त्रांनी देईल प्रत्युत्तर देईल, असे म्हणत भारताला पोकळ धमकी दिली आहे. 

पाकिस्तानच्या राजदूताचे हे विधान जागतिक पातळीवर चिंता निर्माण करणारे ठरले आहे. कारण दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न आहेत. पाक राजदूतांनी हे देखील सांगितले आहे की, भारताचे सैन्य दस्तावेज लीक झाले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानवर हल्ल्याची योजना आहे. यामुळे हे स्पष्ट होते की, पाकिस्तानला हल्ल्याची शक्यता आहे आणि तो कोणत्याही क्षणी प्रतिक्रिया देण्यासाठी तयार आहे.

सिंधू पाणी करार तणावाचे केंद्र 

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द केला आहे. यामुळे पाकिस्तानी राज्यकर्ते खूपच अस्वस्थ आहेत. 1960 मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये स्वाक्षरी झालेला सिंधू पाणी करार आता तणावाचे केंद्र बनला आहे. जर भारताने सखल भागात पाणी थांबवले किंवा त्याचा प्रवाह वळवला तर ते युद्ध मानले जाईल, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. पाकिस्तानकडून वारंवार दहशतवादाला पाठिंबा मिळत असल्याने, भारताने या कराराचा आढावा घेण्याचे संकेत दिले आहेत. पाणी आता केवळ एक संसाधन राहिलेले नाही तर ते एक धोरणात्मक शस्त्र बनले आहे.

ताण कमी करणे का महत्त्वाचे?

पाकिस्तानी राजदूत मोहम्मद खालिद जमाली याने मुलाखतीत हे देखील मान्य केले आहे की, दोन्ही देश अणुशक्ती आहेत  आणि अशा परिस्थितीत वाढत्या तणावामुळे संपूर्ण दक्षिण आशिया धोक्यात येऊ शकतो, असे म्हटले. तर त्यांनी काश्मीर हल्ल्याची निष्पक्ष आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली आहे. यात रशिया आणि चीनची भूमिका असू शकते, असे म्हटले. मात्र, भारताने पाकिस्तानची ही मागणी फेटाळून लावली आहे.

पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली

दरम्यान, 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने केवळ भारतालाच धक्का बसला नाही तर प्रादेशिक स्थिरतेलाही मोठा धक्का बसला. या हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला, ज्यामुळे देशभरात संताप आणि दुःखाची लाट पसरली. हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा भारत आधीच सीमावर्ती भागात तणावाचा सामना करत होता. भारत सरकारने तातडीने कारवाई केली आणि पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाई करण्यासाठी भारतीय सैन्याच्या तीनही दलांना मोकळीक दिली आहे. यासोबतच त्यांनी दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना इशारा दिला की, भारत आता बचावात्मक धोरण नव्हे तर आक्रमक धोरण स्वीकारेल.

आणखी वाचा 

India-Pakistan Tension : पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का! भारताशिवाय आता 'या' देशांनीही 'आतंकिस्तान'च्या आकाशातून घेतली माघार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Embed widget