एक्स्प्लोर

गेल्या 20 वर्षात नैसर्गिक आपत्तींच्या संख्येत मोठी वाढ, यापुढेही धोका कायम: UN

या आपत्तींमुळे जगातील अनेक लोकांना फटका, आर्थिक नुकसानही अपरिमितआपत्तीची पूर्वसूचना देणारी व्यवस्था आणि त्यासंबंधीच्या धोरणांत गुंतवणूक करण्याचे प्रत्येक देशाला आवाहन

जिनेवा: गेल्या 20 वर्षात जगभरात नैसर्गिक आपत्तींच्यास तीव्रतेत वाढ झाली असून त्यामुळे जगाला मोठ्या प्रमाणात मानवी आणि आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. यापुढच्या काळातही जगाला नैसर्गिक आपत्तींचा हा धोका कायम असल्याचं संयुक्त राष्ट्र संघटनेने सांगितले आहे. येत्या काही दशकात जगाला उष्णता आणि दुष्काळाला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागेल असेही संयुक्त राष्ट्र संघटनेने स्पष्ट केले. 2000 ते 2019 या वर्षांच्या काळात चीनला सर्वाधिक म्हणजे 577 नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. त्यानंतर भारतामध्ये 321 नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडल्या. फिलीपाईन्समध्ये 304 तर इंडोनेशियात 278 नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडल्या. या काळात जगभरात जवळपास 7348 नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडल्या. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या आकडेवारीनुसार यात 1.23 दशलक्ष लोकांना आपला जीव गमवावा लागला तर 4.2 अब्ज लोकांना याचा फटका बसला आणि त्यात जगाचे 2.97 ट्रिलियन डॉलर्स इतके आर्थिक नुकसान झाले. या काळात दुष्काळ, महापूर, भूकंप, त्सुनामी, वन प्रदेशांना लागलेल्या आगी आणि तीव्र उष्णता या गोष्टींमुळे जगाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचे आपत्ती निवारण कक्षाचे विशेष दूत मामी मिझुटोरी यांनी सांगितले की या काळात अनेक लोकांचा जीव वाचवण्याच यश आले पण वातावरण बदलाचा फटका खूप मोठ्या लोकसंख्येला बसला आहे. जगातील प्रत्येक राष्ट्राने नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देणारी व्यवस्था आणि आपत्ती निवारण धोरणांवर गुंतवणूक करावी असे त्यांनी सदस्य राष्टांना आवाहन केले आहे. सतत वाढत जाणारी उष्णतेची लाट ही गोष्ट आपल्यासमोरील खरे आव्हान असेल. खासकरून गरीब राष्ट्रांना या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागेल. येत्या पाच वर्षात जागतिक हवामान हे सातत्याने वाढण्याची शक्यता आहे. हे प्रमाण कदाचित प्रि- इंडस्ट्री स्तरापेक्षा 1.5 टक्क्याने वाढेल असा अंदाज जुलै महिन्यात जागतिक हवामान संघटनेने केला होता. वैज्ञानिकांनी येत्या काही दशकात मोठ्या आपत्ती टाळायच्या असतील तर जास्तीत जास्त 1.5 सेल्सिअस म्हणजे 2.7 फॅरेनहाईट इतकेच प्रमाण वाढ निश्चित केले आहे.

भारतालाही या काळात अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले आहे. त्यावर धोरण म्हणून देशाने 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा केला. या अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अॅथॉरिटीची स्थापना करण्यात आली. याचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. या कायद्याअंतर्गत नॅचरल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सची स्थापना केली आहे. याचा उद्देश हा आपत्ती काळात त्याला प्रतिसाद देणे हा आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Railway Fare: मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ; मुंबईतील लोकल प्रवाशांना दिलासा, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा
मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ; मुंबईतील लोकल प्रवाशांना दिलासा, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा
Girija Oak On Father Girish Oak, Mother Padmashree Phatak Divorce: 'घटस्फोटीत आई-वडीलांची मुलगी म्हणून जगत होते...'; आई-वडिलांच्या नात्याबाबत गिरीजाचा खुलासा, गिरीश ओक यांच्याबाबत म्हणाली...
'घटस्फोटीत आई-वडीलांची मुलगी म्हणून जगत होते...'; आई-वडिलांच्या नात्याबाबत पहिल्यांदाच गिरीजाचा खुलासा
BMC Election 2026: मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
Dhurandhar Box Office Collection Day 17: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; तिसरा विकेंडही गाजवला, विक्की कौशलच्या 'छावा'सोबत काँटे की टक्कर, कोण जिंकणार?
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; तिसरा विकेंडही गाजवला, विक्की कौशलच्या 'छावा'सोबत काँटे की टक्कर, कोण जिंकणार?

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Fare: मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ; मुंबईतील लोकल प्रवाशांना दिलासा, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा
मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ; मुंबईतील लोकल प्रवाशांना दिलासा, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा
Girija Oak On Father Girish Oak, Mother Padmashree Phatak Divorce: 'घटस्फोटीत आई-वडीलांची मुलगी म्हणून जगत होते...'; आई-वडिलांच्या नात्याबाबत गिरीजाचा खुलासा, गिरीश ओक यांच्याबाबत म्हणाली...
'घटस्फोटीत आई-वडीलांची मुलगी म्हणून जगत होते...'; आई-वडिलांच्या नात्याबाबत पहिल्यांदाच गिरीजाचा खुलासा
BMC Election 2026: मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
Dhurandhar Box Office Collection Day 17: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; तिसरा विकेंडही गाजवला, विक्की कौशलच्या 'छावा'सोबत काँटे की टक्कर, कोण जिंकणार?
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; तिसरा विकेंडही गाजवला, विक्की कौशलच्या 'छावा'सोबत काँटे की टक्कर, कोण जिंकणार?
Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: पाकिस्तानकडून धुरंधरच्या गाण्यावर सेलिब्रेशन; टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर नको नको ते केलं, नेमकं काय घडलं?, VIDEO
पाकिस्तानकडून धुरंधरच्या गाण्यावर सेलिब्रेशन; टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर नको नको ते केलं, नेमकं काय घडलं?, VIDEO
Samantha Ruth Prabhu Mobbed By Fans: निधी अग्रवालप्रमाणेच चाहत्यांच्या गर्दीत अडकली समंथा प्रभू, जंगली श्वापदासारखे बेकाबू फॅन्स, कुणी ओढला पदर, तर कुणी ढकललं, नेमकं काय घडलं?
निधी अग्रवालप्रमाणेच चाहत्यांच्या गर्दीत अडकली समंथा प्रभू, जंगली श्वापदासारखे बेकाबू फॅन्स, कुणी ओढला पदर, तर कुणी ढकललं अन्... VIDEO
Mohsin Naqvi Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: मोहसीन नक्वीला टीम इंडिया पुन्हा नडली; आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा राडा, नेमकं काय घडलं?
मोहसीन नक्वीला टीम इंडिया पुन्हा नडली; आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा राडा, काय घडलं?
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Embed widget